शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

९ दिवसांत ३ शहरं! "व्हायरल झालो, आमच्याच बातम्या सर्वत्र"; जावयासह पळून गेलेली सासू म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2025 15:23 IST

सासू आणि जावयाचा सर्वत्र शोध घेतला जात होता. मात्र ९ दिवसांनंतर अलीगढमधील दादोन पोलीस ठाण्यात येऊन ते सरेंडर झाले.

जावयासोबत पळून गेलेल्या सासूची सर्वत्र जोरदार चर्चा रंगली. या प्रकरणामुळे अनेकांना मोठा धक्का बसला. सासू आणि जावयाचा सर्वत्र शोध घेतला जात होता. मात्र ९ दिवसांनंतर अलीगढमधील दादोन पोलीस ठाण्यात येऊन ते सरेंडर झाले. याच दरम्यान सासूने आता प्रतिक्रिया दिली  आहे. "आम्ही खूप व्हायरल झालो होतो. आमच्या बातम्या सर्वत्र सुरू होत्या. जेव्हा जेव्हा मोबाईल पाहायचो तेव्हा फक्त आम्हीच दिसायचो" असं सासूने म्हटलं आहे. 

जावई राहुलने दिलेल्या माहितीनुसार, "९ दिवसांपूर्वी अलीगढहून कासगंजला गेलो होतो. तिथून दोघेही बसने बरेलीला पोहोचलो. मग तिथून थेट बिहारमधील मुझफ्फरपूर शहरात पोहोचलो. काही दिवस तिथे राहिले आणि त्यानंतर नेपाळ बॉर्डरकडे जाण्याचाही विचार केला. पण जेव्हा मी मुझफ्फरपूरमध्ये माझा मोबाईल वापरला तेव्हा मी पाहिलं की दोघांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. आमची सर्वत्र चर्चा होत आहे. यानंतर दोघांनीही स्वतःहून परतण्याचा निर्णय घेतला. मुजफ्फरपूरहून बस पकडली, वाटेत मथुरेच्या गया कट येथे उतरलो आणि नंतर खासगी गाडीने अलीगढला पोहोचलो. तिथे दादोन पोलीस ठाण्यात सरेंडर केलं."

पोलीस स्टेशनमध्ये चौकशीदरम्यान सासूने सांगितलं की, मी अनेक वर्षांपासून घरगुती हिंसाचाराची बळी होती. दारू पिऊन नवरा मला दररोज मारहाण करायचा. तो प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीवरून माझा अपमान करायचा आणि अनेक वेळा मला घराबाहेर काढण्याची धमकीही द्यायचा. मुलीचं लग्न राहुलसोबत ठरलं होतं. राहुल जेव्हा जेव्हा फोन करायचा तेव्हा कधी माझी मुलगी बोलायची तर कधी मी. मुलगी आणि नवरा या दोघांनाही माझ्यावर संशय येऊ लागला. घरात भांडणं वाढली. नवरा तिला वारंवार टोमणे मारायचा. राहुलसोबत पळून जा असं म्हणायचा. 

"मी लग्न करेन, पण एका अटीवर..."; सासूसोबत पळून गेलेला जावई काय म्हणाला?

सासूसोबत पळून गेलेला जावई राहुल म्हणाला की, "मी तिच्याशी लग्न करण्यास तयार आहे. बाकी तिची इच्छा आहे. माझी सासूवर वाईट नजर नव्हती. तिचा नवरा तिला त्रास द्यायचा. तो तिला मारहाण करायचा आणि खूप शिवीगाळ करायचा. ती तिच्याच पतीवर खूप नाराज होती आणि तिच्या कुटुंबातील सदस्यही तिला सपोर्ट करत नव्हते. मग ती माझ्याशी बोलू लागला आणि तिने मला सर्व काही सांगितलं. ६ एप्रिल रोजी मी खरेदीसाठी बाहेर गेलो होतो तेव्हा मला तिचा फोन आला आणि ती म्हणाली की जर तू मला घ्यायला आला नाहीस तर मी मरेन. तिने कोणतंही चुकीचं पाऊल उचलू नये म्हणून मी तिथे गेलो होतो."

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेश