अनेक विदेशी लोक भारतात अवैधरीत्या राहत असून, त्यांना शोधून काढण्याची मोहीम सध्या तीव्र झाली आहे. पहलगाम हल्ल्यानंतर यंत्रणा अधिक सतर्क झाल्या असून, देशभरातून असे लोक पिंजून शोधून काढले जात आहेत. अशातच एक विचित्र प्रकार समोर आला आहे. भारतात राहण्यासाठी ५ बांगलादेशी नागरिकांनी अशी शक्कल लढवली की, सगळेच हैराण झाले.
दिल्लीपोलिसांनी १८ बांगलादेशी नागरिकांना ताब्यात घेतले असून, यात ५ किन्नरांचा देखील समावेश आहे. भारतात राहण्यासाठी या ५ बांगलादेशी नागरिकांनी चक्क लिंग परिवर्तन शस्त्रक्रिया करून, किन्नर बनून राहण्याचा मार्ग निवडला. केवळ भारतातून पुन्हा बांगलादेशमध्ये जाऊन राहावे लागू नये, यासाठी त्यांनी हा प्रकार केल्याचे उघडकीस आले. इतकंच नाही तर, बांगलादेशात असलेल्या आपल्या कुटुंबाशी संपर्क साधण्यासाठी ते बंदी घातलेल्या 'आयएमओ' या अॅपचा वापर करत होते. पोलिसांनी या लोकांकडून ७ फोन जप्त केले आहेत.
अशोक विहार परिसरात पोलिसांची कारवाई
दिल्लीच्या अशोक विहार परिसरात पोलिसांनी ही कारवाई केली. बेकायदेशीररित्या भारतात राहणाऱ्या बांगलादेशी नागरिकांना मोहीम सुरू असतानाच पोलिसांनी या भागात काही बांगलादेशी नागरिक लपून राहत असल्याची माहिती मिळाली. ही माहिती मिळताच एसीपी राजीव, निरीक्षक विपिन, एसआय श्यामबीर आणि टीमच्या इतर सदस्यांना तात्काळ या परिसराला वेढा घालून तब्बल १०० झोपड्या आणि १५० गल्ल्या पिंजून काढल्या.
संपूर्ण कुटुंब बेकायदेशीररित्या भारतात
या दरम्यान पोलिसांनी एका संशयास्पद व्यक्तीला ताब्यात घेतले. या व्यक्तीने चौकशीच्या सुरुवातीस पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. पण, नंतर त्याने आपण बांगलादेशी नागरिक असल्याची कबुली दिली. त्याच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे, त्याच्या कुटुंबातील इतर लोकांनाही ताब्यात घेण्यात आले. यात ३ लहान मुलांसह १३ लोक बेकायदेशीररित्या भारतात राहत असल्याचे समोर आले.
भारतात राहण्यासाठी केली शस्त्रक्रियायांचा तपासात पोलिसांनी ५ तृतीयपंथींना देखील पकडले. हे लोक रेड लाईट एरिया आणि इतर भागांमध्ये लोकांकडून पैसे मागण्याचे काम करत होते. चौकशी दरम्यान त्यांनी बांगलादेशी नागरिक असल्याची कबुली दिली आणि ओळख लपवून भारतात राहण्यासाठी काही हार्मोनल उपचार आणि किरकोळ शस्त्रक्रिया केल्याचे सांगितले. या सगळ्यांना आता पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्यांची चौकशी सुरू आहे.