शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

'कंपन्यांच्या कामात मुद्दाम अडथळा आणतोय भारत', अ‍ॅप बंदीवरून चीन भडकला; आता दिली अशी धमकी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2020 17:04 IST

यापूर्वीही, चिनी कंपन्यांना, मंदीचा फायदा घेत भारतीय कंपन्यांचे अधिग्रहण करण्यापासून रोखण्यासाठी, भारत सरकारने काही कायदेशी नियम बनवले होते. तेव्हा चीनने डब्लूटीओमध्ये जाण्याची धमकी दिली होती.

ठळक मुद्देभारताने सर्वप्रथम 59 चिनी मोबाईल अ‍ॅप्सवर बंदी घातली.भारताने पुन्हा बंदी घातलेल्या 59 अ‍ॅप्सचे क्लोन असलेल्या 47 अ‍ॅप्सवरही बंदी घातली आहे. जवळपास आणखी 200 मोबाईल अ‍ॅप्सची यादीही भारताने तयार केली आहे.

नवी दिल्ली -भारतानेचीन विरोधात आर्थिक प्रतिबंध घालण्याच्या दिशेने पावले टाकायला सुरुवात केली आहे. यामुळे चीन अस्वस्त झाल्याचे दिसत आहे. भारताने सर्वप्रथम 59 चिनी मोबाईल अ‍ॅप्सवर बंदी घातली. यानंतर यांचे क्लोन असलेल्या 47 अ‍ॅप्सवरही बंदी घालण्यात आली. एवढेच नाही, तर जवळपास आणखी 200 मोबाईल अ‍ॅप्सची यादीही भारताने तयार केली आहे. या अ‍ॅप्सना कुठल्याही क्षणी भारत बाहेरचा रस्ता दाखवू शकतो. यामुळे आता चीनची अस्वस्थता अधिक वाढली आहे.

भारताने घेतलेल्या या भूमिकेवर नवी दिल्ली येथील चिनी दुतावासाने तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. हे चिनी कंपन्यांच्या कायदेशीर अधिकारांचे उल्लंघन असल्याचे दुतावासाने म्हटले आहे. एवढेच नाही, तर चिनी कंपन्यांच्या हिताच्या दृष्टीने सर्व प्रकारची आवश्यक ती पावले उचलली जातील, अशी धमकीही दुतावासाने दिली आहे.

यापूर्वीही, चिनी कंपन्यांना, मंदीचा फायदा घेत भारतीय कंपन्यांचे अधिग्रहण करण्यापासून रोखण्यासाठी, भारत सरकारने काही कायदेशी नियम बनवले होते. तेव्हा चीनने  डब्लूटीओमध्ये जाण्याची धमकी दिली होती. यासंदर्भात जेव्हा विचारण्यात आले, तेव्हा चिनी दूतावासाच्या प्रवक्त्या शी रोंग म्हणाल्या, 'भारत सरकारने ज्या पद्धतीने वुई चॅटसह चीनच्या 59 अ‍ॅपवर बंदी घातली, ते चिनी कंपन्यांच्या कायदेशीर अधिकाराचे उल्लंघण आहे. आम्ही भारतासमोर आमचे म्हणणे ठेवले आहे. तसेच त्यांनी घेतलेल्या या निर्णयात सुधारणा करावी, असेही आम्ही म्हटले आहे. याशिवाय, चीन सरकारने आपल्या कंपन्यांना, त्या ज्या देशात काम करत असतील, त्या देशांच्या कायद्यांचे काटेकोरपणे पालन करावे, असे सांगितले आहे, असेही रोंग म्हणाल्या.

चीन आवश्यक ते पाऊल उचलेल - रोंग'चिनी कंपन्यांचे कायदेशीर अधिकार, तसेच चीनी गुंतवणूकदारांसह आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदारांच्या हितांचे बाजारातील नियमांप्रमाणे संरक्षण करणे, हे भारताचे कर्तव्य आहे. भारत आणि चीन यांच्यातील प्रायोगिक सहकार्य दोन्ही देशांच्या हिताचे आहे. मात्र, अशा प्रकारच्या हस्तक्षेपामुळे नुकसान होते आणि हे भारताच्या हिताचेही नाही,' असे रोंग यांनी म्हटले आहे. तसेच चीन आपल्या कंपन्यांच्या हिताच्या रक्षणासाठी आवश्यक ती सर्व पावले उचलेले, असेही रोंग यांनी म्हटले आहे.

महत्त्वाच्या बातम्या -

CoronaVirus : चिंपांजीच्या व्हायरसपासून बनलीय ऑक्सफर्डची कोरोना लस; 'ही' आहे खासियत, 'हे' आहेत साईड इफेक्ट्स

आई शप्पथ, एवढं बील! : भज्जीच्या घराचं वीज बील पाहून व्हाल अवाक; म्हणाला...

धक्कादायक! आता 'या' देशाच्या मागे लागला चीन, थेट 'कब्‍जा' करण्याच्या तयारीत; सुरू केली युद्धाची तयारी

भारत-इस्रायलची कमाल!; आता फक्त आवाज अन् श्वासावरून मिळणार कोरोना चाचणीचा अहवाल

100 कोटींचे बजेट, 3 मजले अन् तब्बल 318 खांब... असे असेल अयोध्येतील भव्य राम मंदिर

भारताचा चीनवर दुसरा डिजिटल स्ट्राईक; एकाच झटक्यात पुन्हा 47 अ‍ॅप्सवर बंदी!

 

टॅग्स :chinaचीनIndiaभारतTik Tok Appटिक-टॉकNarendra Modiनरेंद्र मोदीCentral Governmentकेंद्र सरकार