शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
3
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
4
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
5
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
6
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
7
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
8
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
9
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
10
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
11
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
12
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
13
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
14
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
15
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
16
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
17
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
18
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
19
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
20
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...

लष्कराकडे नाही दहा दिवस लढण्याइतपतही दारूगोळा - कॅग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2017 22:40 IST

सरहद्दीवर पाकिस्तान आणि चीनकडून सातत्याने कुरापती सुरू आहेत. सरकारही देशाच्या सुरक्षेसाठी सज्ज असल्याचे दावे करत आहे. मात्र

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 21 - सरहद्दीवर पाकिस्तान आणि चीनकडून सातत्याने कुरापती सुरू आहेत. सरकारही देशाच्या सुरक्षेसाठी सज्ज असल्याचे दावे करत आहे. मात्र  दुसरीकडे भारतीय लष्कराकडे दहा दिवस लढण्याइतपतही दारूगोळा नसल्याचे समोर आले आहे. सरकारी खात्यांचे ऑडीट करणारी संस्था कॅगच्या अहवालातून ही  माहिती समोर आली आहे. 
 कॅगने आज संसदेच्या पटलावर ठेवलेल्या अहवालात सांगितले की, "लष्करी मुख्यालयाने 2009 ते 2013 च्या दरम्यान खरेदीच्या ज्या व्यवहारांची सुरुवात केली. त्यातील अनेक व्यवहार जानेवारी 2017 पर्यंत बारगळलेले होते. 2013 पासून ऑर्डिनन्स फॅक्टरी बोर्डाकडून पुरवण्यात येणाऱ्या दारू गोळ्याची गुणवत्ता आणि प्रमाण अपूरे असल्याकडे लक्ष वेधण्यात आले होते. पण त्याबाबत काहीही कार्यवाही करण्यात आली नाही. निर्मितीचे लक्ष्य गाठण्यात अपयश आले. परतवण्यात आलेला, निरुपयोगी दारुगोळा हटवण्याबाबत तसेच दुरुस्त करण्याबाबतही हेच धोरण कायम राहिले. दारू गोळ्याच्या गोदामात अग्निशमन कर्मचाऱ्यांची वानवा आहे. त्यामुळे अपघातांचा धोका आहे. "   
या अहवालानुसार यावर्षी जानेवारी महिन्यात लष्कराच्या दारुगोळ्याच्या व्यवस्थापनाचे ऑडीट करण्यात आले होते.  लष्कराकडे गरजेनुसार राखीव दारुगोळा ठेवला जातो. संरक्षण मंत्रालयाने 1999 साली किमान 40 दिवस पुरेल एवढा राखीव दारुगोळा ठेवण्यास मंजुरी दिली होती. मात्र सप्टेंबर 2016 मध्ये घेण्यात आलेल्या आढाव्यात केवळ 20 टक्के दारुगोळाच 40 दिवसांच्या कसोटीवर उतरला होता.