शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
4
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
5
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
6
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
7
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
8
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
9
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
10
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
11
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
12
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
13
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
14
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
15
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
16
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
17
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
18
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
20
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू

धक्कादायक! पत्नीसोबत भांडण झालं म्हणून मुलांना फेकलं दरीत 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2019 16:17 IST

पत्नीसोबत भांडण झालं म्हणून संतापलेल्या पतीने आपल्या दोन्ही मुलांना 300 फूट खोल दरीत फेकले आहे.

ठळक मुद्दे पत्नीसोबत भांडण झालं म्हणून संतापलेल्या पतीने आपल्या दोन्ही मुलांना 300 फूट खोल दरीत फेकले आहे. तामिळनाडूतील कोल्ली हिल्स येथे ही घटना घडली आहे. पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली असून अधिक तपास करत आहेत. 

नमक्कल - पती-पत्नीमध्ये भांडण झाल्याच्या अनेक घटना या सातत्याने समोर येत असतात. अशीच एक धक्कादायक घटना तामिळनाडूमध्ये घडली आहे. पत्नीसोबत भांडण झालं म्हणून पतीने आपल्या दोन्ही मुलांना 300 फूट खोल दरीत फेकल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तामिळनाडूतील कोल्ली हिल्स येथे ही घटना घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली असून अधिक तपास करत आहेत. 

मिळालेल्या माहितीनुसार, पत्नीसोबत भांडण झालं म्हणून संतापलेल्या पतीने आपल्या दोन्ही मुलांना 300 फूट खोल दरीत फेकले आहे. काही महिन्यांपूर्वी या पती-पत्नीत वाद झाला होता. वादानंतर नाराज झालेली पत्नी घर सोडून आपल्या वडिलांकडे राहायला गेली होती. पत्नी घरी परत येत नसल्याने नाराज झालेल्या पतीने रागाच्या भरात आपल्या दोन्ही मुलांना दरीत फेकून दिलं आहे. या प्रकरणी कोल्ली हिल्समधील वंजावधी नाडू पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानंतर पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 8 नोव्हेंबर रोजी ही घटना घडली आहे. मात्र आरोपीची पत्नी बुधवारी याबाबत तक्रार दाखल केल्यानंतर याबाबत माहिती मिळाली. सिरंजीवी (28) आणि त्याची पत्‍नी बक्कियम (24) हे दोघं तामिळनाडूत राहतात. गिरिदास (8) आणि कविदर्शिनी (5) ही दोन मुलं काही दिवसांपासून गायब असल्याची तक्रार पत्नीने पोलिसांत दाखल केली होती. पोलिसांनी या प्रकरणाचा अधिक तपास केला असता पतीने मुलांना खोल दरीत फेकल्याचं कबूल केलं. पत्नी भांडत असल्याने रागाच्या भरात आपल्या दोन्ही मुलांना खोल दरीत फेकल्याची माहिती सिरंजीवी याने पोलिसांना दिली. या प्रकरणी पोलिसांनी पतीला अटक केली आहे. 

पती-पत्नीमध्ये काही कौटुंबिक कारणांवरून वाद झाल्याच्या घटना या समोर येत असतात. पण त्यातील काही भांडणं ही काही वेळेस विकोपाला ही जातात. अशीच एक विचित्र घटना ही उत्तर प्रदेशच्या गोरखपूर जिल्हात घडली आहे. पत्नीला खाण्यासाठी अंडं न देणं एका पतीला चांगलंच महागात पडलं आहे. पती घरामध्ये खाण्यासाठी अंडी देत नाही म्हणून पत्नी घर सोडून प्रियकरासोबत पळाल्याची घटना समोर आली होती. उत्तर प्रदेशच्या गोरखपूरमध्ये ही घटना घडली होती. काही दिवसांपूर्वी पत्नीसाठी गिफ्ट न आणणं एका पतीला चांगलंच महागात पडलं होतं. करवा चौथला पत्नीने सोन्याची नथ आणायला सांगितली होती. मात्र फक्त साडी घेऊन पती पोहचल्याने तिचा पारा चांगलाच चढला. गिफ्ट न आणल्याने रागाच्या भरात पतीला पळवून पळवून मारल्याची घटना समोर आली होती. 

 

टॅग्स :TamilnaduतामिळनाडूCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस