शहरं
Join us  
Trending Stories
1
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्याविरुद्ध महाभियोग चालणार; २०७ खासदारांचा पाठिंबा
2
एक सेकंदात दोन्ही स्विच बंद करणं अशक्य, त्यावेळी नेमकं काय घडलं? या ५ बाबींमधून उघड होणार, अमेरिकन रिपोर्टचं पितळ उघडं पडणार
3
'आणखी किती पुरावे हवेत ते सांगा'; कोकाटेंचे आणखी व्हिडीओ समोर, आव्हाड म्हणाले, "व्यवस्थित बघा,कुठला पत्ता"
4
महाराष्ट्रानंतर आता बंगालमध्ये 'भाषा' पॉलिटिक्स? ममता बॅनर्जी यांनी उघड-उघड खेळलं 'बांगला कार्ड'!
5
'चायनीज' माल निघाला दगाबाज! बांगलादेशात कॉलेजवर कोसळलेले 'ते' लढाऊ विमान चिनी बनावटीचे
6
Deep Amavasya 2025: रिल्स करण्याच्या नादात चुकीचे पायंडे पाडू नका; दिव्यांची आवस 'अशी' करा!
7
IND vs ENG : 'ऑल इज वेल सीन'! विकेट किपिंगचा सराव करताना दिसला पंत (VIDEO)
8
Sonam Raghuvanshi : सोनमला अजिबात पश्चाताप नाही, कैद्यांसोबत...; जेलमध्ये कशी जगतेय राजाच्या हत्येची मास्टरमाईंड?
9
२३ विद्यार्थिनी-विद्यार्थ्यांवर लैंगिक अत्याचार, व्हिडीओही बनवले; वासनांध शिक्षकाचे हादरवून टाकणारे कृत्य
10
वेळीच व्हा सावध! सोमवारीच का असतो हार्ट अटॅकचा सर्वाधिक धोका? 'या' गोष्टी कारणीभूत
11
तुमच्या नावे कोणी बनावट लोन तर घेतलं नाहीये ना? घरबसल्या पॅन कार्डावरुन कसं तपासाल, दिसलं तर काय कराल?
12
७/११तील सर्व दोषी निर्दोष; असदुद्दीन ओवेसी म्हणतात, “गेली १७ वर्षे निष्पाप लोक जेलमध्ये...”
13
“कृषीमंत्री रमीत रमतो, हनीट्रॅपचा फास सत्ताधाऱ्यांच्या गळ्यात, उच्चस्तरीय चौकशी करा”: सपकाळ
14
सचिन पिळगावकरांनी घेतलेली मधुबालाची भेट, म्हणाले, "ती बाई जितकी सुंदर होती त्यापेक्षा १० पटीने..."
15
"आम्हाला तोंड उघडायला लावू नका..."; सुप्रीम कोर्ट ईडीवर संतापले; काय आहे प्रकरण?
16
MBA ग्रॅज्युएट चोर; २० वर्षांत चोरल्या १०० हून अधिक आलिशान गाड्या, असा लागला पोलिसांच्या हाती
17
भारत-पाक मॅच रद्द; आफ्रिदीसोबत गप्पा मारताना दिसल्यामुळे अजय देवगण ट्रोल, जाणून घ्या त्यामागचं सत्य
18
अंबानींच्या आवडत्या कंपनीचा शेअर आपटला; पण, 'या' स्टॉक्समुळे सेन्सेक्स-निफ्टीची दमदार वाढ
19
उल्हासनगर: आधी विनयभंग, तुरुंगातून बाहेर येताच पीडित मुलीच्या घरासमोर बँडबाजा व फटाक्याची आतिषबाजी
20
शेअर असावा तर असा! सलग २४ दिवसांपासून लागतंय अपर सर्किट; किंमत ₹५० पेक्षा कमी, गुंतवणूकदार मालामाल

९ दिवसांत ३ शहरं! "व्हायरल झालो, आमच्याच बातम्या सर्वत्र"; जावयासह पळून गेलेली सासू म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2025 15:23 IST

सासू आणि जावयाचा सर्वत्र शोध घेतला जात होता. मात्र ९ दिवसांनंतर अलीगढमधील दादोन पोलीस ठाण्यात येऊन ते सरेंडर झाले.

