शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

योगी सरकारला आणखी एक धक्का; मंत्री दारासिंह यांचा राजीनामा, सपामध्ये जाण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2022 07:35 IST

सपाच्या तिकिटावर १९९६ मध्ये राज्यसभा खासदार झालेले दारासिंह चौहान २००५ मध्ये बसपात गेले होते.

नवी दिल्ली : उत्तर प्रदेश सरकारमधील वनमंत्री व प्रदेश भाजप मागासवर्ग सेलचे अध्यक्ष दारासिंह चौहान यांनी योगी आदित्यनाथ मंत्रिमंडळातून बुधवारी राजीनामा देऊन निवडणुकीपूर्वी भाजपला आणखी एक धक्का दिला. मंगळवारीच स्वामी प्रसाद मौर्य यांनी सात आमदारांसह पक्षाचा राजीनामा दिला होता.

समाजवादी पार्टीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आणखी अनेक आमदार भाजप सोडून सपामध्ये सहभागी होऊ शकतात. १४ जानेवारी रोजी मकर संक्रांतीच्या दिवशी हे सर्व जण एकदम सपामध्ये जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

आधी बसप, मग भाजप

सपाच्या तिकिटावर १९९६ मध्ये राज्यसभा खासदार झालेले दारासिंह चौहान २००५ मध्ये बसपात गेले होते. बसपाच्या तिकिटावर ते पूर्व उत्तर प्रदेशच्या घोसीमधून २००९ ची निवडणूक जिंकून लोकसभेत गेले होते, परंतु २०१४ च्या निवडणुकीत पराभूत झाले होते. त्यानंतर २०१६ मध्ये ते भाजपमध्ये गेले व त्यापुढील वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुका जिंकून वनमंत्री झाले होते.

माेर्य यांच्याविराेधात अटक वॉरंट जारी

स्वामी प्रसाद मौर्य यांनी भाजपची साथ सोडल्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्यांच्यावर अटक वॉरंट जारी केले. चिथावणीखोर भाषण दिल्याबद्दल ७ वर्षे जुन्या प्रकरणात आमदार-खासदारविषयक विशेष न्यायालयाने हे अटक वॉरंट बजावले आहे. वक्तव्य केले तेव्हा ते बसपामध्ये होते. २०१६मध्ये अलाहाबाद उच्च न्यायालयाने या प्रकरणात त्यांच्या अटकेवर रोख लावली होती. आता सुलतानपूरच्या विशेष न्यायालयाने त्यांना २४ जानेवारी रोजी हजर होण्यासाठी वॉरंट जारी केले आहे.

टॅग्स :Uttar Pradesh Assembly Election 2022उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक २०२२BJPभाजपाyogi adityanathयोगी आदित्यनाथ