शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
2
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
3
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
4
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
5
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
6
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
7
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
8
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
9
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
10
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
11
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
12
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
13
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
14
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
15
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
16
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
17
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
18
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
19
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
20
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक

योगी सरकारचा अजून एक कारनामा, आता चक्क प्रसिद्ध शायरांच्या नावांचच केलं नामांतर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2021 17:14 IST

Uttar pradesh News: आता योगी (yogi government) सरकारमधील शिक्षण विभागाने चक्क काही प्रसिद्ध शायरांची नावेच बदलल्याने खळबळ उडाली आहे. मात्र यावरून टीका होऊ लागल्यानंतर नावांमध्ये दुरुस्ती करण्यात येईल, असे स्पष्टीकरण विभागाकडून देण्यात आले आहे.

लखनौ - उत्तर प्रदेशमध्ये गेल्या पाच वर्षांपासून सत्तेत असलेले योगी सरकार हे वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत असते. गेल्या काही काळात उत्तर प्रदेशमधील काही शहरांची नावे बदलण्याचा योगी सरकारने घेतलेला निर्णय हा चर्चेचा आणि टीकेचा विषय ठरला होता. दरम्यान, आता योगी सरकारमधील शिक्षण विभागाने चक्क काही प्रसिद्ध शायरांची नावेच बदलल्याने खळबळ उडाली आहे. मात्र यावरून टीका होऊ लागल्यानंतर नावांमध्ये दुरुस्ती करण्यात येईल, असे स्पष्टीकरण विभागाकडून देण्यात आले आहे.

काही वर्षांपूर्वी उत्तर प्रदेशमधील अलाहाबाद शहराचे नामांतर प्रयागराज करण्यात आले होते. त्यावरून उत्तर प्रदेश सरकारमधील शिक्षण विभागाने प्रसिद्ध शायर अकबर इलाहाबादी यांचं नाव बदलून अकबर प्रयागराजी असे केले. एवढ्यावरच न थांबता तेग इलाहाबादी आणि राशिद इलाहाबादी यांचीही नावे बदलून तेग प्रयागराजी आणि राशिद प्रयागराजी अशी करण्यात आली. आयोगाने ही नावे बदलल्यानंतर या निर्णयावर चौफेर टीका होऊ लागली. दरम्यान, उच्च शिक्षा सेवा आयोगाचे अध्यक्ष ईश्वर शरण विश्वकर्मा यांनी  या प्रकाराबाबत त्यांना काही कल्पना नसल्याचे सांगितले आहे.

दरम्यान, उच्चतर शिक्षण सेवा आयोगाने केलेल्या या या नामांतरावर साहित्य जगतातून चौफेर टीका केली जात आहे. सोशल मीडियावर आयोगाचे हे पेज शेअर केले जात आहे. प्रसिद्ध लेखक राजेंद्र कुमार यांनीही उच्च शिक्षण आयोगाने केलेला हा बदल मूर्खपणाचा असल्याची टीका केली आहे. कुणी साहित्यिक त्याच्या नावासमोर इलाहाबादी लिहित असेल तर ती त्याची ओळख झाली ती बदलता कशी येईल, हा तर इतिहास पुसण्याचा प्रकार आहे, आयोगाने ही चूक तात्काळ सुधारली पाहिजे.

प्रसिद्ध शायर श्लेष गौतम यांनी सांगितले की, अकबर इलाहाबादी यांना अकबर प्रयागराजी लिहिणे चुकीचे आहे. अकबर इलाहाबादी हीच त्यांची ओळख आहे. शहराचे अलाहाबाद हे नाव बदलून प्रयागराज करण्यात आले असले तरी तुम्ही एवढ्या मोठ्या शायराच्या नावात बदल कसा काय करता येईल, हे चुकीचे आहे आणि निंदनीय आहे.  

टॅग्स :yogi adityanathयोगी आदित्यनाथUttar Pradeshउत्तर प्रदेशPoliticsराजकारण