शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

‘सफरचंद’ ठरणार गेम चेंजर! भाजपसमोर नवे आव्हान; शेतकरी संघटनेने काँग्रेसला दिला पाठिंबा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2024 13:03 IST

उत्पादकांच्या समस्या दूर करण्यासाठी काहीही न केल्याचा आरोप

शिमला: हिमाचल प्रदेशमध्ये सफरचंद उत्पादक मतदारांची संख्या मोठी आहे, ते यावेळी भाजपला अडचणीत आणू शकतात.  गेल्या दहा वर्षांत त्यांचे प्रश्न सुटले नसल्याचा आरोप या शेतकऱ्यांनी केला आहे. दरम्यान, राज्यात मोठा प्रभाव असलेल्या संयुक्त किसान मंच (एसकेएम) या शेतकरी संघटनेने काँग्रेसला पाठिंबा दिला असून त्यांना सफरचंद तसेच इतर २७ संघटनांचा पाठिंबा आहे. ‘प्रोग्रेसिव्ह ग्रोअर्स असोसिएशन’चे अध्यक्ष लोकिंदर बिश्त यांनी आरोप केला की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठे दावे करूनही गेल्या दहा वर्षांत सफरचंद उत्पादकांच्या समस्या दूर करण्यासाठी काहीही केले नाही.

मागण्या काय?- १०० टक्के आयात शुल्क, कृषी वस्तू आणि उपकरणांवरील वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) रद्द करणे, कर्जमाफी आणि खते आणि कीटकनाशकांवर अनुदान.

४ हजार कोटींचा  व्यवसाय- सफरचंदाचे उत्पादन २०२२ मध्ये ३.५ कोटी बॉक्स आणि २०२३ मध्ये २ कोटी बॉक्स होते. राज्यातील सफरचंदाचा व्यवसाय सुमारे ४ हजार कोटी रुपये होता. मात्र सध्या उत्पदकांसमोर मोठी संकटे आहेत.

कुठे बसू शकतो फटका?- सफरचंद बाग प्रामुख्याने शिमला, मंडी, कुल्लू आणि किन्नौर जिल्ह्यांतील २१ विधानसभा मतदारसंघ आणि चंबा, सिरमौर, लाहौल आणि स्पीती, कांगडा आणि सोलन जिल्ह्यांतील काही भागात केली जाते.  १,१५,६८० हेक्टर क्षेत्रात फळबाग आहे.

प्रमुख सफरचंद उत्पादक क्षेत्र शिमला आणि मंडी लोकसभा मतदारसंघांतर्गत येतात. सफरचंद उत्पादनात तीन लाखांहून अधिक कुटुंबे थेट गुंतलेली आहेत. याचा परिणाम भाजपच्या मतांवर होण्याची शक्यता आहे. विरोधकांनीही या मुद्द्यावर आवाज उठविला आहे.

टॅग्स :Himachal Pradeshहिमाचल प्रदेशFarmerशेतकरी