शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आरक्षणाची ५० टक्के मर्यादेचे उल्लंघन, सुप्रीम कोर्टात १९ नोव्हेंबरला सुनावणी
2
भाजपने पहिला गुलाल उधळला! अख्खे पॅनल बिनविरोध विजयी; नगराध्यक्ष निवडणुकीकडे लक्ष
3
तेजस्वी यादवांना राजदने नेता म्हणून निवडले; लालू-राबडी बैठकीतूनच निघाले
4
Travel : परिकथेत रमणाऱ्यांनी आयुष्यात एकदा तरी 'या' ठिकाणांना भेट द्यायलाच हवी! आताच करून ठेवा यादी
5
ओलाची स्कूटर बंद पडली, कंपनी सर्व्हिस देईना; ग्राहकाने बाहेरून दुरुस्त केली, ८५०० रुपयांचे बिल झाले...
6
शेख हसीना यांना तात्काळ परत पाठवा; 'या' कराराचा हवाला बांगलादेशची भारताला विनंती
7
बापरे बाप! बंजी जंपिंग करताना आला हार्ट अटॅक, हवेतच मुलीचा मृत्यू? Video पाहून भरेल धडकी
8
WTC Final Scenario : टीम इंडियाचं गणित पुन्हा बिघडणार? फायनल खेळण्यासाठी जिंकावे लागतील एवढे सामने
9
नवऱ्यासोबत घटस्फोटाच्या चर्चा, सततच्या ट्रोलिंगवर भडकली ऐश्वर्या; म्हणाली, "साखरपुड्यापासूनच..."
10
Hyundai Creta चं टेन्शन वाढणार, येतायेत दोन 'धाकड' SUV; जाणून घ्या फीचर्स, काय असेल खास?
11
शेख हसीना यांना शिक्षा सुनावल्यानंतर ढाक्यामध्ये हिंसाचार उसळला, युनूस सरकार 'अ‍ॅक्शन'मोडवर; परिस्थिती बिघडली
12
आता तरी घ्या रे! ऋतुराज गायकवाडचा मोठा पराक्रम; पुजाराला मागे टाकत ठोठावला टीम इंडियाचा दरवाजा
13
गौतम गंभीरने पिचशी छेडछाड थांबवावी अन् मी सांगतोय ते ऐकावं...; सौरव गांगुलीचा थेट सल्ला
14
त्याने आरडाओरड केली, पण तिला जराही दया आली नाही! नवऱ्याला घरात कोंडून बायकोने लावली आग
15
धनंजय मुंडेंच्या पापांमध्ये फडणवीस का सहभागी होताहेत? मनोज जरांगेंचा संतप्त सवाल
16
आबा-काका गटामधील उमेदवारीचा सस्पेन्स आज अखेरच्या दिवशी संपणार;'बी' फॉर्म ठरवणार नगराध्यक्ष पदाचा उमेदवार, काका गट रिंगणात
17
अपघात, रोग आणि चिंता होईल दूर! फक्त करा प्रेमानंद महाराजांनी सांगितलेले ५ 'रामबाण' उपाय
18
ओला ईलेक्ट्रीक गटांगळ्या खाऊ लागली? पुण्यातील सर्व्हिस सेंटर तोडले, अख्ख्या मुंबईत तेही ठाण्यात एकच सर्व्हिस सेंटर...
19
Sheikh Hasina Net Worth: शेख हसीना यांच्या नोकराकडेच होते २८४ कोटी; 'मॅडम'कडील प्रॉपर्टीचा आकडा वाचून तर बघा...
20
'या' एका चुकीमुळे लीक होऊ शकते तुमचे व्हॉट्सअ‍ॅपचे प्रायव्हेट चॅट; तुम्हाला माहीत आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

कलम ३७० रद्दची वर्षपूर्ती! विकासाच्या दृष्टीने पावले खुंटलेलीच...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2020 11:03 IST

काश्मिरमध्ये आजही अनेक सेवा बंद..

ठळक मुद्दे  भविष्यात बदल होण्याची तरूणांना अपेक्षा  

निनाद देशमुखपुणे : दहशतवाद, सातत्याने लादल्या जाणाऱ्या कर्फ्यूमुळे काश्मिरी नागरिक आधिच त्रस्त होता. त्यात ३७० कलम रद्द करत काश्मिर केंद्रशासित प्रदेश बनविण्यात आला. या निर्णयाने वेगाने विकास होईल अशी आश्वासने देण्यात आली. मात्र, वर्षाच्या सुरूवातीला कर्फ्यू आणि त्यानंतर कोरोनामुळे लागलेले लॉकडाऊन यामुळे काहीच झाले नाही. बेरोजगारीचे प्रमाणही वाढले आहे.  येत्या काळात आम्हाला आमचे हक्क मिळतील अशी अपेक्षा काश्मिरी तरूणांनी व्यक्त केली.

५ आॅगस्ट २०१९ ला केंद्रसरकारने एतिहासिक निर्णय घेत जम्मुकाश्मिरचे विभाजन करत दोन नव्या केंद्रशासित प्रदेशांची निर्मिती केली. या निर्णयास अनेक स्थानिकांनी विरोध केला तर काहींनी स्वागत केले. हा निर्णय घेतांना येथील  रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होतील, उद्योगधंदे येतील, दहशतवाद संपले, तसेच फुटीरतावादी वृत्तींना आळा बसेल असे सांगण्यात आले. हा निर्णय घेतांना सरकारने सुरक्षेच्या दृष्टीने कर्फ्यू लावला. महाविद्यालये शाळा बंद करण्यात आली. या सोबतच इंटरनेट सुविधाही बंद करण्यात आली. दरम्यान टप्याटप्याने हे बंधने उठवण्यात आली. मात्र, काही निर्बंध येथे आजही आहेत. या घटनेला आज एक वर्ष पूर्ण होत आहे. या एका वर्षात ना रोजगार आलेत ना निर्बंध हटले.  

