शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
2
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?
3
झेलेन्स्की यांना बोलावले, पुतिन यांच्याशीही पुन्हा चर्चा करणार; अलास्का बैठकीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांची नवी तयारी
4
घर खरेदीचा प्लॅन करत असलेल्यांच्या स्वप्नांना SBI चा मोठा झटका...; RBI नं दिलासा देऊनही होम लोनचा टक्का वाढवला!
5
'शोले'तल्या भूमिकेसाठी या मराठमोळ्या अभिनेत्याला पैशांऐवजी देण्यात आलेला फ्रिज, वाचा हा किस्सा
6
Trump Putin: डोनाल्ड ट्रम्प यांनी पुतीन यांना दिलं पत्नी मेलानिया यांचं पत्र; 'त्या' पत्रात काय लिहिलंय?
7
५ हजारांपासून ४० हजार कोटींपर्यंतचा प्रवास: 'बिग बुल' राकेश झुनझुनवालांना उगाचचं नव्हते म्हणत दलाल स्ट्रीटचे जादूगार
8
आता स्टील आणि सेमीकंडक्टरवरही टॅरिफ लावणार ट्रम्प? अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचं उत्तर ऐकून वाढेल संपूर्ण जगाचं टेन्शन!
9
'विरोधकांची विकास विरोधी हंडी जनतेने फोडली'; उपमुख्यमंत्री शिंदेंचा महाविकास आघाडीवर हल्ला
10
Barvi Dam: ठाणेकरांची चिंता मिटली! बारवी धरण १०० टक्के भरले; सात दरवाजे उघडले
11
‘बंगाल फाइल्स’चा ट्रेलर लॉन्च होताच कोलकात्यात वाद, बोलवावे लागले पोलीस, विवेक अग्निहोत्री म्हणाले...  
12
Shravan Somvar 2025: इच्छित मनोकामनापूर्तीसाठी शेवटच्या श्रावणी सोमवारी चुकवू नका 'हा' उपाय!
13
'वाळवा तालुका स्वाभिमानी, सहजासहजी वाकत नाही, लढाई शेवटपर्यंत...', जयंत पाटलांचा अजितदादांसमोर टोला
14
NCERT: भारताच्या फाळणीला तीन नेते जबाबदार; एनसीआरटीच्या पुस्तकात कुणाची नावे?
15
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; कॅश पासून फ्री चेकबुकपर्यंतचे नियम बदलले, जाणून घ्या
16
दहीहंडी २०२५: पहिला १० थरांचा विश्वविक्रम; जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाचा पराक्रम
17
गणेशोत्सव २०२५: यंदा श्रीगणेश चतुर्थीचा शुभ मुहूर्त कधी? पाहा, महत्त्व अन् काही मान्यता
18
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा GST रिफॉर्म; दूध, दही, टीव्ही, सायकल सर्वकाही स्वस्त होणार?
19
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
20
तुम्हाला माहित्येय? बाइक अथवा कारमागे का धावतात कुत्रे? जाणून घ्या, होईल फायदा...!

पाकिस्तानला आणखी एक धक्का! BSF ने जैशच्या ७ दहशतवाद्यांचा खात्मा केला; सांबामधून घुसखोरीच्या प्रयत्नात होते

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2025 12:13 IST

जम्मू फ्रंटियर बीएसएफच्या सांबा सेक्टरमध्ये एका मोठ्या दहशतवादी गटाने घुसखोरीचा प्रयत्न केला होता, जो भारतीय सैन्याने हाणून पाडला आहे.

भारत आणि पाकिस्तानमध्ये सध्या खूप तणाव आहे. ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तान घाबरलेल्या स्थितीत आहे. पाकिस्तानकडून सतत अयशस्वी हल्ला करण्याचा प्रयत्न केला जात आहे. ८ आणि ९ मे २०२५च्या मध्यतरी रात्री,जम्मू फ्रंटियर बीएसएफच्या सांबा सेक्टरमध्ये एका मोठ्या दहशतवादी गटाने घुसखोरीचा प्रयत्न केला होता, जो भारतीय सैन्याने हाणून पाडला आहे.  बीएसएफने केलेल्या या कारवाईत ७ दहशतवादी मारले गेले आहेत.

प्राथमिक माहितीनुसार, मारले गेलेले दहशतवादी जैशचे असल्याचे म्हटले जात आहे. भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर सीमेवर सुरक्षा वाढवण्यात आली आहे. या दरम्यान, मध्यरात्री दहशतवाद्यांनी जम्मू फ्रंटियर बीएसएफच्या सांबा सेक्टरमध्ये घुसखोरीचा प्रयत्न केला होता, जो भारतीय सैन्याने हाणून पाडला. लष्कराने या संपूर्ण घटनेचा एक व्हिडीओ देखील जारी केला आहे, ज्यामध्ये दहशतवादी घुसखोरी आणि गोळीबार करताना दिसत आहेत.

दहशतवाद्यांना घातलं कंठस्नान!

रात्रीच्या वेळी लष्कराची तुकडी सीमेवर गस्त घालत होती. यावेळी त्यांची नजर दहशतवाद्यांवर पडली. रात्री ११.३०च्या सुमारास दहशतवाद्यांनी आंतरराष्ट्रीय सीमेवरून भारतात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. सैनिकांनी अडवल्यानंतर त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला, परंतु सैनिकांनी गोळीबार सुरू केला. घुसखोरीच्या बाबतीत सांबा हे आधीच अतिशय संवेदनशील क्षेत्र आहे. भारत आणि पाकिस्तानमध्ये सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर येथे दक्षता वाढवण्यामागे हेच कारण आहे. 

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरBSFसीमा सुरक्षा दलIndian Armyभारतीय जवानIndia vs Pakistanभारत विरुद्ध पाकिस्तानterroristदहशतवादी