शहरं
Join us  
Trending Stories
1
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
2
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
3
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
4
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
5
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
6
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
7
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
8
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
9
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
10
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
11
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
12
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
13
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
14
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
15
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
16
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
17
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
18
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
19
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
20
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी

पाच राज्यांतील विधानसभा निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2016 15:56 IST

तामिळनाडू, केरळ, पश्चिम बंगाल, आसाम आणि पुडूचेरी या पाच राज्यांतील आगामी विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे.

ऑनलाइन लोकमत - 
नवी दिल्ली, दि. ४ - तामिळनाडू, केरळ, पश्चिम बंगाल, आसाम आणि पुडूचेरी या पाच राज्यांतील आगामी विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. निवडणूक आयोगाने शुक्रवारी दुपारी पत्रकार परिषद घेऊन या तारखा जाहीर केल्या आहेत. केरळ, पुडूचेरी आणि तामिळनाडूमध्ये एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. पश्चिम बंगालमध्ये सहा टप्पे आणि आसाममध्ये दोन टप्प्यात मतदान होईल. या सर्व राज्यांमध्ये १९ मे रोजी मतदान होईल. 
 
आसाममध्ये दोन टप्प्यांमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्यामध्ये ६५ जागांसाठी दुस-या टप्प्यामध्ये ६१ जागांसाठी मतदान होणार. ४ एप्रिलला पहिल्या टप्प्याचे तर ११ एप्रिलला दुस-या टप्प्याचे मतदान होणार आहे. पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी सहा टप्प्यांमध्ये मतदान होणार आहे. 
 
तामिळनाडू, केरळ, पश्चिम बंगाल, आसाम आणि पुडूचेरीमध्ये मिळून एकूण ८२४ विधानसभा मतदारसंघात मतदान होणार आहे.  या निवडणुकांसाठी ७५ ते ८० हजार निमलष्करी जवान तैनात करण्यात येणार आहेत. पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीत देशातील १७ कोटी नागरीक सहभागी होणार आहेत. मतदारांच्या सुविधेसाठी पाच राज्यांमध्ये मतदान केंद्रांची संख्या वाढवण्यात येणार आहे. मतदाराचा गोंधळ होऊ नये यासाठी ईव्हीएम मशीनवर प्रत्येक उमेदवाराचा फोटो असणार आहे.पाच राज्यांमध्ये पेड न्यूज रोखण्यासाठी निवडणूक आयोगाच्या समितीचे लक्ष असेल अशी माहिती निवडणूक आयोगाने दिली आहे
 
पाच राज्यातील निवडणूकीचा कार्यक्रम 
पाच राज्यातील विधानसभा निवडणूकीची मतमोजणी १९ मे रोजी होणार.
 
पुडूचेरीमध्येही एकाच टप्प्यात १६ मे रोजी मतदान होणार
 
तामिळनाडूमध्येही एकाच टप्प्यात १६ मे रोजी मतदान होणार.
 
केरळमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी १६ मे रोजी एका टप्प्यामध्ये मतदान होणार.
 
पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी सहा टप्प्यांमध्ये मतदान होणार, पहिल्या टप्प्याचे मतदान दोन तारखांना होणार, चार एप्रिल आणि ११ एप्रिल.
 
पश्चिम बंगालमध्ये १७ एप्रिलला दुस-या टप्प्याचे, २१ एप्रिलला तिस-या टप्प्याचे मतदान होणार.
 
पश्चिम बंगालमध्ये २५ एप्रिलला चौथ्या टप्प्याचे आणि ३० एप्रिलला पाच टप्प्यांचे मतदान होणार.
 
पश्चिम बंगालमध्ये ५ मे रोजी सहाव्या टप्प्याचे मतदान होणार.
 
आसाममध्ये दोन टप्प्यांमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार, पहिल्या टप्प्यामध्ये ६५ जागांसाठी दुस-या टप्प्यामध्ये ६१ जागांसाठी मतदान होणार. ४ एप्रिलला पहिल्या टप्प्याचे, ११ एप्रिलला दुस-या टप्प्याचे मतदान होणार.
 
पाच राज्यांमध्ये पेड न्यूज रोखण्यासाठी निवडणूक आयोगाच्या समितीचे लक्ष असेल.
 
प्रत्येक राज्यामध्ये पाच केंद्रीय निरीक्षक निवडणूकीवर लक्ष ठेवतील.
 
मतदाराचा गोंधळ होऊ नये यासाठी ईव्हीएम मशीनवर प्रत्येक उमेदवाराचा फोटो असणार.
 
आसाममध्ये १.९८ कोटी मतदार, केरळमध्ये २.५६ कोटी मतदार, तामिऴनाडूत ५.८ कोटी मतदार, पश्चिम बंगालमध्ये ६.५५ कोटी मतदार आणि पुडूचेरीत ९.२७ लाख मतदार.
 
मतदारांच्या सुविधेसाठी पाच राज्यांमध्ये मतदान केंद्रांची संख्या वाढवण्यात येणार.
 
तामिळनाडू, केरळ, पश्चिम बंगाल, आसाम आणि पुडूचेरीमध्ये आदर्श अचारसंहिता लागू.
 
पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीत देशातील १७ कोटी नागरीक सहभागी होणार - मुख्य निवडणूक आयुक्त.
 
तामिळनाडू, केरळ, पश्चिम बंगाल, आसाम आणि पुडूचेरीमध्ये मिळून एकूण ८२४ विधानसभा मतदारसंघात मतदान होणार.