शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
3
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
4
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
5
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
6
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
7
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
9
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
10
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
11
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
12
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
13
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
14
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
15
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
16
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
17
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
18
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
19
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
20
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!

Arijit Singh: ‘रंग दे तू मोहे गेरुआ…’ गाण्यामुळे अरिजित सिंगची कॉन्सर्ट रद्द? भाजपचा ममता सरकारवर आरोप...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2022 15:49 IST

भाजप नेते अमित मालवीय यांनी ट्विट करत पश्चिम बंगाल सरकारवर आरोप केले.

प्रसिद्ध सिंगर अरिजित सिंगची कोलकाता येथे होणारी कॉन्सर्ट राज्य सरकारने रद्द केली आहे. अरिजित पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासमोर शाहरुख खान स्टारर 'दिलवाले' चित्रपटातील 'रंग दे तू मोहे गेरुआ...' हे गाणे गाणार होता, त्यामुळेच सरकारने कॉन्सर्ट रद्द केल्याचा आरोप भाजपने केला आहे. मात्र, G-20 कार्यक्रमामुळे कॉन्सर्ट रद्द करण्यात आल्याचा दावा पश्चिम बंगाल सरकारने केला आहे. आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या कार्यक्रमाच्या शुभारंभाच्या निमित्ताने इको पार्क येथे हा कार्यक्रम होणार होता. तर समोरच हॉलमध्ये G-20 कार्यक्रम प्रस्तावित आहे. 

भाजप नेते अमित मालवीय यांनी ट्विट करत पश्चिम बंगाल सरकारवर हल्लाबोल केला आहे. अरिजित सिंगच्या गाण्यामुळे ममता सरकारने कॉन्सर्टला परवानगी दिली नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या कार्यक्रमात खुद्द मुख्यमंत्री सहभागी होणार असल्याने आणि अरिजित सिंग 'रंग दे तू मोहे गेरुआ...' या गाण्याने कार्यक्रमाची सुरुवात करणार होते. अशा स्थितीत सरकारने ती रद्द केली आहे. भाजपच्या या आरोपानंतर पश्चिम बंगाल सरकारने स्पष्टीकरण दिले आहे. फिल्म फेस्टिव्हल आणि जी-20 कार्यक्रमाच्या तारखा एकमेकांशी भिडत असल्याचे सांगितले. अशा परिस्थितीत अरिजित सिंग यांच्या कार्यक्रमामुळे जी-20 च्या कार्यक्रमात अडथळा येण्याची शक्यता असल्याने कॉन्सर्ट रद्द करण्यात आली आहे.

दिलवाले चित्रपट गाणे मिळालेल्या माहितीनुसार, 'रंग दे तू मोहे गेरुआ...' हे शाहरुख खान स्टारर 'दिलवाले' चित्रपटाचे मुख्य गाणे आहे. याशिवाय अरिजित सिंगचे हे सर्वात लोकप्रिय गाणे आहे. बंगाली गाण्यासोबत हे गाणे कोलकाता फिल्म फेस्टिव्हलमध्ये दाखवण्यात आले होते. पश्चिम बंगालचे मंत्री फिरहाद हकीम यांनी सांगितले की, जी-20 कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर अरिजित सिंगच्या कार्यक्रमाला परवानगी देण्यात आलेली नाही. दोन्ही कार्यक्रम एकाच कॅम्पसमध्ये होणार होते आणि अरिजित सिंग यांच्या कार्यक्रमामुळे जी-20 कार्यक्रमावर परिणाम होण्याची शक्यता होती. 

हा कार्यक्रम 18 फेब्रुवारी रोजी प्रस्तावित होताआतापर्यंत प्रस्तावित कार्यक्रमानुसार अरिजित सिंगची कॉन्सर्ट 18 फेब्रुवारीला होणार होती. मात्र आता हा कार्यक्रम पुन्हा कधीतरी होणार असल्याचे सरकारने म्हटले आहे. अरिजित सिंगच्या कार्यक्रमाला प्रचंड गर्दी होण्याची शक्यता असल्याचे सरकारचे म्हणणे आहे. त्यामुळे कायदा व सुव्यवस्था बिघडू शकते. सलमान खानचा शोही पुढे ढकलण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. याच आवारात हा शो देखील प्रस्तावित होता.  

टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जीArijit singhअरिजीत सिंहwest bengalपश्चिम बंगालBJPभाजपा