शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईन ठप्प; केवळ सीएसएमटी ते वाशीपर्यंतच लोकल सुरु, ट्रान्स हार्बरवही परिणाम
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
4
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
5
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्वीट केलं डिलीट
6
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
7
पाव्हणं जेवला काय...! गौतमी पाटीलसोबत सरु आजींनीही धरला ठेका, पाहा भन्नाट डान्स स्टेप्स
8
लिव्हर कॅन्सरवरील सर्जरीनंतर दीपिका पहिल्यांदाच आली समोर, सांगितला वेदनादायी अनुभव
9
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
10
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
11
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
12
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
13
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
14
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
15
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
16
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
17
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
18
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
19
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
20
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया

"मी माझ्या मर्जीने पाकिस्तानात गेली..."; पोलिसांनी अंजूला विचारले 12 प्रश्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2023 10:44 IST

अंजूची चौकशी करण्यासाठी राजस्थानमधील भिवडी येथील पोलीस हरियाणातील सोनीपतला पोहोचले.

पाकिस्तानातूनभारतात परतल्यानंतर अंजू पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. अंजूची चौकशी करण्यासाठी राजस्थानमधील भिवडी येथील पोलीस हरियाणातील सोनीपतला पोहोचले. यावेळी पोलिसांनी अंजूला 12 प्रश्न विचारले, अंजूच्या जबाबाचे व्हिडीओ रेकॉर्डिंगही करण्यात आले आहे. अंजूने पोलिसांना सांगितलं की, ती स्वतःच्या मर्जीने पाकिस्तानात गेली होती. तिचे पती अरविंद याच्याशी मतभेद होते. 

भिवडीचे एसपी योगेश दाधीच यांनी सांगितलं की, अंजूचा पती अरविंद याने दाखल केलेल्या एफआयआरबाबत अंजूची चौकशी करण्यासाठी तपास अधिकाऱ्यांना पाठवण्यात आलं होतं. या दरम्यान अंजूसोबत जी काही चौकशी झाली त्याची नोंद करण्यात आली आहे. अंजूने चौकशीदरम्यान सांगितलं की, तिचा ख्रिश्चन धर्मावर विश्वास आहे आणि तिला हिंदू धर्माच्या नियमांची माहिती नाही.

अंजूला भेटण्यासाठी तिची मुलगीही सोनीपतला पोहोचली. यानंतर अंजू म्हणाली की, माझी मुलगी मला चांगल्या प्रकारे समजून घेते. यासोबतच अरविंदचे अंजूशी फोनवरही बराच वेळ बोलणे झाले. अंजूशी बोलल्यावर अरविंदचा विचार बदलला. अंजूवर दाखल करण्यात आलेला गुन्हा मागे घेतला जाईल असंही अरविंदने म्हटलं आहे. मुलांना जे हवे ते होईल. त्यांच्यावर सर्व अवलंबून आहे असं म्हटलं. 

अरविंदने अंजू आणि नसरुल्लाविरुद्ध भिवडीतील फुलबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. त्यात अरविंदने म्हटलं होतं की, लग्न होऊनही अंजूने मला आणि मुलांना विनाकारण सोडलं, यामुळे मानसिक आघात झाला आहे.

नसरुल्लावर आरोप करताना अरविंदने तक्रारीत म्हटलं आहे की, नसरुल्लाह याला अंजू विवाहित असून तिला दोन मुलं आहेत हे माहीत होतं, तरीही त्याने अंजूला फूस लावून तिला खोटी स्वप्ने दाखवून पाकिस्तानला बोलावलं. अंजूने मला फोन करून धमकी दिल्याचंही अरविंदने तक्रारीत म्हटलं आहे. 

अंजूच्या मुलांनी भेटण्यास दिला होता नकार 

अंजूने पाकिस्तानात जाऊन इस्लाम धर्म स्वीकारला आणि फातिमा झाली. यानंतर तिने तिचा फेसबुक मित्र नसरुल्लाह याच्याशी निकाह केला. पाकिस्तानातून परतल्यानंतर ग्वाल्हेरमध्ये राहणाऱ्या अंजूच्या वडिलांनी सांगितलं होतं की, माझा अंजूशी कोणताही संबंध नाही. मुलांनी अंजूला भेटण्यास नकार दिल्याचेही पती अरविंदने सांगितले. 

टॅग्स :IndiaभारतPakistanपाकिस्तान