शहरं
Join us  
Trending Stories
1
सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात 'तारा'चा भीमपराक्रम! मगरींच्या विळख्यात दीड किमी पोहून वारणा धरण केले पार
2
उल्हासनगर: शाखा ताब्यात घेण्यावरून उद्धवसेना व शिंदेसेना आमने-सामने, पोलिसांचा हस्तक्षेप
3
KTM Duke: केटीएम ड्यूक १६० आता आणखी पॉवरफुल! ग्राहकांना मिळणार नवीन अपडेट्स
4
"खून का बदला चुकाने के लिए...!"; लंडनवरून परतताच तारिक रहमान यांनी स्पष्ट केला इरादा; काय म्हणाले?
5
‘परदेश दौऱ्यावर असताना राहुल गांधींवर पाळत ठेवली जातेय’, काँग्रेसचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप
6
ग्लॅमर अन् परंपरेचा 'गुलाबी संगम'... BIGG BOSS गाजवणाऱ्या मालती चहरचा 'सुपरहॉट' लूक (PHOTOS)
7
बॉक्सर नीरजनं विचारलं, कसे आहात? पंतप्रथान मोदींनी उत्तर दिलं, तुझ्यासारखाच...!; VIDEO व्हायरल
8
भाजपाचा मित्रपक्षाच्या आमदारांवरच डोळा? पक्षाच्या बैठकीला दांडी, बिहारमध्ये मोठी उलथापालथ होणार
9
VIDEO: Hardik Pandya चं 'लेडी लव्ह'! गर्लफ्रेंड Mahieka Sharma ला सांभाळून कारमध्ये बसवलं...
10
Crime: आईला प्रियकरासोबत रंगेहाथ पकडलं; त्यानंतर मुलानं जे केलं त्यानं पोलीसही हादरले!
11
आधी तरुणीवर गोळ्या झाडल्या, मग स्वत:ही संपवलं जीवन, एकतर्फी प्रेमातून घडली भयंकर घटना
12
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
13
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
14
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
15
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
16
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
17
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
18
Devayani Farande: डोळ्यात पाणी, आवाजही गहिवरला...! नाशिकमधील पक्षप्रवेशानंतर भाजपा आमदार देवयानी फरांदे भावूक
19
"मूर्ती तोडण्यामागे धार्मिक हेतू नाही, तर...!"; भगवान विष्णू यांची मूर्ती पाडल्याबद्दल भारतानं व्यक्त केली होती चिंता, आता थायलंडनं दिलं असं स्पष्टीकरण
20
"चीन भारतासोबतचे संबंध विकसित करण्यावर भर देतो, कोणत्याही तिसऱ्या देशाला..."; अमेरिकेच्या अहवालावरून चीन भडकला
Daily Top 2Weekly Top 5

पाच राज्यांतील विधानसभा निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2016 15:56 IST

तामिळनाडू, केरळ, पश्चिम बंगाल, आसाम आणि पुडूचेरी या पाच राज्यांतील आगामी विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे.

ऑनलाइन लोकमत - 
नवी दिल्ली, दि. ४ - तामिळनाडू, केरळ, पश्चिम बंगाल, आसाम आणि पुडूचेरी या पाच राज्यांतील आगामी विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. निवडणूक आयोगाने शुक्रवारी दुपारी पत्रकार परिषद घेऊन या तारखा जाहीर केल्या आहेत. केरळ, पुडूचेरी आणि तामिळनाडूमध्ये एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. पश्चिम बंगालमध्ये सहा टप्पे आणि आसाममध्ये दोन टप्प्यात मतदान होईल. या सर्व राज्यांमध्ये १९ मे रोजी मतदान होईल. 
 
आसाममध्ये दोन टप्प्यांमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्यामध्ये ६५ जागांसाठी दुस-या टप्प्यामध्ये ६१ जागांसाठी मतदान होणार. ४ एप्रिलला पहिल्या टप्प्याचे तर ११ एप्रिलला दुस-या टप्प्याचे मतदान होणार आहे. पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी सहा टप्प्यांमध्ये मतदान होणार आहे. 
 
