शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

आझादी कधीच मिळणार नाही, हे तरुणांना सांगण्याची गरज- लष्करप्रमुख

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2018 08:38 IST

दहशतवाद, काश्मिरी तरुण, फुटीरतावाद्यांवर लष्करप्रमुखांचं कठोर भाष्य

नवी दिल्ली: आझादी कधीच मिळणार नाही, हे सत्य काश्मिरी तरुणांना सांगण्याची गरज आहे, असं लष्करप्रमुख बिपीन रावत यांनी म्हटलंय. दहशतवादाच्या मार्गाकडे वळणाऱ्या आणि दहशतवाद्यांबद्दल सहानुभूती बाळगणाऱ्या काश्मिरी तरुणांची संख्या चिंताजनक आहे. त्यावर लष्करप्रमुखांनी भाष्य केलं. हातात शस्त्र घेऊन काहीही साध्य होणार नाही. या मार्गानं कधीही आझादी मिळणार नाही, असं रावत यांनी म्हटलंय. 'हातात शस्त्र घेणाऱ्या आणि त्यासाठी त्यांची माथी भडकावणाऱ्यांना मला सांगावसं वाटतं की, या मार्गामुळे त्यांना कधीही आझादी मिळणार नाही. आझादी मिळणं अशक्य असल्यानं काश्मिरी तरुणांचे त्यासाठीचे प्रयत्न व्यर्थ आहेत. तुम्ही कशासाठी हाती शस्त्रं घेत आहात? आझादी मागणाऱ्यांविरोधात आम्ही कायम लढत राहू. आझादी शक्य नाही. कधीही शक्य नाही,' असं बिपीन रावत यांनी इंग्रजी वृत्तपत्र 'इंडियन एक्स्प्रेस'ला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं. यावेळी त्यांनी लष्करानं कंठस्नान घातलेल्या दहशतवाद्यांच्या संख्येवरदेखील भाष्य केलं. 'एन्काऊंटरमध्ये किती दहशतवादी मारले, याला मी फारसं महत्त्व देत नाही. हे चक्र असंच सुरू राहणार असल्यानं या गोष्टीला फार महत्त्व द्यावं, असं मला वाटत नाही. नव्या दहशतवाद्यांची भरती सुरुच राहिल. मात्र हे सर्व व्यर्थ आहे. यातून काहीच साध्य होणार नाही. तुम्ही लष्कराविरुद्ध लढू शकणार नाही,' असं लष्करप्रमुख म्हणाले. दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या आणि त्यांच्याबद्दल सहानुभूती बाळगणाऱ्या लोकांवर रावत यांनी कठोर शब्दांमध्ये भाष्य केलं. 'आम्हाला त्यांच्याविरुद्ध कारवाई करताना आनंद होत नाही. मात्र त्यांना आमच्याविरुद्ध लढायचेच असेल, तर आमचा नाईलाज आहे. आम्ही त्यांच्याशी समर्थपणे दोन हात करु,' असं लष्करप्रमुखांनी म्हटलं. दहशतवाद्यांविरोधातील कारवाई करताना लष्कराचे जवान शक्य तितकी काळजी घेत असल्याचंही त्यांनी सांगितलं. 'भारतीय लष्कराचे जवान निर्दयीपणे वागत नाहीत. सीरिया आणि पाकिस्तानमध्ये लष्कराकडून थेट रनगाडे आणि विमानांचा वापर करुन कारवाया केल्या जातात. त्या तुलनेत भारतीय जवान नागरिकांची काळजी घेऊन दहशतवाद्यांशी लढतात. नागरिकांना त्रास होणार नाही, याची खबरदारी जवानांकडून घेतली जाते,' असंही बिपीन रावत यांनी म्हटलं. तरुणांचा राग मी समजू शकतो. मात्र लष्कराच्या जवानांवर दगडफेक हा मार्ग असू शकत नाही, असंही ते म्हणाले.  

टॅग्स :Bipin Rawatबिपीन रावतIndian Armyभारतीय जवानJammu Kashmirजम्मू-काश्मीरTerrorismदहशतवादterroristदहशतवादीPakistanपाकिस्तान