रेल्वे क्रॉसिंगवरील अपघात टाळण्यासाठी जनसामान्यांसह संस्थांना आवाहन
By Admin | Updated: December 22, 2014 23:11 IST2014-12-22T23:11:57+5:302014-12-22T23:11:57+5:30
नवी दिल्ली- मनुष्यविरहित रेल्वे क्रॉसिंगवर होणारे भीषण अपघात टाळण्याच्या हेतूने सरकारने जनसामान्यांसह शैक्षणिक संस्था, स्वयंसेवी संस्था, सामाजिक संस्थांना मदतीसाठी पुढे येण्याचे आवाहन केले आहे. देशात अशा मनुष्यविरहित रेल्वेक्रॉसिंगची संख्या ११ हजारांहून अधिक आहे.

रेल्वे क्रॉसिंगवरील अपघात टाळण्यासाठी जनसामान्यांसह संस्थांना आवाहन
न ी दिल्ली- मनुष्यविरहित रेल्वे क्रॉसिंगवर होणारे भीषण अपघात टाळण्याच्या हेतूने सरकारने जनसामान्यांसह शैक्षणिक संस्था, स्वयंसेवी संस्था, सामाजिक संस्थांना मदतीसाठी पुढे येण्याचे आवाहन केले आहे. देशात अशा मनुष्यविरहित रेल्वेक्रॉसिंगची संख्या ११ हजारांहून अधिक आहे. रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी लोकसभेला दिलेल्या एका उत्तरात ही माहिती देताना, रेल्वे रूळ ओलांडत असताना मोबाईलचा वापर करणे, इलेट्रॉनिक उपकरणांचा वापर करणे, वाढती लोकसंख्या यामुळेही अपघातात वाढ झाल्याचे म्हटले. रेल्वे क्रॉसिंगवरील अपघात कमी करण्यासाठी रेल्वे विभागाने अनेक उपाय योजले असून लवकरच राज्यातील पोलीस प्रमुखांची एक बैठकही आयोजित केली जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली. एका जाहिरातीद्वारे शैक्षणिक संस्था, स्वयंसेवी संस्था व सामाजिक संघटनांना त्यांचे स्वयंसेवक या रेल्वे क्रॉसिंगवर तैनात करण्यासाठी पुरविण्याचे आवाहन केले जाणार असल्याचे रेल्वेमंत्र्यांनी सांगितले. अशा मनुष्यरहित रेल्वे क्रॉसिंगवर २०११ मध्ये १४,९७३, २०१२ मध्ये १६,३३६ तर २०१३ मध्ये १९,९९७ जण ठार झाले होते तर २०१४ च्या ऑक्टोबरपर्यंत ही संख्या १८,७३५ पर्यंत पोहोचली होती.