शहरं
Join us  
Trending Stories
1
Mantha Cyclone: मोंथा चक्रीवादळ किनारपट्टीवर धडकले! वेग प्रतितास 100 किमी, विदर्भाला ऑरेंज अलर्ट
2
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची खरंच चौकशी सुरू केली आहे का? मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले उत्तर
3
"निवडणुकीत लक्ष्मी दर्शन, कुणाला चपटी, कुणाला कोंबडं बकरू लागतं, तयारी ठेवा"; अजित पवारांच्या आमदाराचे विधान
4
पुण्यात भीषण अपघात! फरश्या घेऊन जाणाऱ्या ट्रकची तीन वाहनांना धडक,ट्रकचालकला पोलिसांच्या ताब्यात
5
१० हजारांचं जेवण करून बिल न भरता पळाले; ट्रॅफिकमध्ये झाला घोळ, रेस्टॉरंट मालकाने रस्त्यात गाठलं अन्...
6
वेळेत ब्लाऊज शिवून न देणे टेलरला पडलं महागात; ग्राहक कोर्टाने सुनावली शिक्षा, काय आहे प्रकार?
7
जळगाव जिल्ह्यात एसटी बसचा भीषण अपघात, चालकासह 8 प्रवाशी जखमी
8
"अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना आतापर्यंत ८ हजार कोटी वाटप, पुढील १५ दिवसांत ११ हजार कोटी देणार"
9
Mohammed Shami: "मी काही बोललो तर, वाद होईल!" संघ निवडीबाबत उपस्थित होणाऱ्या प्रश्नांवर शमीचं उत्तर
10
"त्यांना फाशीशिवाय दुसरी शिक्षा असूच शकत नाही"; डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणात उदयनराजेंनी लोकांना काय केले आवाहन?
11
Viral Video: फलंदाजाला 'असं' आउट होताना कधीच पाहिलं नसेल; षटकार मारूनंही पंचांनी वर केलं बोट!
12
अजबच! गावठी कुत्रा बनला ज्वेलरी शॉपचा रखवालदार, गळ्यात घालतो ५० तोळ्यांची सोन्याची चेन
13
Inspiring Story: तरुणीला किडनीची गरज, तरुणाला कर्करोग...; गोष्ट एका अनोख्या प्रेमाची!
14
'५० कोटींच्या धमकीला भीक घालत नाही', सुषमा अंधारेंनी रणजितसिंह नाईक निंबाळकरांविरोधात पुरावे दाखवले
15
4 दुचाकी, 6 सिलिंडर...बसमध्ये ठेवलेले 'हे' सामान; भडका उडाल्याने दोघांचा जागीच मृत्यू, डझनभर जखमी
16
UPSC Student Murder: लिव्ह पार्टनरची थंड डोक्याने हत्या, फॉरेन्सिक सायन्सची विद्यार्थिनी अमृताकडून 'ती' एक चूक झाली अन्...
17
'महायुती सरकारचे ११ हजार कोटींचे पॅकेजही ३२ हजार कोटींच्या पॅकेजसारखे फसवेच', हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
18
मोठी बातमी! कर्जमाफीसाठी परभणी जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीवर शेतकऱ्याची दगडफेक
19
ट्रम्प आणि पुतिन यांच्यातील दरी वाढली, रशियन तेल साम्राज्याला मोठा झटका; परदेशी मालमत्ता विकण्यास सुरुवात
20
8th Pay Commission: १४०००, १५००० की १८०००...एक लाख सॅलरीवर किती होणार दरमहा वाढ?

Arijit Singh: ‘रंग दे तू मोहे गेरुआ…’ गाण्यामुळे अरिजित सिंगची कॉन्सर्ट रद्द? भाजपचा ममता सरकारवर आरोप...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2022 15:49 IST

भाजप नेते अमित मालवीय यांनी ट्विट करत पश्चिम बंगाल सरकारवर आरोप केले.