तामिळनाडू, केरळ, पश्चिम बंगाल, आसाम आणि पुडूचेरीमध्ये मिळून एकूण ८२४ विधानसभा मतदारसंघात मतदान होणार आहे.  या निवडणुकांसाठी ७५ ते ८० हजार निमलष्करी जवान तैनात करण्यात येणार आहेत. पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीत देशातील १७ कोटी नागरीक सहभागी होणार आहेत. मतदारांच्या सुविधेसाठी पाच राज्यांमध्ये मतदान केंद्रांची संख्या वाढवण्यात येणार आहे. मतदाराचा गोंधळ होऊ नये यासाठी ईव्हीएम मशीनवर प्रत्येक उमेदवाराचा फोटो असणार आहे.पाच राज्यांमध्ये पेड न्यूज रोखण्यासाठी निवडणूक आयोगाच्या समितीचे लक्ष असेल अशी माहिती निवडणूक आयोगाने दिली आहे
 
पाच राज्यातील निवडणूकीचा कार्यक्रम 
पाच राज्यातील विधानसभा निवडणूकीची मतमोजणी १९ मे रोजी होणार.
 
पुडूचेरीमध्येही एकाच टप्प्यात १६ मे रोजी मतदान होणार
 
तामिळनाडूमध्येही एकाच टप्प्यात १६ मे रोजी मतदान होणार.
 
केरळमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी १६ मे रोजी एका टप्प्यामध्ये मतदान होणार.
 
पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी सहा टप्प्यांमध्ये मतदान होणार, पहिल्या टप्प्याचे मतदान दोन तारखांना होणार, चार एप्रिल आणि ११ एप्रिल.
 
पश्चिम बंगालमध्ये १७ एप्रिलला दुस-या टप्प्याचे, २१ एप्रिलला तिस-या टप्प्याचे मतदान होणार.
 
पश्चिम बंगालमध्ये २५ एप्रिलला चौथ्या टप्प्याचे आणि ३० एप्रिलला पाच टप्प्यांचे मतदान होणार.
 
पश्चिम बंगालमध्ये ५ मे रोजी सहाव्या टप्प्याचे मतदान होणार.
 
आसाममध्ये दोन टप्प्यांमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार, पहिल्या टप्प्यामध्ये ६५ जागांसाठी दुस-या टप्प्यामध्ये ६१ जागांसाठी मतदान होणार. ४ एप्रिलला पहिल्या टप्प्याचे, ११ एप्रिलला दुस-या टप्प्याचे मतदान होणार.
 
पाच राज्यांमध्ये पेड न्यूज रोखण्यासाठी निवडणूक आयोगाच्या समितीचे लक्ष असेल.
 
प्रत्येक राज्यामध्ये पाच केंद्रीय निरीक्षक निवडणूकीवर लक्ष ठेवतील.
 
मतदाराचा गोंधळ होऊ नये यासाठी ईव्हीएम मशीनवर प्रत्येक उमेदवाराचा फोटो असणार.
 
आसाममध्ये १.९८ कोटी मतदार, केरळमध्ये २.५६ कोटी मतदार, तामिऴनाडूत ५.८ कोटी मतदार, पश्चिम बंगालमध्ये ६.५५ कोटी मतदार आणि पुडूचेरीत ९.२७ लाख मतदार.
 
मतदारांच्या सुविधेसाठी पाच राज्यांमध्ये मतदान केंद्रांची संख्या वाढवण्यात येणार.
 
तामिळनाडू, केरळ, पश्चिम बंगाल, आसाम आणि पुडूचेरीमध्ये आदर्श अचारसंहिता लागू.
 
पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीत देशातील १७ कोटी नागरीक सहभागी होणार - मुख्य निवडणूक आयुक्त.
 
तामिळनाडू, केरळ, पश्चिम बंगाल, आसाम आणि पुडूचेरीमध्ये मिळून एकूण ८२४ विधानसभा मतदारसंघात मतदान होणार.