14 एप्रिल: सारोळे फोकस..

By Admin | Updated: April 15, 2015 00:03 IST2015-04-15T00:03:31+5:302015-04-15T00:03:31+5:30

महापालिका आयुक्तांसमोरील आव्हाने

April 14: Sarolee Focus .. | 14 एप्रिल: सारोळे फोकस..

14 एप्रिल: सारोळे फोकस..

ापालिका आयुक्तांसमोरील आव्हाने
दोन महिन्यांनंतर विजयकुमार काळम-पाटील यांच्या रूपाने महापालिकेला नवीन आयुक्त मिळाला. चंद्रकांत गुडेवार यांच्या बदलीनंतर महापालिकेची विकासकामे खोळंबली आहेत. महापालिकेच्या तिजोरीत खडखडाट असल्यामुळे आता करायचे काय, असा सर्वांसमोर प्रश्न आहे. अशा अवस्थेत सूत्रे हाती घेतल्यानंतर काळम-पाटील यांनी लागलीच स्थितीचा अभ्यास करून उत्पन्नाच्या स्रोताकडे लक्ष केंद्रित केले आहे. असे असताना नागरिक सध्या दररोज ज्या समस्येला तोंड देत आहेत तो म्हणजे पाणी व कचरा हा प्रश्न त्यांनी हाती घेतला आहे. पाण्यावर कोट्यवधी रुपये पाण्यासारखे खर्च झाले आहेत. पण पाण्याचे नियोजन जमलेले नाही. तीन व चार दिवसाआड पाण्याचे नियोजन झालेले आहे. पण या नियोजनाप्रमाणे कोठेच पाणी जात नाही, ही वस्तुस्थिती आहे. शहरात पाणी कमी मिळते ही ओरड आहे, तर हद्दवाढ भागात विशेष करून विडी घरकूल परिसरात आठ दिवसांतून एकदा पाणीपुरवठा होत आहे. पाण्याबाबत नागरिकांची ओरड वाढल्यावर पदाधिकार्‍यांनी कंबर कसली. नांदणीचा बीपीटी (ब्रेक प्रेशर टँक) कार्यान्वित झाल्यावर दोन दिवसाआड पाणीपुरवठा होईल, असे गृहीत धरण्यात आले आहे. सध्या तीन पंप सुरू आहेत. यातून आणखी एक पंप वाढविता येईल. यातून 10 ते 15 एमएलडी पाणी वाढेल, असा अंदाज आहे. 1 मेपासून हे नियोजन अपेक्षित आहे. त्या भरवशावर पदाधिकारी लोकांना आश्वासन देत आहेत, पण हे गणित चुकणार आहे. सध्या बर्‍याच भागात नियोजनानुसार पाणी जात नाही. पाणी थोडे वाढले तर हेच वेळापत्रक दुरुस्त होईल. पण दोन दिवसाआड पाणीपुरवठा मृगजळच ठरणार आहे. मेच्या कडाक्यानंतर पावसाळा सुरू होईल आणि ही समस्या आपोआप सुटेल. पण सध्या लोकांचा संताप पाहता सदस्यांना प्रभागात फिरणे मुश्कील झाले आहे. एकतर चार दिवसाआड पाणी आणि तेही वेळेवर व व्यवस्थित दाबाने वितरित होत नाही. अशात वर्षभराची पाणीप?ी का घेता, असा लोकांचा संताप आहे. गतवर्षी पाणीप?ी माफ करण्याचे गाजर दाखविण्यात आले. यंदाही हीच स्थिती आहे. करवसुलीसाठी तर महापालिकेची पथके फिरत आहेत. पण नागरी सुविधेच्या नावाने मोठी बोंब होत आहे. घंटागाड्यांचा विषय कळीचा मुद्दा बनला आहे. गल्लोगल्लीचा कचरा रस्त्यावर आला आहे. पाणी व कचर्‍याचे नियोजन होणे गरजेचे आहे.
?राजकुमार सारोळे

Web Title: April 14: Sarolee Focus ..

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.