प्रसिद्ध सिंगर अरिजित सिंगची कोलकाता येथे होणारी कॉन्सर्ट राज्य सरकारने रद्द केली आहे. अरिजित पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासमोर शाहरुख खान स्टारर 'दिलवाले' चित्रपटातील 'रंग दे तू मोहे गेरुआ...' हे गाणे गाणार होता, त्यामुळेच सरकारने कॉन्सर्ट रद्द केल्याचा आरोप भाजपने केला आहे. मात्र, G-20 कार्यक्रमामुळे कॉन्सर्ट रद्द करण्यात आल्याचा दावा पश्चिम बंगाल सरकारने केला आहे. आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या कार्यक्रमाच्या शुभारंभाच्या निमित्ताने इको पार्क येथे हा कार्यक्रम होणार होता. तर समोरच हॉलमध्ये G-20 कार्यक्रम प्रस्तावित आहे. 

भाजप नेते अमित मालवीय यांनी ट्विट करत पश्चिम बंगाल सरकारवर हल्लाबोल केला आहे. अरिजित सिंगच्या गाण्यामुळे ममता सरकारने कॉन्सर्टला परवानगी दिली नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या कार्यक्रमात खुद्द मुख्यमंत्री सहभागी होणार असल्याने आणि अरिजित सिंग 'रंग दे तू मोहे गेरुआ...' या गाण्याने कार्यक्रमाची सुरुवात करणार होते. अशा स्थितीत सरकारने ती रद्द केली आहे. भाजपच्या या आरोपानंतर पश्चिम बंगाल सरकारने स्पष्टीकरण दिले आहे. फिल्म फेस्टिव्हल आणि जी-20 कार्यक्रमाच्या तारखा एकमेकांशी भिडत असल्याचे सांगितले. अशा परिस्थितीत अरिजित सिंग यांच्या कार्यक्रमामुळे जी-20 च्या कार्यक्रमात अडथळा येण्याची शक्यता असल्याने कॉन्सर्ट रद्द करण्यात आली आहे.

दिलवाले चित्रपट गाणे मिळालेल्या माहितीनुसार, 'रंग दे तू मोहे गेरुआ...' हे शाहरुख खान स्टारर 'दिलवाले' चित्रपटाचे मुख्य गाणे आहे. याशिवाय अरिजित सिंगचे हे सर्वात लोकप्रिय गाणे आहे. बंगाली गाण्यासोबत हे गाणे कोलकाता फिल्म फेस्टिव्हलमध्ये दाखवण्यात आले होते. पश्चिम बंगालचे मंत्री फिरहाद हकीम यांनी सांगितले की, जी-20 कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर अरिजित सिंगच्या कार्यक्रमाला परवानगी देण्यात आलेली नाही. दोन्ही कार्यक्रम एकाच कॅम्पसमध्ये होणार होते आणि अरिजित सिंग यांच्या कार्यक्रमामुळे जी-20 कार्यक्रमावर परिणाम होण्याची शक्यता होती. 

हा कार्यक्रम 18 फेब्रुवारी रोजी प्रस्तावित होताआतापर्यंत प्रस्तावित कार्यक्रमानुसार अरिजित सिंगची कॉन्सर्ट 18 फेब्रुवारीला होणार होती. मात्र आता हा कार्यक्रम पुन्हा कधीतरी होणार असल्याचे सरकारने म्हटले आहे. अरिजित सिंगच्या कार्यक्रमाला प्रचंड गर्दी होण्याची शक्यता असल्याचे सरकारचे म्हणणे आहे. त्यामुळे कायदा व सुव्यवस्था बिघडू शकते. सलमान खानचा शोही पुढे ढकलण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. याच आवारात हा शो देखील प्रस्तावित होता.  

टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जीArijit singhअरिजीत सिंहwest bengalपश्चिम बंगालBJPभाजपा