शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
3
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
4
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
5
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
6
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
7
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
8
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
9
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
10
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
11
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
12
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
13
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
14
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
15
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
16
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
17
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
18
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
19
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
20
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले

"तुमच्या प्रश्नाचे उत्तर द्या!", नरेंद्र मोदींच्या 'त्या' ट्विटवरून काँग्रेसचा निशाणा  

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2020 22:09 IST

लडाखमध्ये भारतीय लष्कर आपल्या भागातून माघार का घेत आहे, असे 2013 च्या ट्विटमध्ये नरेंद्र मोदी यांनी यूपीए -2 च्या काळात तत्कालीन मनमोहन सिंग सरकारला विचारले होते.

ठळक मुद्देमे महिन्याच्या सुरूवातीपासूनच दोन्ही देशांचे सैन्य समोरासमोर होते. 15 जून रोजी दोन्ही देशांच्या सैन्यांमध्ये हिंसक चकमक झाली. ज्यामध्ये भारताचे 20 जवान शहीद झाले.

नवी दिल्ली : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरूर आणि रणदीप सुरजेवाला यांनी 2013 च्या एका ट्विटचा हवाला देत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. 2013 मध्ये भारत-चीन तणावाशी संबंधित हे ट्विट गुजरातचे मुख्यमंत्री असताना नरेंद्र मोदींनी केले होते. हे ट्विट पुढे करत दोन्ही काँग्रेस नेत्यांनी पंतप्रधानांकडून उत्तर मागितले आहे.

लडाखमध्ये भारतीय लष्कर आपल्या भागातून माघार का घेत आहे, असे 2013 च्या ट्विटमध्ये नरेंद्र मोदी यांनी यूपीए -2 च्या काळात तत्कालीन मनमोहन सिंग सरकारला विचारले होते. त्यावेळी नरेंद्र मोदींनी लिहिले की, 'चीन आपले सैन्य मागे घेत आहे पण मला आश्चर्य वाटते की भारतीय लष्कर आपल्या भूमीवर का मागे हटत आहे? आपण का माघार घ्यावे? '

दरम्यान, प्रत्यक्ष नियंत्रण रेषेत (एलएसी) भारत आणि चीनच्या सैन्य समोरासमोर आले होते, त्यावेळी हे ट्विट नरेंद्र मोदींनी केले होते. दोन्ही देशांनी तणाव कमी करण्याचे मान्य केले आणि लडाखच्या वादग्रस्त भागातून सैन्य मागे घेण्यासाठी सहमती दर्शविली होती. त्यावेळी भारताने म्हटले होते की, 15 एप्रिल 2013 रोजी चिनी सैन्याने 10 किलोमीटर भारतीय हद्दीत घुसखोरी केली होती आणि लडाखच्या देप्सांग खोऱ्यात तळ ठोकला होता.

गेल्या रविवारी अशीच एक घटना घडली, ज्यामध्ये दोन्ही देशांमध्ये तणाव कमी करण्यासाठी सैन्य मागे घेण्याचे मान्य केले. लडाखच्या गलवान खोऱ्यात कोणत्याही बाजूने तणाव निर्माण होऊ नये म्हणून 'नो मेन्स लँड' तयार करण्याची घोषणा करण्यात आली. मे महिन्याच्या सुरूवातीपासूनच दोन्ही देशांचे सैन्य समोरासमोर होते. 15 जून रोजी दोन्ही देशांच्या सैन्यांमध्ये हिंसक चकमक झाली. ज्यामध्ये भारताचे 20 जवान शहीद झाले. तर चीनचेही अनेक सैनिक जखमी झाले. मात्र, त्यांनी कोणतीही अधिकृत आकडेवारी जाहीर केली नाही.

या घटनेवर काँग्रेसने सुरुवातीपासूनच सरकारला घेराव घातला आहे आणि मंगळवारी पक्षाचे नेते शशी थरूर यांनी नरेंद्र मोदी यांचे 2013 च्या ट्विटवा रिट्विट करत म्हटले आहे की, 'मी या प्रकरणात (सैन्य माघार घेण्याच्या) मोदीजींच्या बाजूने आहे. यावर पंतप्रधानांनी उत्तर दिले पाहिजे.'

शशी थरूर यांच्यानंतर काँग्रेसचे नेते रणदीप सुरजेवाला यांनीही ट्वीट करून लिहिले की, "माननीय पंतप्रधान, तुम्हाला तुमचे शब्द आठवतात काय? तुमच्या शब्दांना काही महत्व आहे का? आमचे जवान आमच्या भूमीतून का मागे हटत आहेत? देश याचे उत्तर मागत आहे."

आणखी बातम्या...

मराठा आरक्षणाला अंतरिम स्थगिती देण्याची विरोधकांची मागणी न्यायालयाने फेटाळली - अशोक चव्हाण

"सारथीच्या उद्घाटनाची बिले थकवणाऱ्यांनी संस्था कशी चालवायची ते शिकवू नये"

'त्यांना वाटतंय तसं नाहीय', रोहित पवारांकडून देवेंद्र फडणवीसांना चोख प्रत्युत्तर

घुसखोरी केली नाही, तर चिनी सैन्य माघार कशी घेत आहे? असदुद्दीन ओवेसींचा सवाल

अवघ्या ५ वर्षांच्या दिव्यांगाने १० किमी चालून रुग्णालयासाठी जमवला ९ कोटींचा निधी

Aadhaar-PAN Card Link: आधार-पॅन लिंक करण्याची डेडलाइन वाढवली; आता 'या' तारखेपर्यंत करू शकता

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीcongressकाँग्रेसShashi Tharoorशशी थरूरindia china faceoffभारत-चीन तणाव