शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

Anurag Thakur : "तेव्हा तुम्हीच मंत्री होतात...": महिला आरक्षण विधेयकावर अनुराग ठाकूरांचा सिब्बलांना टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2023 10:40 IST

Anurag Thakur Slams Kapil Sibal : कपिल सिब्बल यांनी महिला आरक्षणाच्या मुद्द्यावरून सरकारला धारेवर धरलं आहे. आता केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी या मुद्द्यावरून कपिल सिब्बल यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.

राज्यसभा खासदार कपिल सिब्बल यांनी महिला आरक्षणाच्या मुद्द्यावरून सरकारला धारेवर धरलं आहे. आता केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी या मुद्द्यावरून कपिल सिब्बल यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. अनुराग ठाकूर म्हणाले की, विधेयकाचा मसुदा तयार करताना कपिल सिब्बल कायदा मंत्री होते. 2008 मध्ये ते पहिल्यांदा मांडण्यात आले होते आणि त्यांना माहीत आहे की तत्कालीन काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूपीएने हे विधेयक मंजूर करण्याचा कधीच विचार केला नव्हता. महिला नेत्यांना संसद आणि इतर विधिमंडळात योग्य प्रतिनिधित्व देण्यासाठी महिला आरक्षण विधेयक काल संसदेच्या विशेष अधिवेशनात सभागृहात मांडण्यात आले.

अनुराग ठाकूर यांनी आरोप केला की, काँग्रेस 2010 मध्ये सत्तेत नव्हती, महिला नेत्यांना आरक्षण देऊ इच्छित नाही आणि आताही करू इच्छित नाही. याआधी मंगळवारी सिब्बल म्हणाले, "त्यांना (भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीए) 2024 च्या महिला आरक्षण विधेयकाचा राजकीय फायदा घ्यायचा आहे, लोकांना सांगत आहे की त्यांनी एक ऐतिहासिक कायदा आणला आहे. त्यांनी हे 2014 मध्ये करायला हवे होते. ते काय आहे? ते ऐतिहासिक आहे का? महिला आरक्षण विधेयकाच्या अंमलबजावणीपूर्वी जनगणना आणि परिसीमन होईल. जर जनगणना आणि परिसीमन केले नाही तर काय होईल?"

कपिल सिब्बल यांच्या टीकेला उत्तर देताना अनुराग ठाकूर यांनी एएनआयला सांगितलं की, "ते तेव्हा मंत्री होते (2008 मध्ये जेव्हा यूपीएच्या काळात असाच कायदा आणला गेला होता). त्यांना माहीत होतं की काँग्रेस फक्त कायदा आणण्याचं नाटक करत आहे. 2008 मध्ये हे विधेयक आणले गेले आणि वर्षभरानंतर देशात सार्वत्रिक निवडणुका झाल्या. मात्र, तो मंजूर करण्याऐवजी कायद्याचा मसुदा स्थायी समितीकडे पाठवण्यात आला. तेव्हा महिलांना आरक्षण देण्याचा त्यांचा (काँग्रेसचा) हेतू नव्हता. तसेच त्यांना आताही ते नको आहे."

भाजपा नेते म्हणाले, "काँग्रेसने इंदिरा गांधींच्या नेतृत्वाखाली महिलांना आरक्षण दिले नाही किंवा सोनिया गांधींच्या नेतृत्वाखाली त्या दिशेने कोणतीही प्रगती केली नाही. नेहरूजींच्या नेतृत्वाखाली किंवा राजीव गांधी यांच्या नेतृत्वाखाली महिलांसाठी आरक्षण नाही." केंद्रीय कायदा मंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी मंगळवारी नवीन संसद भवनात लोकसभेच्या पहिल्या बैठकीत हे विधेयक मांडले. त्याला 'नारी शक्ती वंदन कायदा' असं नाव देण्यात आलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :Anurag Thakurअनुराग ठाकुरkapil sibalकपिल सिब्बल