कुपवाडा जिल्ह्यातील जहिद अजिज शेख याने बीकॉम शिक्षण पूर्ण केले आहे. सध्या तो कंत्राटदार आहे. मात्र, गेल्या वर्षभरात येथील नव्या निर्बंधामुळे त्याला कुठलेही नवे कंत्राट मिळालेले नाही. शिवाय अनेक शासकीय कंत्राटांचे आधीचे बीलही थकले असल्याचे त्याने लोकमतशी बोलतांना सांगितले. शाळा महाविद्यालये बंद असल्याने अनेक तरूण बेरोजगार आहेत. यामुळे दहशतवाद्यांकडे तरूण आकर्षित होत आहेत. राज्याच्या दर्जा असतांही या समस्या आमच्या पुढे कायम होत्या. त्या आजही आहेत. राज्याचा दर्जा पूर्वी असल्याने आम्ही आमच्या तक्रारी लोकप्रतिनिधींकडे मांडू शकत होतो. मात्र, आता हा अधिकारही आमच्याकडे राहिलेला नाही.

नाशिक येथे होमीओपॅथीचे शिक्षण घेत असलेली आणि मुळची  अनंतनाग जिल्ह्यातील असलेली नादीया शेख म्हणाली, केंद्रशासीत प्रदेश बनल्याने विकास होईल अशी अपेक्षा आहे. मात्र, सुरवातीला असलेल्या बंदमुळे आणि कोरोनामुळे लागलेल्या लॉकडाऊनमुळे अनेक मर्याचा प्रशासनाला आल्या असतील. येत्या काळात नक्कीच यात बदल होईल अशी आशा आहे.

बीएससी आणि सिव्हील इंजिनिअर असलेला कुपवाडा येथील शौकत अहमद मीर म्हणाला, काश्मिरमध्ये वर्षभरात दोन मतप्रवाह पाहयला मिळाले. एक बाजुने आणि एक विरोधी. नागरिकांना रोजगार असेल तर त्यांना असल्या गोष्टींचा विचार करायला वेळ मिळणार नाही. त्यामुळे प्राधान्यांने रोजगार निर्मिती करायला हवी. सध्या कोरोनामुळे सर्व बंद आहेत. नागरिकांना धान्याचा पुरवठा झाला. पण कामे नसल्याने विरोधाचा सुर वाढतो आहे.

दहशतवाद्यांच्या घटनेत वाढवर्ष भरात अनेक दहशतवाद्यांना कठस्नान घालण्यात आले. लष्कर आणि पोलीसांतर्फे या कारवाया करण्यात आल्या. सुरक्षा रक्षकांना यात यश आले असले तरी दहशतवाद हा दिवसेंदिवस वाढतच आहे......लॉकडाऊमध्ये जे देश भोगतोय ते आम्ही गेल्या अनेक वर्षांपासून पाहतोयकोरोनामुळे संपूर्ण देशात लॉक डाऊन लावण्यात आला आहे. यामुळे नागरिक घरात बंदिस्त झाले आहेत. आता या लॉकडाऊनला विरोध होत आहे. मात्र, कुठल्याही प्रकारची महामारी नसतांना आम्ही गेल्या अनेक वर्षांपासून असे लॉकडाऊन भोगत आलेलो आहे. त्यामुळे संपुर्ण देशाला आमच्यावर काय अत्याचार होत आहे याची प्रचिती आली असेल.- जहिद अजिज शेख, कुपवाडा

 ----पर्यटनही बंददेशाचे नंदवन असलेल्या जम्मु काश्मिरमध्ये पर्यटन हा प्रमुख व्यवसाय आहे. मात्र, कर्फ्यू आणि लॉकडाऊनमुळे हा व्यवसाय गेल्या वर्षभरापासून बंद आहे. यामुळे या ठिकाणी बेरोजगारी वाढली आहे.---

विकासासाठी वाट पाहावी लागेलपाकिस्तानला थेट युद्धात भारताला हरवीने कठीण असल्याने त्यांनी दहशवादाचा स्विकार केला. १९९४पासून येथे दहशतवाद वाढतोय. स्थानिक राजकीय पुढा-यांनीही स्व:ताच्या फायदा बघत येथे विकास होऊ दिला नाही. परिणामी येथील दरी ही दिवसेंदिवस वाढत गेली. लष्कराने दहशतवादाविरोधात मोठी आघाडी या परिसरात घेतली असली तरी दहशतवाद कमी झालेला नाही. येथील तरूणांना या प्रवृत्तींपासूण परावृत्त करणे गरजेचे आहे. केंद्रशासित प्रदेशामुळे विकासाला वाव आहे. एका वर्षात याचे परिणामदिसतील असे म्हणने योग्य होणार नाही. विकासाठी आपल्याला आणखी काही वर्ष वाट पाहावी लागणार आहे.-निवृत्त लेफ्टनंट जनरल अता हसनेन

टॅग्स :PuneपुणेJammu Kashmirजम्मू-काश्मीरArticle 370कलम 370Central Governmentकेंद्र सरकारtourismपर्यटनcorona virusकोरोना वायरस बातम्याTerrorismदहशतवाद