शहरं
Join us  
Trending Stories
1
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
2
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
3
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
4
मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी? UIDAI ने तारीख बदलली!
5
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
6
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
7
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
8
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
9
वाशिमच्या मेडशी बायपासवर भीषण अपघात; दोन ठार, एक जखमी, दोघे थोडक्यात बचावले
10
लव जिहादच्या आरोपावर आमिर खानने दिलं उत्तर, म्हणाला, "माझ्या दोन्ही बहिणी अन् मुलीने..."
11
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
12
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
13
हायकू हायकू हायकू... म्हणजेच...; पुस्तकाच्या जन्माची गोष्ट!
14
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
15
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया
16
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
17
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
18
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
19
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
20
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक

NDA मधील घटकपक्षांचा संवाद तुटला?; लोक जनशक्ती पार्टी प्रमुखांनी केली बैठकीत 'ही' मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2019 19:08 IST

मार्च २०१८ मध्ये आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा देण्याच्या मागणीवरुन टीडीपीने एनडीएपासून दूर जाण्याचा निर्णय घेतला. 

नवी दिल्ली - महाराष्ट्रातील सत्तास्थापनेच्या तिढ्यातून भाजपा आणि शिवसेना यांच्यातील तणाव वाढला. अखेर शिवसेनेने एनडीएतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे एनडीए अर्थात नॅशनल डेमोक्रेटिक आघाडीत सर्वकाही ठीक आहे असं चित्र दिसत नाही. शिवसेनेपाठोपाठ इतरही घटक पक्ष समोर येऊन बोलू लागले आहेत. एनडीएतून बाहेर पडल्यानंतर पहिल्यांदाच गेल्या ३० वर्षात शिवसेना या बैठकीत सहभागी झाली नाही. 

या बैठकीनंतर लोक जनशक्ती पार्टीचे नवनियुक्त प्रमुख चिराग पासवान यांनी एनडीएमधील घटकपक्षांना एकत्र ठेवण्यासाठी एका संयोजकाची गरज असल्याचं सांगितले. घटकपक्षांमध्ये एकवाक्यता असली पाहिजे, त्यांच्यात संवाद असला पाहिजे यासाठी हा संयोजक नियुक्त करणं गरजेचं आहे असं त्यांनी सांगितले. यावेळी बोलताना ते म्हणाले की, पहिल्यांदा तेलुगू देशम पार्टी(TDP) ने एनडीएची साथ सोडली. त्यानंतर उपेंद्र कुशवाह यांच्या राष्ट्रीय लोकसमता पार्टीही वेगळी झाली. २०१८ च्या अखेर लोकसभा निवडणुकीतील जागा वाटपावर नाराज होत त्यांनी एनडीएपासून वेगळं होण्याचा निर्णय घेतला. मार्च २०१८ मध्ये आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा देण्याच्या मागणीवरुन टीडीपीने एनडीएपासून दूर जाण्याचा निर्णय घेतला. 

सध्या बिहारमध्ये भलेही भाजपा आणि नितीशकुमार यांची जेडीयू पार्टीसोबत असेल पण या दोघांमधीलही वाद अनेकदा समोर आला आहे. लोकसभा निवडणुकीनंतर जेडीयूला मोदी यांच्या मंत्रिमंडळात एक कॅबिनेट पद देण्यावरुन नितीशकुमार नाराज झाले. त्यांनी मंत्रिपद घेण्यास नकार दिला पण एनडीएसोबत राहिले. 

वाजपेयी यांच्या काळात संयोजक होतेमाजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या कारकिर्दीत एनडीएच्या घटकपक्षांमध्ये सुसंवाद ठेवण्यासाठी संयोजक नियुक्त होता. शरद यादव आणि जॉर्जं फर्नांडिससारखे नेते अनेक वर्ष यापदावर होते. २०१३ मध्ये जेडीयू आघाडीपासून वेगळे होऊन शरद यादव यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर एनडीएमधील संयोजक पद रिक्त आहे. 

२०१३ नंतर बदलली एनडीएची स्थिती२०१४ मध्ये नरेंद्र मोदी जेव्हा पहिल्यांदा पंतप्रधान झाले तेव्हा घटकपक्षाचे नेते सांगतात की, मोदी संसदेच्या प्रत्येक सत्रात एनडीएची बैठक बोलवतात आणि आघाडीबाबत काही तक्रारी समस्या सोडविण्याचे काम अमित शहा करतात. 

टॅग्स :prime ministerपंतप्रधानAmit Shahअमित शहाShiv SenaशिवसेनाBJPभाजपा