शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

देशभरातून कौतुक, मोनिकाच्या चतुराईमुळे वाचला विमानातील 185 प्रवाशांचा जीव

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2022 12:14 IST

पाटणा विमानतळ प्राधिकरणाने सांगितले की, सर्व प्रवासी सुरक्षित असून, त्यातील कोणीही जखमी झालेले नाही

पाटणा : पाटण्याहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाने उड्डाण घेताच इंजिनमध्ये आग भडकली. स्पाईस जेटच्या एसजी-७२५ या विमानात आग लागताच वैमानिकाने सुरक्षित लँडिंग केले व १८५ प्रवासी बचावले. मात्र, विमानाच्या इंजिनमधून धूर निघत असून, आग लागल्याची माहिती मिळताच प्रवासी काही काळ भयभीत झाले होते. याघटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्यात येणार आहे. मोनिका खन्ना या पायलट बनून या विमानाचं सारथ्य करत होत्या. मोनिकाने अतिशय कुशलतेनं विमानाचं लँडिंग करुन १८५ प्रवाशांचा जीव वाचवला. 

पाटणा विमानतळ प्राधिकरणाने सांगितले की, सर्व प्रवासी सुरक्षित असून, त्यातील कोणीही जखमी झालेले नाही. आग लागल्याची माहिती मिळताच अत्यंत सावधतेने विमानाचे लँडिंग करण्यात आले. आग का लागली, याची चौकशी केली जात आहे. तथापि, विमानाला एखाद्या पक्ष्याची टक्कर झाली असावी, याचा त्यांनी इन्कार केला नाही. फ्लाईट एसजी 723 ची पालयट इन कमांड कॅप्टन मोनिका यांना आग लागल्याची माहिती मिळताच संबंधित इंजिन बंद केले. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. स्पाईस जेटकडूनही मोनिका यांचा अभिनंदन करण्यात आलं आहे. कारण, पाटणा विमानतळावर लँडिंग एवढं सोपं नव्हतं. मोनिका यांच्यासह त्यांचे पायलट सहकारी बलप्रीत सिंह यांनी या दुर्घटनेवेळी सावधानता आणि चुतराई दाखवली, असे स्पाईस जेटने म्हटले आहे.  

पाटण्यातील फुलवारीशरीफ भागावरून विमान जात असताना स्थानिक लोकांनी त्यातून धूर निघताना पाहिला. लोकांनी तातडीने जिल्हा प्रशासन व विमानतळाला याची माहिती कळवली. यानंतर विमान सुरक्षितरीत्या पाटणा विमानतळावर उतरविण्यात आले. विमानातील प्रवाशांना अन्य विमानाने दिल्लीला पाठविले. विमानातील आगीवर तातडीने नियंत्रण मिळविण्यात आले. विमानात आगीमुळे जास्त नुकसान झाले नाही.

प्रवासी भयभीत

एका महिला प्रवाशाने सांगितले की, विमानात आग लागल्याचे कळताच सर्व प्रवासी भयभीत झाले होते. परंतु, विमानाच्या क्रू मेंबरनी स्थिती चांगल्या पद्धतीने हाताळली. विमानाने उड्डाण घेताच १०-१५ मिनिटांतच लक्षात आले की, काहीतरी गडबड आहे. विमानात फार आवाज येत होता. विमान कधी डावीकडे, तर कधी उजवीकडे झुकत होते.

२००० मधील भीषण अपघाताची आठवण

१७ जुलै २००० रोजी पाटण्यात भीषण विमान अपघात झाला होता. कोलकाताहून दिल्लीकडे निघालेले विमान पाटण्याच्या गर्दनीबागमध्ये कोसळले होते. त्यात ६ स्थानिक नागरिकांसह ६० पेक्षा अधिक लोक ठार झाले होते. त्या भीषण अपघाताची रविवारी आठवण अनेकांना झाली. 

टॅग्स :pilotवैमानिकairplaneविमानAccidentअपघात