शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

Video: पाकच्या 2 दहशतवाद्यांना लष्कराने जिवंत पकडले; अभिनंदनच्या छळाचा घेतला 'असा' बदला

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2019 15:00 IST

भारतीय लष्काराचे चिनार कॉर्प्सचे कमांडर जनरल केजेएस ढिल्लो यांनी पत्रकार परिषदेत घेतली

श्रीनगर - जम्मू काश्मीरमधून कलम 370 हटविल्यानंतर सैरभैर झालेला पाकिस्तान काश्मीर खोऱ्यात दहशत माजविण्यासाठी प्रयत्न करत आहे. लष्कराने बुधवारी पाकिस्तानच्या नापाक हरकतीचा पुन्हा एकदा पुरावा जगासमोर आणला आहे. भारतात घुसखोरी करण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या दोन दहशतवाद्यांना जिवंत पकडून त्यांच्याकडून कबुलीजबाब नोंदवून व्हिडीओ काढला. हे दोन्ही दहशतवादी लष्कर ए तोएबाशी संबंधित आहेत. 

भारतीय लष्काराचे चिनार कॉर्प्सचे कमांडर जनरल केजेएस ढिल्लो यांनी पत्रकार परिषदेत घेत सांगितले की, पाकिस्तानकडून काश्मीर खोऱ्यात शांतता भंग करण्यासाठी जास्तीत जास्त दहशतवाद्यांना भारतात घुसविण्याच्या प्रयत्नात आहेत. 21 ऑगस्टला लष्कराने या दोन दहशतवाद्यांनी पकडले आहे. हे पाकिस्तानमधील लष्कर ए तोएबाचे दहशतवादी असल्याचं स्पष्ट झालं आहे. 

लष्कराने या दहशतवाद्यांना पकडलं असून त्यांचे व्हिडीओ बनविले आहेत. ज्यात ते कबूल करत आहेत की, ते पाकिस्तान आणि लष्कर ए तोएबाशी संबंधित आहेत. एका दहशतवाद्याचे नाव मोहम्मद अजीम आहे. त्याने सांगितले की, तो पाकिस्तानच्या रावलपिंडीवरून आला आहे आणि लष्कर ए तोएबासाठी काम करतो. भारतीय लष्कराने पाकिस्तानी दहशतवाद्यांनी चहा दिला. कबुलीजबाब नोंदविल्यानंतर त्यांना विचारण्यात आलं की, चहा कसा आहे? त्यावर त्यांनी उत्तर दिलं की, चहा चांगला आहे.

पाकिस्तानी F-16 विमानाचा पाठलाग करताना विंग कमांडर अभिनंदनला कैद करणाऱ्या पाकिस्तानी लष्करी अधिकाऱ्याने अभिनंदनला हाच प्रश्न केला होता. त्यामुळे भारतीय लष्करानेही त्याच शिताफीने त्यांच्या स्टाइलमध्ये या दहशतवाद्यांना प्रश्न विचारले. या व्हिडीओ दुसरा दहशतवादी म्हणतो की, तो पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील गाजी आबाद शहरातील रहिवाशी आहे. काश्मीर खोऱ्यात कोणत्याही हिंसाचारात एकाही व्यक्तीचा मृत्यू सुरक्षा यंत्रणांच्या हातून झाला नाही. खोऱ्यात झालेल्या मृत्युंना दहशतवादी आणि दगडफेक करणारे जबाबदार आहेत असं लष्कराने सांगितले. 

याशिवाय लष्करात भरतीसाठी आलेल्या रॅलीला संबोधित करताना ढिल्लो यांनी सांगितले की, मी भविष्यात तुमच्या सोबत काम करू इच्छितो. तुम्ही सगळ्यांनी अभ्यास करावा, ड्रग्स आणि बंदूक यांच्यापासून दूर राहावं. तुमच्या पालकांना तुमच्यावर अभिमान असला पाहिजे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. 

टॅग्स :IndiaभारतPakistanपाकिस्तानterroristदहशतवादीLashkar-e-taibaलष्कर-ए-तोयबा