शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

सिरसा येथील डेरा सच्चा सौदाच्या मुख्यालयात घुसले लष्कर, रॅपिड अॅक्शन फोर्सचे जवान

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2017 12:18 IST

पंजाब-हरयाणामध्ये कालच्या सारखी परिस्थिती उदभवू नये यासाठी कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. हरयाणामध्ये लष्काराने पाचारण केले आहे. 

पंचकुला, दि. 26 - डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरमीत राम रहीमला साध्वीवरील बलात्कार प्रकरणात सीबीआयने कोर्टाने दोषी ठरवल्यानंतर हरयाणा-पंजाबमध्ये मोठया प्रमाणावर हिंसाचार झाला होता. आज अशी परिस्थिती उदभवू नये यासाठी कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. हरयाणामध्ये लष्काराने पाचारण केले आहे.  - हरयाणातील सिरसा येथी डेरा सच्चा सौदाच्या मुख्यालयात लष्कर आणि रॅपिड अॅक्शन फोर्सचे जवान घुसले आहेत. 

- केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह दिल्लीमध्ये उच्चस्तरीय बैठकीत पंजाब-हरयाणातील परिस्थितीचा आढावा घेत आहेत. या बैठकीला राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवालही उपस्थित आहेत. 

- काल झालेल्या हिंसाचारात 30 जणांचा मृत्यू झाला तर, 250 हून अधिक जखमी झाले होते. - हरयाणातील रोहतक जिल्ह्यातील सुनारीया येथील तुरुंगात गुरमीत राम रहीमला ठेवण्यात आले आहे. सामान्य कैद्यासारखीच त्याला वागणूक दिली जात आहे. 

- सिरसामधील आश्रमात हजारो डेरा समर्थक आहेत. - पंजाब, हरयाणामधील अऩेक भागात जमावबंदीचे कलम 144 लागू करण्यात आले आहे. 

- पंजाबच्या मानसामध्ये लष्कराने फ्लॅग मार्च केला. 

- कायदा-सुव्यवस्थेची स्थिती लक्षात घेऊन 23 ऑगस्ट ते 28 ऑगस्ट दरम्यान पंजाब-हरयाणाला जाणा-या 309 ट्रेन्स रद्द करण्यात आल्या आहेत. 

 हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांना भाजपा पक्षश्रेष्ठींनी दिल्लीत बोलावले आहे. गुरमीत राम रहीम यांच्या अटकेनंतर हरयाणामध्ये झालेल्या हिंसाचारामुळे त्यांना दिल्लीतून बोलावणे आले आहे. खट्टर यांच्याकडे स्पष्टीकरण मागितले जाऊ शकते. रिपब्लिक वाहिनीने हे वृत्त दिले आहे.  एकूणच खट्टर यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीला धोका निर्माण झाला आहे. हरयाणात पंचकुला आणि अन्य भागात शुक्रवारी जो हिंसाचार झाला त्यामध्ये 30 लोकांचा मृत्यू झाला तर, 250 पेक्षा जास्त जखमी झाले. 

प्रसारमाध्यमांनी हरयाणामधील या परिस्थितीसाठी मनोहर लाल खट्टर यांना जबाबदार धरले आहे. राज्य सरकारच्या निष्क्रीयतेमुळे ही परिस्थिती उदभवल्याचा आरोप प्रसारमाध्यमांनी केला आहे. मनोहर लाल खट्टर यांनी 26 ऑक्टोंबर 2014 रोजी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर तीनवर्षात तीनवेळा हरयाणात अशा प्रकारचा हिंसाचार झाला आहे. 

2014 मध्ये रामपाल नावाच्या बाबाला अटक करताना झालेल्या हिंसाचारात 10 जणांचा मृत्यू झाला होता. मागच्यावर्षी फेब्रुवारी महिन्यात जाट आंदोलनाच्यावेळी 30 जणांना प्राण गमावावे लागले होते. आता गुरमीत राम रहीमच्या अटकेनंतर झालेल्या हिंसाचारात 30 जणांचा मृत्यू झाला. एकूणच महत्वाच्या प्रसंगी कायदा-सुव्यवस्था राखण्यात मनोहर लाल खट्टर सरकार अपयशी ठरले आहे.  

टॅग्स :Crimeगुन्हा