शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
2
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
3
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
4
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
5
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय
6
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
7
याला म्हणतात धमाका शेअर...! केवळ 2 वर्षांत दिला 900 टक्के परतावा, आजही करतोय मालामाल; तुमच्याकडे आहे का?
8
सचिन तेंडुलकरसोबत अफेअरची चर्चा, आता अनेक वर्षांनंतर शिल्पा शिरोडकर सोडलं मौन, म्हणाली...
9
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
10
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी कर्णधार सूर्याने टीम इंडियाला दिला असा सल्ला, म्हणाला फोन बंद करा आणि...  
11
Scuba Diving : १०, २० की ३० मीटर? पाण्यात नेमके किती खोलवर जातात स्कूबा डायव्हर्स?
12
Navratri 2025: नवरात्रीत का घ्यावा सात्त्विक आहार? त्यामुळे शरीराला कोणते लाभ होतात?
13
VIDEO: माकडाने अचानक महिलेच्या डोक्यावरून हिसकावला गॉगल.. पुढे जे झालं ते पाहून व्हाल थक्क
14
"मी पुन्हा सांगतो, भारताकडे एक कमकुवत पंतप्रधान", H-1B व्हिसा प्रकरणावरून राहुल गांधींचा हल्लाबोल
15
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!
16
डोनाल्ड ट्रम्प यांचा H-1B व्हिसा बॉम्ब होणार बॅकफायर, अमेरिकेचंच होणार नुकसान, तर भारताचा...
17
सर्वपित्री अमावास्या २०२५: पूर्वज स्मरणासह ‘ही’ कामे अवश्य कराच; पुण्य-वरदान-कृपा लाभेल!
18
तुमचा पुण्यातील रोजचा प्रवास ३५ किमी आहे, तर तुम्ही कोणती स्कूटर, मोटरसायकल घ्यावी? 
19
Navratri 2025: नवरात्रीत घट बसवण्याआधी देवघरात 'हे' बदल केले का? नसेल तर आजच करा
20
परदेशात फिरायला जाणाऱ्या प्रवाशांनी शोधली 'ही' नवीन युक्ती; नेमका काय आहे 'फ्लाइंग नेकेड ट्रेंड'?

मोदींचे आवाहन, पावसाचे पाणी अडवा आणि जिरवा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2019 06:27 IST

देशभरातील सरपंचांना पंतप्रधानांचे व्यक्तिगत पत्र

नवी दिल्ली : अनेक राज्यांच्या ग्रामीण भागांत उन्हाळ्यात निर्माण होणारी तीव्र पाणीटंचाई लक्षात घेता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातील सरपंचांना व्यक्तिगत पत्र लिहून पावसाचे पाणी अडविण्याचे आणि जिरविण्याचे कळकळीचे आवाहन केले आहे.पंतप्रधानांनी प्रत्येक सरपंचाच्या नावे स्वत:च्या स्वाक्षरीने लिहिलेली ही पत्रे सर्व जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आली असून, त्यांच्याकडून ती गावोगाव सरपंचांना पोहोचवली जात आहेत.प्रत्येक सरपंचाशी आणि ग्रापंचायत सदस्याशी व्यक्तिगत संवाद साधण्याच्या भाषेत लिहिलेल्या या पत्रात मोदी लिहितात की, आता पावसाळा तोंडावर आला आहे. परमेश्वराच्या कृपेने आपल्या देशात मुबलक पाऊस पडतो. देवाच्या दयेने पावसाळ्यात मिळणारे हे पाणी, वर्षाच्या नंतरच्या महिन्यांत उपलब्ध व्हावे यासाठी जास्तीत जास्त पाणी अडविण्याचे व जिरविण्याचे हरतºहेचे प्रयत्न आणि व्यवस्था आपण सर्वांनी करायला हवी.काय म्हटले आहे पत्रात?सरपंचांनी ग्रामसभा भरवून त्यात हे पत्र सर्वांना वाचून दाखवावे आणि पावसाचे पाणी अडविण्यासाठी गावात काय व्यवस्था करता येईल, यावर सर्वांनी मिळून चर्चा करावी. उपलब्ध पाण्याचा प्रत्येक थेंब वाचविण्यासाठी तुम्ही सर्वजण शक्य ते सर्व प्रयत्न कराल, असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला. पावसाळ्यात वाहून जाणारे पाणी अडविण्यासाठी गावांमध्ये योग्य ठिकाणी कोल्हापुरी पद्धतीचे बंधारे व गावतळी बांधण्याची सूचनाही मोदींनी या पत्रात केली आहे. जलसंधारण योजनांचा आढावा नव्या मोदी सरकारमध्ये हाच हेतू डोळ्यापुढे ठेवून ‘जलशक्ती’ हे स्वतंत्रखाते निर्माण करण्यात आले आहे. या मंत्रालयाने काही दिवसांपूर्वी घेतलेल्या आंतरराज्य मंत्रीस्तरीय बैठकीत देशाच्या विविध भागांतील पाणीटंचाई व राज्यांकडून राबविल्या जाणाºया जलसंधारण योजना यांचा आढावा घेतला.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी