शहरं
Join us  
Trending Stories
1
Satyapal Malik Death: जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
2
“मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंना चांगले यश मिळेल”; महायुतीतील नेत्याचा मोठा दावा
3
Satyapal Malik: 'मला सत्य सांगायचे आहे', शेवटच्या पोस्टमध्ये काय म्हणाले होते सत्यपाल मलिक?
4
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! दिवाळीपूर्वी पगारात होणार इतकी वाढ? कोणाला मिळणार फायदा?
5
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
6
"Help Me! गर्लफ्रेंडसोबत फिरायला जायचंय..."; बॉयफ्रेंडने लावले UPI स्कॅनर असलेले पोस्टर
7
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', 'ऑपरेशन सिंदूर'बाबतच्या चर्चेवरून PM मोदींचा टोला
8
Mumbai: कबुतरांना दाणे टाकताना रोखलं, वृद्ध व्यक्तीसह त्यांच्या मुलावर लोखंडी रॉडने हल्ला!
9
शर्टचा फोटो, अज्ञात चेहरा...४३४ कोटींच्या एमडी ड्रग्जबाबत खुलासा; कर्नाटकातून मुंबईत कसं यायचे?
10
शांतता अन् निसर्ग सौंदर्याचा अनोखा मिलाफ; बीच लव्हर असाल तर भारतातील 'या' समुद्र किनाऱ्यांना नक्की भेट द्या!
11
"कोण खरा भारतीय, कोण नाही हे कोर्ट ठरवू शकत नाही’’, प्रियंका गांधींनी केला राहुल गांधींचा बचाव
12
ये वर्दी सिर्फ हिंमत नही बलिदान भी मांगती है! फरहान अख्तरच्या '१२० बहादुर'चा टीझर रिलीज
13
राज ठाकरेंशी युतीला कौल? इंडिया-मविआवर पाणी सोडण्याची तयारी? दिल्लीत उद्धव ठाकरेंची परीक्षा
14
Anil Ambani at ED Office : अनिल अंबानी ED च्या कार्यालयात दाखल; १७ हजार कोटींच्या कर्जाच्या फसवणुकीप्रकरणी झाले हजर
15
मी तिचा पहिला रूग्ण, ती माझी शेवटची डॉक्टर, १३ दिवसांचा ड्रामा नको...; इंजिनिअरनं संपवलं जीवन
16
बँकेचा CEO बदलताच शेअरला 'रॉकेट' स्पीड! एका झटक्यात गुंतवणूकदारांना झाला इतका फायदा
17
'या' महिला खासदाराचे क्रश आहेत पंकज त्रिपाठी, कॉफी डेटची दिलेली ऑफर, म्हणाल्या- "मी त्यांना पत्रही लिहिलं होतं पण..."
18
Mahabharat: महाभारतात ४५ लाख योद्ध्यांसाठी १८ दिवस कोण करत होतं स्वयंपाक?
19
ऑपरेशन सिंदूरचा जोरदार दणका! पाकिस्तानचं रहीम यार खान एअरबेस अजूनही बंद; पुन्हा जारी करण्यात आला NOTAM
20
IND vs ENG: 'या' विकेटने सामना फिरला...; सुनील गावसकरांनी सांगितला सामन्याचा 'टर्निंग पॉईंट'

मोदीविरोध हेच ठरले महामेळाव्याचे वैशिष्ट्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2019 06:22 IST

कोलकात्यातील महामेळाव्यात भाजपविरोधी पक्षांच्या तब्बल २२ नेत्यांनी मोदी सरकारला सत्तेतून हटविण्यासाठी एकमुखाने शनिवारी रणशिंग फुंकल्याने नरेंद्र मोदी यांची डोकेदुखी वाढणार आहे.

- हरीश गुप्ता नवी दिल्ली : कोलकात्यातील महामेळाव्यात भाजपविरोधी पक्षांच्या तब्बल २२ नेत्यांनी मोदी सरकारला सत्तेतून हटविण्यासाठी एकमुखाने शनिवारी रणशिंग फुंकल्याने नरेंद्र मोदी यांची डोकेदुखी वाढणार आहे. मोदी यांच्यानंतर कोण? या मुद्द्यावर सर्वांनीच भाष्य करणे टाळले. माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांनी मात्र आपल्या भाषणात नेतृत्व कोण करणार? हा प्रश्न अत्यंत दुष्कर प्रश्न आहे, असे सांगून, आपण १० महिने का असेना पंतप्रधानपद भूषविले होते, असा वेगळा सूर आळवला.देवेगौडा यांनी एकप्रकारे आपली महत्त्वाकांक्षाच बोलून दाखविली. शरद पवार म्हणाले की, देशाने मोदी यांना पुरेसा वेळ दिला आहे. ते सलग चार वेळा मुख्यमंंत्री राहिले आहेत. आता केंद्राची सत्ता त्यांच्याच हातात आहे. पण आता त्यांच्यामुळेच देश वाचविण्याची वेळ येऊन ठेपली आहे. आम्हाला काही नको. आता बदल घडविण्याची वेळ आली आहे. अरविंद केजरीवाल म्हणाले की मोदी-शहा यांना घरी पाठविले, तरच देशात अच्छे दिन येतील. अखिलेश यादव आधीच्या दिवसापर्यंत उत्तर प्रदेशाला पंतप्रधानपद मिळाले पाहिजे, असा आग्रह धरीत होते; परंतु त्यांनीही मतभेदाच्या बाबी आज दूर ठेवल्या.>अहंकारी शक्तींचा पराभव करण्याची वेळकाँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे यांनीही नेतृत्वाचा मुद्दा बाजूला ठेवला. खरगे म्हणाले की, आम्हाला बदल हवा आहे. कोणतेही पद नको. सोनिया गांधी यांनी सांगितले आहे की राज्यघटनाविरोधी, अहंकारी आणि विघटनकारी शक्तींचा पराभव करण्याची वेळ आली आहे.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी