शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

'कंपन्यांच्या कामात मुद्दाम अडथळा आणतोय भारत', अ‍ॅप बंदीवरून चीन भडकला; आता दिली अशी धमकी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2020 17:04 IST

यापूर्वीही, चिनी कंपन्यांना, मंदीचा फायदा घेत भारतीय कंपन्यांचे अधिग्रहण करण्यापासून रोखण्यासाठी, भारत सरकारने काही कायदेशी नियम बनवले होते. तेव्हा चीनने डब्लूटीओमध्ये जाण्याची धमकी दिली होती.

ठळक मुद्देभारताने सर्वप्रथम 59 चिनी मोबाईल अ‍ॅप्सवर बंदी घातली.भारताने पुन्हा बंदी घातलेल्या 59 अ‍ॅप्सचे क्लोन असलेल्या 47 अ‍ॅप्सवरही बंदी घातली आहे. जवळपास आणखी 200 मोबाईल अ‍ॅप्सची यादीही भारताने तयार केली आहे.

नवी दिल्ली -भारतानेचीन विरोधात आर्थिक प्रतिबंध घालण्याच्या दिशेने पावले टाकायला सुरुवात केली आहे. यामुळे चीन अस्वस्त झाल्याचे दिसत आहे. भारताने सर्वप्रथम 59 चिनी मोबाईल अ‍ॅप्सवर बंदी घातली. यानंतर यांचे क्लोन असलेल्या 47 अ‍ॅप्सवरही बंदी घालण्यात आली. एवढेच नाही, तर जवळपास आणखी 200 मोबाईल अ‍ॅप्सची यादीही भारताने तयार केली आहे. या अ‍ॅप्सना कुठल्याही क्षणी भारत बाहेरचा रस्ता दाखवू शकतो. यामुळे आता चीनची अस्वस्थता अधिक वाढली आहे.

भारताने घेतलेल्या या भूमिकेवर नवी दिल्ली येथील चिनी दुतावासाने तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. हे चिनी कंपन्यांच्या कायदेशीर अधिकारांचे उल्लंघन असल्याचे दुतावासाने म्हटले आहे. एवढेच नाही, तर चिनी कंपन्यांच्या हिताच्या दृष्टीने सर्व प्रकारची आवश्यक ती पावले उचलली जातील, अशी धमकीही दुतावासाने दिली आहे.

यापूर्वीही, चिनी कंपन्यांना, मंदीचा फायदा घेत भारतीय कंपन्यांचे अधिग्रहण करण्यापासून रोखण्यासाठी, भारत सरकारने काही कायदेशी नियम बनवले होते. तेव्हा चीनने  डब्लूटीओमध्ये जाण्याची धमकी दिली होती. यासंदर्भात जेव्हा विचारण्यात आले, तेव्हा चिनी दूतावासाच्या प्रवक्त्या शी रोंग म्हणाल्या, 'भारत सरकारने ज्या पद्धतीने वुई चॅटसह चीनच्या 59 अ‍ॅपवर बंदी घातली, ते चिनी कंपन्यांच्या कायदेशीर अधिकाराचे उल्लंघण आहे. आम्ही भारतासमोर आमचे म्हणणे ठेवले आहे. तसेच त्यांनी घेतलेल्या या निर्णयात सुधारणा करावी, असेही आम्ही म्हटले आहे. याशिवाय, चीन सरकारने आपल्या कंपन्यांना, त्या ज्या देशात काम करत असतील, त्या देशांच्या कायद्यांचे काटेकोरपणे पालन करावे, असे सांगितले आहे, असेही रोंग म्हणाल्या.

चीन आवश्यक ते पाऊल उचलेल - रोंग'चिनी कंपन्यांचे कायदेशीर अधिकार, तसेच चीनी गुंतवणूकदारांसह आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदारांच्या हितांचे बाजारातील नियमांप्रमाणे संरक्षण करणे, हे भारताचे कर्तव्य आहे. भारत आणि चीन यांच्यातील प्रायोगिक सहकार्य दोन्ही देशांच्या हिताचे आहे. मात्र, अशा प्रकारच्या हस्तक्षेपामुळे नुकसान होते आणि हे भारताच्या हिताचेही नाही,' असे रोंग यांनी म्हटले आहे. तसेच चीन आपल्या कंपन्यांच्या हिताच्या रक्षणासाठी आवश्यक ती सर्व पावले उचलेले, असेही रोंग यांनी म्हटले आहे.

महत्त्वाच्या बातम्या -

CoronaVirus : चिंपांजीच्या व्हायरसपासून बनलीय ऑक्सफर्डची कोरोना लस; 'ही' आहे खासियत, 'हे' आहेत साईड इफेक्ट्स

आई शप्पथ, एवढं बील! : भज्जीच्या घराचं वीज बील पाहून व्हाल अवाक; म्हणाला...

धक्कादायक! आता 'या' देशाच्या मागे लागला चीन, थेट 'कब्‍जा' करण्याच्या तयारीत; सुरू केली युद्धाची तयारी

भारत-इस्रायलची कमाल!; आता फक्त आवाज अन् श्वासावरून मिळणार कोरोना चाचणीचा अहवाल

100 कोटींचे बजेट, 3 मजले अन् तब्बल 318 खांब... असे असेल अयोध्येतील भव्य राम मंदिर

भारताचा चीनवर दुसरा डिजिटल स्ट्राईक; एकाच झटक्यात पुन्हा 47 अ‍ॅप्सवर बंदी!

 

टॅग्स :chinaचीनIndiaभारतTik Tok Appटिक-टॉकNarendra Modiनरेंद्र मोदीCentral Governmentकेंद्र सरकार