शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

मोदींचे आवाहन, पावसाचे पाणी अडवा आणि जिरवा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2019 06:27 IST

देशभरातील सरपंचांना पंतप्रधानांचे व्यक्तिगत पत्र

नवी दिल्ली : अनेक राज्यांच्या ग्रामीण भागांत उन्हाळ्यात निर्माण होणारी तीव्र पाणीटंचाई लक्षात घेता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातील सरपंचांना व्यक्तिगत पत्र लिहून पावसाचे पाणी अडविण्याचे आणि जिरविण्याचे कळकळीचे आवाहन केले आहे.पंतप्रधानांनी प्रत्येक सरपंचाच्या नावे स्वत:च्या स्वाक्षरीने लिहिलेली ही पत्रे सर्व जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आली असून, त्यांच्याकडून ती गावोगाव सरपंचांना पोहोचवली जात आहेत.प्रत्येक सरपंचाशी आणि ग्रापंचायत सदस्याशी व्यक्तिगत संवाद साधण्याच्या भाषेत लिहिलेल्या या पत्रात मोदी लिहितात की, आता पावसाळा तोंडावर आला आहे. परमेश्वराच्या कृपेने आपल्या देशात मुबलक पाऊस पडतो. देवाच्या दयेने पावसाळ्यात मिळणारे हे पाणी, वर्षाच्या नंतरच्या महिन्यांत उपलब्ध व्हावे यासाठी जास्तीत जास्त पाणी अडविण्याचे व जिरविण्याचे हरतºहेचे प्रयत्न आणि व्यवस्था आपण सर्वांनी करायला हवी.काय म्हटले आहे पत्रात?सरपंचांनी ग्रामसभा भरवून त्यात हे पत्र सर्वांना वाचून दाखवावे आणि पावसाचे पाणी अडविण्यासाठी गावात काय व्यवस्था करता येईल, यावर सर्वांनी मिळून चर्चा करावी. उपलब्ध पाण्याचा प्रत्येक थेंब वाचविण्यासाठी तुम्ही सर्वजण शक्य ते सर्व प्रयत्न कराल, असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला. पावसाळ्यात वाहून जाणारे पाणी अडविण्यासाठी गावांमध्ये योग्य ठिकाणी कोल्हापुरी पद्धतीचे बंधारे व गावतळी बांधण्याची सूचनाही मोदींनी या पत्रात केली आहे. जलसंधारण योजनांचा आढावा नव्या मोदी सरकारमध्ये हाच हेतू डोळ्यापुढे ठेवून ‘जलशक्ती’ हे स्वतंत्रखाते निर्माण करण्यात आले आहे. या मंत्रालयाने काही दिवसांपूर्वी घेतलेल्या आंतरराज्य मंत्रीस्तरीय बैठकीत देशाच्या विविध भागांतील पाणीटंचाई व राज्यांकडून राबविल्या जाणाºया जलसंधारण योजना यांचा आढावा घेतला.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी