शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: मतदारांचा उत्साह; सकाळपासूनच लांब रांगा
2
आजचे राशीभविष्य: धनलाभ, मान-सन्मान लाभतील; व्यापार वृद्धी, यशकीर्तीचा आनंदी दिवस
3
राज्यातील अखेरचा टप्पा; वाढवा मतदानाचा टक्का; महाराष्ट्रातील १३ जागांसह देशातील ४९ मतदारसंघांत आज मतदान
4
Lok sabha election 2024: अक्षयकुमार ते जान्हवी कपूर! कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क
5
EPFO नं क्लेम सेटलमेंट नियमांत केला बदल, Aadhaar डिटेल्स शिवायही होणार 'हे' काम
6
नृसिंह जयंती: ७ राशींना सौभाग्याचा काळ, संचित धनवृद्धी; यश-प्रगती संधी, महादेवही शुभ करतील!
7
खूशखबर! मान्सून आला रे... अंदमान-निकोबारमध्ये धडक, ३१ मेपर्यंत केरळमध्ये, या तारखेला पोहोचणार महाराष्ट्रात
8
राहुल, अखिलेश यांच्या प्रचारसभेत गोंधळ; नेत्यांना भेटण्यासाठी उत्साहाच्या भरात लोक बॅरिकेड्स तोडून मंचावर  
9
चप्पल व्यापाऱ्याकडे छापा; नोटा पाहून अधिकारी थक्क, ४० कोटींची रोकड जप्त! 
10
सेक्स स्कॅण्डल : प्रज्वलविरोधात अटक वॉरंट
11
‘आप’ला चिरडण्याचे कारस्थान; भाजपने सुरू केले ‘ऑपरेशन ब्रूम’; केजरीवाल यांचा आरोप
12
जलदगतीने वजन कमी करणे आरोग्यासाठी ठरू शकते धोकादायक, औषधांचा वापर टाळण्याचे आयसीएमआरचे आवाहन
13
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
14
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
15
बिल्डरच्या १७ वर्षीय मुलाने घेतला दाेघांचा बळी
16
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
17
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
18
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
19
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
20
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 

लष्कराकडे नाही दहा दिवस लढण्याइतपतही दारूगोळा - कॅग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2017 10:36 PM

सरहद्दीवर पाकिस्तान आणि चीनकडून सातत्याने कुरापती सुरू आहेत. सरकारही देशाच्या सुरक्षेसाठी सज्ज असल्याचे दावे करत आहे. मात्र

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 21 - सरहद्दीवर पाकिस्तान आणि चीनकडून सातत्याने कुरापती सुरू आहेत. सरकारही देशाच्या सुरक्षेसाठी सज्ज असल्याचे दावे करत आहे. मात्र  दुसरीकडे भारतीय लष्कराकडे दहा दिवस लढण्याइतपतही दारूगोळा नसल्याचे समोर आले आहे. सरकारी खात्यांचे ऑडीट करणारी संस्था कॅगच्या अहवालातून ही  माहिती समोर आली आहे. 
 कॅगने आज संसदेच्या पटलावर ठेवलेल्या अहवालात सांगितले की, "लष्करी मुख्यालयाने 2009 ते 2013 च्या दरम्यान खरेदीच्या ज्या व्यवहारांची सुरुवात केली. त्यातील अनेक व्यवहार जानेवारी 2017 पर्यंत बारगळलेले होते. 2013 पासून ऑर्डिनन्स फॅक्टरी बोर्डाकडून पुरवण्यात येणाऱ्या दारू गोळ्याची गुणवत्ता आणि प्रमाण अपूरे असल्याकडे लक्ष वेधण्यात आले होते. पण त्याबाबत काहीही कार्यवाही करण्यात आली नाही. निर्मितीचे लक्ष्य गाठण्यात अपयश आले. परतवण्यात आलेला, निरुपयोगी दारुगोळा हटवण्याबाबत तसेच दुरुस्त करण्याबाबतही हेच धोरण कायम राहिले. दारू गोळ्याच्या गोदामात अग्निशमन कर्मचाऱ्यांची वानवा आहे. त्यामुळे अपघातांचा धोका आहे. "   
या अहवालानुसार यावर्षी जानेवारी महिन्यात लष्कराच्या दारुगोळ्याच्या व्यवस्थापनाचे ऑडीट करण्यात आले होते.  लष्कराकडे गरजेनुसार राखीव दारुगोळा ठेवला जातो. संरक्षण मंत्रालयाने 1999 साली किमान 40 दिवस पुरेल एवढा राखीव दारुगोळा ठेवण्यास मंजुरी दिली होती. मात्र सप्टेंबर 2016 मध्ये घेण्यात आलेल्या आढाव्यात केवळ 20 टक्के दारुगोळाच 40 दिवसांच्या कसोटीवर उतरला होता.