शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

पाकिस्तानमध्ये आणखी एक दहशतवादी हल्ला; चौकी उडविली, १७ सैनिकांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2024 17:31 IST

पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा भागातील बन्नू जिल्ह्याच्या जानिखेल भागातील चौकीवर भीषण आत्मघाती हल्ला करण्यात आला.

काही दिवसांपूर्वीच पाकिस्तानमध्ये दहशतवाद्यांनी अख्खे रेल्वे स्टेशन उडवून दिले होते. यात २५ सैनिक मारले गेले होते. आता पुन्हा तेवढाच शक्तीशाली हल्ला पाकिस्तानी सैन्यावर करण्यात आला आहे. यात १७ जवानांचा मृत्यू झाला आहे. 

पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा भागातील बन्नू जिल्ह्याच्या जानिखेल भागातील चौकीवर भीषण आत्मघाती हल्ला करण्यात आला. बॉम्बस्फोट आणि गोळीबारात पाकिस्तानचे १७ जवान ठार झाले आहेत. तहरीक ए तालिबान पाकिस्तानसी सहकारी संघटना हाफिज गुल बहादुर ग्रुप (एचजीबी)ने याची जबाबदारी घेतली आहे. 

भारताला दहशतवादाने त्रस्त करणाऱ्या पाकिस्तानला देखील आता हेच दहशतवादी पोखरू लागले आहेत. भारताविरोधात वापरेले शस्त्र आता पाकिस्तानींचाच जीव घेऊ लागले आहेत. यातून आता पाकिस्तान बाहेर पडणे कठीण झाले असून येत्या काळात असेल हल्ले पाकिस्तानला झेलावे लागण्याची शक्यता आहे. 

मंगळवारी सायंकाळी हल्लेखोराने स्फोटकांनी भरलेले वाहन सुरक्षा चौकीवर नेऊन आदळले. यात झालेल्या स्फोटात चौकी उध्वस्त झाली. येथे तैनात असलेले १२ सैनिक जागीच ठार झाले. तर अनेक जखमी झाले. आता हा आकडा वाढून १७ वर गेला असल्याचे तेथील वृत्तांत म्हटले आहे. 

स्फोटानंतर लगेचच दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये गोळीबार सुरू झाला. या चकमकीत सहा दहशतवादी मारले गेले. दहशतवाद्यांना चौकीत घुसता आले नाही. परंतू, स्फोटामुळे मोठा विध्वंस झाल्याचे लष्कराने सांगितले.

टॅग्स :Terror Attackदहशतवादी हल्लाPakistanपाकिस्तान