शहरं
Join us  
Trending Stories
1
जयंत पाटलांची मागणी शरद पवारांनी केली मान्य; म्हणाले,"...त्यासाठी तुमच्या सगळ्यांची तयारी पाहिजे"
2
शरद पवारांना मोठा धक्का; इथे वर्धापनदिनाचा कार्यक्रम, तिथे २ बड्या नेत्यांचा भाजपा प्रवेश
3
जयंत पाटील बाहेर पडणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, ‘पत्रही नाही, राजीनामाही नाही…’
4
"माझ्या मुलाला न्याय हवाय, सोनमच्या खात्यात २० लाख..."; राजाच्या आईने केली सुनेची पोलखोल
5
Sonam Raghuvanshi : ज्या गाईडला दिला नकार, तोच बनला मोठा साक्षीदार! सोनमचं पितळ उघडं कसं पडलं?
6
दिल्लीत एका फ्लॅटला भीषण आग, जीव वाचवण्यासाठी वडिलांची दोन मुलांसह इमारतीवरून उडी, तिघांचाही मृत्यू
7
“चुकीच्या मार्गाला सुप्रिया सुळे जातील असे वाटत नाही”; संजय राऊत आशावादी, भाजपावर टीका
8
गोल्ड लोन घेताय? थांबा! RBI च्या 'या' नवीन नियमांचा तुम्हाला फायदा होणार की तोटा? वाचा सविस्तर
9
COVID19: कोरोनाचा विळखा घट्ट होतोय; राज्यातील रुग्णांचा आकडा १३०० पार!
10
“चंद्रहार पाटीलसाठी प्रतिष्ठा पणाला लावली, पण बेईमानी केली”; संजय राऊतांनी बोलून दाखवली खंत
11
...म्हणून सोनमचा प्रियकर स्वत: शिलाँगला गेला नव्हता, राजाचा काटा काढण्यासाठी असा रचला भयानक कट  
12
MBA चं स्वप्न मोडलं, घराबाहेर जाण्यावर लावली बंदी; सोनम रघुवंशीची अशी होती 'सीक्रेट लाइफ'
13
वारंवार घरातून पळून जात होती पत्नी; वैतागलेल्या पतीनं उचललं धक्कादायक पाऊल!
14
Raja Raghuvanshi Murder Case : पती राजाची 'सुपारी' देणारी सोनम रघुवंशी गर्भवती आहे का? तिची प्रेग्नंसी टेस्ट झाली अन्...
15
जयंत पाटलांची प्रदेशाध्यपद सोडण्याची इच्छा, म्हणाले, "शरद पवार यांना विनंती करतो, त्यांनी..."
16
रेश्मा शिंदेने घरातच साजरी केली वटपौर्णिमा! अभिनेत्रीसोबत साऊथ पतीनेही वडाच्या झाडाला मारल्या फेऱ्या
17
सोनम रघुवंशीनं किती रुपयांत केली होती पती राजाच्या जीवाची 'डील'? कुणाला किती रुपये दिले अ‍ॅडव्हॉन्स? जाणून थक्क व्हाल!
18
११ रुपयांचा शेअर पोहोचला ५७१ रुपयांवर, 'या' कंपनीने गुंतवणूकदारांना दिला '५०००%' परतावा!
19
Corona Virus : बापरे! कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने पुन्हा भरवली धडकी, XFG रोगप्रतिकारक शक्तीला देतोय चकवा
20
आर्थिक अडचणींना वैतागून एमबीबीएस विद्यार्थ्याची आत्महत्या; जेजे रुग्णालयाच्या वसतिगृहातील घटना!

लष्कराकडे नाही दहा दिवस लढण्याइतपतही दारूगोळा - कॅग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2017 22:40 IST

सरहद्दीवर पाकिस्तान आणि चीनकडून सातत्याने कुरापती सुरू आहेत. सरकारही देशाच्या सुरक्षेसाठी सज्ज असल्याचे दावे करत आहे. मात्र

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 21 - सरहद्दीवर पाकिस्तान आणि चीनकडून सातत्याने कुरापती सुरू आहेत. सरकारही देशाच्या सुरक्षेसाठी सज्ज असल्याचे दावे करत आहे. मात्र  दुसरीकडे भारतीय लष्कराकडे दहा दिवस लढण्याइतपतही दारूगोळा नसल्याचे समोर आले आहे. सरकारी खात्यांचे ऑडीट करणारी संस्था कॅगच्या अहवालातून ही  माहिती समोर आली आहे. 
 कॅगने आज संसदेच्या पटलावर ठेवलेल्या अहवालात सांगितले की, "लष्करी मुख्यालयाने 2009 ते 2013 च्या दरम्यान खरेदीच्या ज्या व्यवहारांची सुरुवात केली. त्यातील अनेक व्यवहार जानेवारी 2017 पर्यंत बारगळलेले होते. 2013 पासून ऑर्डिनन्स फॅक्टरी बोर्डाकडून पुरवण्यात येणाऱ्या दारू गोळ्याची गुणवत्ता आणि प्रमाण अपूरे असल्याकडे लक्ष वेधण्यात आले होते. पण त्याबाबत काहीही कार्यवाही करण्यात आली नाही. निर्मितीचे लक्ष्य गाठण्यात अपयश आले. परतवण्यात आलेला, निरुपयोगी दारुगोळा हटवण्याबाबत तसेच दुरुस्त करण्याबाबतही हेच धोरण कायम राहिले. दारू गोळ्याच्या गोदामात अग्निशमन कर्मचाऱ्यांची वानवा आहे. त्यामुळे अपघातांचा धोका आहे. "   
या अहवालानुसार यावर्षी जानेवारी महिन्यात लष्कराच्या दारुगोळ्याच्या व्यवस्थापनाचे ऑडीट करण्यात आले होते.  लष्कराकडे गरजेनुसार राखीव दारुगोळा ठेवला जातो. संरक्षण मंत्रालयाने 1999 साली किमान 40 दिवस पुरेल एवढा राखीव दारुगोळा ठेवण्यास मंजुरी दिली होती. मात्र सप्टेंबर 2016 मध्ये घेण्यात आलेल्या आढाव्यात केवळ 20 टक्के दारुगोळाच 40 दिवसांच्या कसोटीवर उतरला होता.