जावयासोबत पळून गेलेल्या सासूची सर्वत्र जोरदार चर्चा रंगली. या प्रकरणामुळे अनेकांना मोठा धक्का बसला. सासू आणि जावयाचा सर्वत्र शोध घेतला जात होता. मात्र ९ दिवसांनंतर अलीगढमधील दादोन पोलीस ठाण्यात येऊन ते सरेंडर झाले. याच दरम्यान सासूने आता प्रतिक्रिया दिली  आहे. "आम्ही खूप व्हायरल झालो होतो. आमच्या बातम्या सर्वत्र सुरू होत्या. जेव्हा जेव्हा मोबाईल पाहायचो तेव्हा फक्त आम्हीच दिसायचो" असं सासूने म्हटलं आहे. 

जावई राहुलने दिलेल्या माहितीनुसार, "९ दिवसांपूर्वी अलीगढहून कासगंजला गेलो होतो. तिथून दोघेही बसने बरेलीला पोहोचलो. मग तिथून थेट बिहारमधील मुझफ्फरपूर शहरात पोहोचलो. काही दिवस तिथे राहिले आणि त्यानंतर नेपाळ बॉर्डरकडे जाण्याचाही विचार केला. पण जेव्हा मी मुझफ्फरपूरमध्ये माझा मोबाईल वापरला तेव्हा मी पाहिलं की दोघांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. आमची सर्वत्र चर्चा होत आहे. यानंतर दोघांनीही स्वतःहून परतण्याचा निर्णय घेतला. मुजफ्फरपूरहून बस पकडली, वाटेत मथुरेच्या गया कट येथे उतरलो आणि नंतर खासगी गाडीने अलीगढला पोहोचलो. तिथे दादोन पोलीस ठाण्यात सरेंडर केलं."

पोलीस स्टेशनमध्ये चौकशीदरम्यान सासूने सांगितलं की, मी अनेक वर्षांपासून घरगुती हिंसाचाराची बळी होती. दारू पिऊन नवरा मला दररोज मारहाण करायचा. तो प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीवरून माझा अपमान करायचा आणि अनेक वेळा मला घराबाहेर काढण्याची धमकीही द्यायचा. मुलीचं लग्न राहुलसोबत ठरलं होतं. राहुल जेव्हा जेव्हा फोन करायचा तेव्हा कधी माझी मुलगी बोलायची तर कधी मी. मुलगी आणि नवरा या दोघांनाही माझ्यावर संशय येऊ लागला. घरात भांडणं वाढली. नवरा तिला वारंवार टोमणे मारायचा. राहुलसोबत पळून जा असं म्हणायचा. 

"मी लग्न करेन, पण एका अटीवर..."; सासूसोबत पळून गेलेला जावई काय म्हणाला?

सासूसोबत पळून गेलेला जावई राहुल म्हणाला की, "मी तिच्याशी लग्न करण्यास तयार आहे. बाकी तिची इच्छा आहे. माझी सासूवर वाईट नजर नव्हती. तिचा नवरा तिला त्रास द्यायचा. तो तिला मारहाण करायचा आणि खूप शिवीगाळ करायचा. ती तिच्याच पतीवर खूप नाराज होती आणि तिच्या कुटुंबातील सदस्यही तिला सपोर्ट करत नव्हते. मग ती माझ्याशी बोलू लागला आणि तिने मला सर्व काही सांगितलं. ६ एप्रिल रोजी मी खरेदीसाठी बाहेर गेलो होतो तेव्हा मला तिचा फोन आला आणि ती म्हणाली की जर तू मला घ्यायला आला नाहीस तर मी मरेन. तिने कोणतंही चुकीचं पाऊल उचलू नये म्हणून मी तिथे गेलो होतो."

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेश