शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
3
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
4
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
5
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
6
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
7
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
8
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
9
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
10
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
11
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
12
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
13
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
14
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
15
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
16
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
19
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
20
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान

यासाठी 8 नोव्हेंबरला केली नोटाबंदीची घोषणा - पंतप्रधान मोदी

By admin | Updated: February 7, 2017 15:59 IST

नोटाबंदी निर्णय अंमलात आणण्यासाठी घाईदेखील केलेली नाही तसंच अविचारानेही याची घोषणा करण्यात आलेली नाही, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. 7 - नोटाबंदी निर्णय अंमलात आणण्यासाठी घाईदेखील केलेली नाही तसंच अविचारानेही याची घोषणा करण्यात आलेली नाही, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत सांगितले.  देशात वर्षभरातील अर्धा व्यवसाय हा दिवाळी सणादरम्यान होतो.  हेच मुख्य कारण असल्याने दिवाळीनंतर नोटाबंदी निर्णय लागू करण्यात आला. 
(दादरच्या बालेकिल्ल्यात प्रतिष्ठेचा 'सामना')
 
राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर लोकसभेत आभार व्यक्त करणा-या भाषणादरम्यान मोदींनी अर्थव्यवस्थेसंबंधीत अनेक गोष्टी मांडल्या. याचवेळी त्यांनी नोटाबंदी निर्णयावर स्पष्टीकरण दिले. नोटाबंदीसाठी दिवाळी नंतरचा काळ निवडणं यामागील गणितं समजावून सांगताना पंतप्रधान मोदींनी सांगितले की, 'ऑपरेशनपूर्वी रुग्णाची प्रकृती स्थिर असली पाहिजे, असे डॉक्टरही सांगतात.
डॉक्टर तेव्हाच उपचार करतो जेव्हा रुग्णाचा बीपी, मधुमेहाची स्थिती ठिकठाक असते. त्यामुळे आम्हीही देशाची अर्थव्यवस्था निरोगी असल्याचे पाहून नोटाबंदीसारखा निर्णय लागू केला.'
(अखेर भूकंप आलाच, पंतप्रधान मोदींनी उडवली राहुल गांधींची खिल्ली)
 
यावेळी मोदींनी विरोधकांवर हल्लाबोल चढवला की, 'भाजपा विरोधकांच्या भूमिकेत असताना आवाज यायचा, कोळसा घोटाळा, स्पेक्ट्रम घोटाळ्यात किती गेले?. आज परिस्थिती बदलली आहे. आता विरोधकांमधून आवाज येतो, मोदींनी किती आणले?'. 
 
आधीचे सरकार (यूपीए सरकार) आणि आताच्या भाजपा सरकारच्या कामकाजात हाच फरक आहे की पूर्वी जाण्यावर प्रश्न संपायचा, आता येण्यावर प्रश्न उपस्थित केले जातात, असा टोलाही त्यांनी विरोधकांना लगावला.  शिवाय  'स्वच्छ भारत' प्रमाणेच नोटाबंदीचा निर्णय हा भ्रष्टाचार आणि काळा पैसा सफाईचे अभियान आहे, असेही यावेळी मोदींनी नमूद केले.