शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Scam Pune: नवी माहिती! पार्थ पवारांनी सहीचे अधिकार दिले होते दिग्विजय पाटलांना, ठराव समोर आल्यानं वेगळं वळण
2
पार्थ पवारांना डेटा सेंटर म्हणून एवढी मोठी सूट मिळाली, पण...; पुण्यातील जमीन घोटाळ्यात मोठी माहिती समोर
3
'जरांगे, थोतांड करू नका! आरोपी यांचेच, आरोपही हेच करणार'; हत्येची सुपारी दिल्याच्या आरोपावर धनंजय मुंडेंचा संताप
4
"मते चोरून सत्तेत आलेल्यांनीच जमीन चोरली, कारण त्यांना..."; राहुल गांधींचा पार्थ पवार भूखंड खरेदी प्रकरणावरून घणाघात
5
हात मिळवता मिळवता एकमेकांचे पाय खेचू लागले चीन-अमेरिका; China च्या एका निर्णयानं ट्रम्प यांचा तिळपापड
6
Dental Care: टार्टर आणि प्लाक दातांचे मुख्य शत्रू, करू शकतात गंभीर नुकसान; वेळीच घ्या 'ही' काळजी 
7
केक कापला, डीजे लावला आणि..., शेतकऱ्याने दणक्यात साजरा केला रेड्याचा वाढदिवस
8
१० लोकांना संपवलं, २७ जणांना मारण्याच्या तयारीत; नर्स रुग्णांच्या जीवावर का उठली? कारण ऐकाल तर..
9
माझी अन् त्यांची एकदा नार्को टेस्ट करा; जरांगे पाटलांच्या आरोपांवर धनंजय मुंडेंचे प्रत्युत्तर
10
चिकन नेकजवळ भारतीय लष्करानं केलं असं काम, शत्रूची प्रत्येक चाल होणार फेल
11
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दर घसरले; खरेदी करण्यापूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे लेटेस्ट रेट
12
मी काका झालो! कौशल कुटुंबात आला छोटा पाहुणा; विकीचा भाऊ सनीने व्यक्त केला आनंद
13
IPS Aakash Shrishrimal : एक नंबर! वडील उद्योगपती, आई LIC एजंट, बहीण CA... अभिनेत्रीचा पती आहे IPS ऑफिसर
14
Crime: चाकूचा धाक दाखवून परप्रांतीय कामगाराला मारहाण; पाय चाटण्यास भाग पाडले!
15
सर्वात व्यस्त दिल्ली विमानतळावर ‘ट्रॅफिक जाम’! ३०० हून अधिक विमानांना विलंब; पार्किंगलाही जागा नाही!
16
घर खरेदी करण्याची योग्य वेळ कोणती? तुमच्या पगारावर EMI चा किती बोजा असावा, 'हे' गणित तपासा!
17
ज्ञानेश कुमार निवृत्तीनंतर शांतपणे आयुष्य जगता येणार नाही..; प्रियंका गांधींचा निवडणूक आयुक्तांना इशारा
18
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतली अण्णा हजारेंची भेट; नेमके काय बोलणे झाले? चर्चांना उधाण
19
'इंग्रजांची साथ; 52 वर्षे तिरंगा फडकवला नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपा-RSS वर गंभीर आरोप
20
बँक कर्मचाऱ्यांनी स्थानिक भाषेतच बोलावं, अर्थमंत्री निर्मला सीतारामन का म्हणाल्या असं?

मोदींचे आवाहन, पावसाचे पाणी अडवा आणि जिरवा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2019 06:27 IST

देशभरातील सरपंचांना पंतप्रधानांचे व्यक्तिगत पत्र

नवी दिल्ली : अनेक राज्यांच्या ग्रामीण भागांत उन्हाळ्यात निर्माण होणारी तीव्र पाणीटंचाई लक्षात घेता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातील सरपंचांना व्यक्तिगत पत्र लिहून पावसाचे पाणी अडविण्याचे आणि जिरविण्याचे कळकळीचे आवाहन केले आहे.पंतप्रधानांनी प्रत्येक सरपंचाच्या नावे स्वत:च्या स्वाक्षरीने लिहिलेली ही पत्रे सर्व जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आली असून, त्यांच्याकडून ती गावोगाव सरपंचांना पोहोचवली जात आहेत.प्रत्येक सरपंचाशी आणि ग्रापंचायत सदस्याशी व्यक्तिगत संवाद साधण्याच्या भाषेत लिहिलेल्या या पत्रात मोदी लिहितात की, आता पावसाळा तोंडावर आला आहे. परमेश्वराच्या कृपेने आपल्या देशात मुबलक पाऊस पडतो. देवाच्या दयेने पावसाळ्यात मिळणारे हे पाणी, वर्षाच्या नंतरच्या महिन्यांत उपलब्ध व्हावे यासाठी जास्तीत जास्त पाणी अडविण्याचे व जिरविण्याचे हरतºहेचे प्रयत्न आणि व्यवस्था आपण सर्वांनी करायला हवी.काय म्हटले आहे पत्रात?सरपंचांनी ग्रामसभा भरवून त्यात हे पत्र सर्वांना वाचून दाखवावे आणि पावसाचे पाणी अडविण्यासाठी गावात काय व्यवस्था करता येईल, यावर सर्वांनी मिळून चर्चा करावी. उपलब्ध पाण्याचा प्रत्येक थेंब वाचविण्यासाठी तुम्ही सर्वजण शक्य ते सर्व प्रयत्न कराल, असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला. पावसाळ्यात वाहून जाणारे पाणी अडविण्यासाठी गावांमध्ये योग्य ठिकाणी कोल्हापुरी पद्धतीचे बंधारे व गावतळी बांधण्याची सूचनाही मोदींनी या पत्रात केली आहे. जलसंधारण योजनांचा आढावा नव्या मोदी सरकारमध्ये हाच हेतू डोळ्यापुढे ठेवून ‘जलशक्ती’ हे स्वतंत्रखाते निर्माण करण्यात आले आहे. या मंत्रालयाने काही दिवसांपूर्वी घेतलेल्या आंतरराज्य मंत्रीस्तरीय बैठकीत देशाच्या विविध भागांतील पाणीटंचाई व राज्यांकडून राबविल्या जाणाºया जलसंधारण योजना यांचा आढावा घेतला.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी