शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
3
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
4
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
5
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
6
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
7
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
8
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
9
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
10
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
11
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
12
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
13
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
14
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
15
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
16
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
17
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
18
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
19
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

देशभरातून कौतुक, मोनिकाच्या चतुराईमुळे वाचला विमानातील 185 प्रवाशांचा जीव

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2022 12:14 IST

पाटणा विमानतळ प्राधिकरणाने सांगितले की, सर्व प्रवासी सुरक्षित असून, त्यातील कोणीही जखमी झालेले नाही

पाटणा : पाटण्याहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाने उड्डाण घेताच इंजिनमध्ये आग भडकली. स्पाईस जेटच्या एसजी-७२५ या विमानात आग लागताच वैमानिकाने सुरक्षित लँडिंग केले व १८५ प्रवासी बचावले. मात्र, विमानाच्या इंजिनमधून धूर निघत असून, आग लागल्याची माहिती मिळताच प्रवासी काही काळ भयभीत झाले होते. याघटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्यात येणार आहे. मोनिका खन्ना या पायलट बनून या विमानाचं सारथ्य करत होत्या. मोनिकाने अतिशय कुशलतेनं विमानाचं लँडिंग करुन १८५ प्रवाशांचा जीव वाचवला. 

पाटणा विमानतळ प्राधिकरणाने सांगितले की, सर्व प्रवासी सुरक्षित असून, त्यातील कोणीही जखमी झालेले नाही. आग लागल्याची माहिती मिळताच अत्यंत सावधतेने विमानाचे लँडिंग करण्यात आले. आग का लागली, याची चौकशी केली जात आहे. तथापि, विमानाला एखाद्या पक्ष्याची टक्कर झाली असावी, याचा त्यांनी इन्कार केला नाही. फ्लाईट एसजी 723 ची पालयट इन कमांड कॅप्टन मोनिका यांना आग लागल्याची माहिती मिळताच संबंधित इंजिन बंद केले. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. स्पाईस जेटकडूनही मोनिका यांचा अभिनंदन करण्यात आलं आहे. कारण, पाटणा विमानतळावर लँडिंग एवढं सोपं नव्हतं. मोनिका यांच्यासह त्यांचे पायलट सहकारी बलप्रीत सिंह यांनी या दुर्घटनेवेळी सावधानता आणि चुतराई दाखवली, असे स्पाईस जेटने म्हटले आहे.  

पाटण्यातील फुलवारीशरीफ भागावरून विमान जात असताना स्थानिक लोकांनी त्यातून धूर निघताना पाहिला. लोकांनी तातडीने जिल्हा प्रशासन व विमानतळाला याची माहिती कळवली. यानंतर विमान सुरक्षितरीत्या पाटणा विमानतळावर उतरविण्यात आले. विमानातील प्रवाशांना अन्य विमानाने दिल्लीला पाठविले. विमानातील आगीवर तातडीने नियंत्रण मिळविण्यात आले. विमानात आगीमुळे जास्त नुकसान झाले नाही.

प्रवासी भयभीत

एका महिला प्रवाशाने सांगितले की, विमानात आग लागल्याचे कळताच सर्व प्रवासी भयभीत झाले होते. परंतु, विमानाच्या क्रू मेंबरनी स्थिती चांगल्या पद्धतीने हाताळली. विमानाने उड्डाण घेताच १०-१५ मिनिटांतच लक्षात आले की, काहीतरी गडबड आहे. विमानात फार आवाज येत होता. विमान कधी डावीकडे, तर कधी उजवीकडे झुकत होते.

२००० मधील भीषण अपघाताची आठवण

१७ जुलै २००० रोजी पाटण्यात भीषण विमान अपघात झाला होता. कोलकाताहून दिल्लीकडे निघालेले विमान पाटण्याच्या गर्दनीबागमध्ये कोसळले होते. त्यात ६ स्थानिक नागरिकांसह ६० पेक्षा अधिक लोक ठार झाले होते. त्या भीषण अपघाताची रविवारी आठवण अनेकांना झाली. 

टॅग्स :pilotवैमानिकairplaneविमानAccidentअपघात