शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

धक्कादायक! पत्नीसोबत भांडण झालं म्हणून मुलांना फेकलं दरीत 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2019 16:17 IST

पत्नीसोबत भांडण झालं म्हणून संतापलेल्या पतीने आपल्या दोन्ही मुलांना 300 फूट खोल दरीत फेकले आहे.

ठळक मुद्दे पत्नीसोबत भांडण झालं म्हणून संतापलेल्या पतीने आपल्या दोन्ही मुलांना 300 फूट खोल दरीत फेकले आहे. तामिळनाडूतील कोल्ली हिल्स येथे ही घटना घडली आहे. पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली असून अधिक तपास करत आहेत. 

नमक्कल - पती-पत्नीमध्ये भांडण झाल्याच्या अनेक घटना या सातत्याने समोर येत असतात. अशीच एक धक्कादायक घटना तामिळनाडूमध्ये घडली आहे. पत्नीसोबत भांडण झालं म्हणून पतीने आपल्या दोन्ही मुलांना 300 फूट खोल दरीत फेकल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तामिळनाडूतील कोल्ली हिल्स येथे ही घटना घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली असून अधिक तपास करत आहेत. 

मिळालेल्या माहितीनुसार, पत्नीसोबत भांडण झालं म्हणून संतापलेल्या पतीने आपल्या दोन्ही मुलांना 300 फूट खोल दरीत फेकले आहे. काही महिन्यांपूर्वी या पती-पत्नीत वाद झाला होता. वादानंतर नाराज झालेली पत्नी घर सोडून आपल्या वडिलांकडे राहायला गेली होती. पत्नी घरी परत येत नसल्याने नाराज झालेल्या पतीने रागाच्या भरात आपल्या दोन्ही मुलांना दरीत फेकून दिलं आहे. या प्रकरणी कोल्ली हिल्समधील वंजावधी नाडू पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानंतर पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 8 नोव्हेंबर रोजी ही घटना घडली आहे. मात्र आरोपीची पत्नी बुधवारी याबाबत तक्रार दाखल केल्यानंतर याबाबत माहिती मिळाली. सिरंजीवी (28) आणि त्याची पत्‍नी बक्कियम (24) हे दोघं तामिळनाडूत राहतात. गिरिदास (8) आणि कविदर्शिनी (5) ही दोन मुलं काही दिवसांपासून गायब असल्याची तक्रार पत्नीने पोलिसांत दाखल केली होती. पोलिसांनी या प्रकरणाचा अधिक तपास केला असता पतीने मुलांना खोल दरीत फेकल्याचं कबूल केलं. पत्नी भांडत असल्याने रागाच्या भरात आपल्या दोन्ही मुलांना खोल दरीत फेकल्याची माहिती सिरंजीवी याने पोलिसांना दिली. या प्रकरणी पोलिसांनी पतीला अटक केली आहे. 

पती-पत्नीमध्ये काही कौटुंबिक कारणांवरून वाद झाल्याच्या घटना या समोर येत असतात. पण त्यातील काही भांडणं ही काही वेळेस विकोपाला ही जातात. अशीच एक विचित्र घटना ही उत्तर प्रदेशच्या गोरखपूर जिल्हात घडली आहे. पत्नीला खाण्यासाठी अंडं न देणं एका पतीला चांगलंच महागात पडलं आहे. पती घरामध्ये खाण्यासाठी अंडी देत नाही म्हणून पत्नी घर सोडून प्रियकरासोबत पळाल्याची घटना समोर आली होती. उत्तर प्रदेशच्या गोरखपूरमध्ये ही घटना घडली होती. काही दिवसांपूर्वी पत्नीसाठी गिफ्ट न आणणं एका पतीला चांगलंच महागात पडलं होतं. करवा चौथला पत्नीने सोन्याची नथ आणायला सांगितली होती. मात्र फक्त साडी घेऊन पती पोहचल्याने तिचा पारा चांगलाच चढला. गिफ्ट न आणल्याने रागाच्या भरात पतीला पळवून पळवून मारल्याची घटना समोर आली होती. 

 

टॅग्स :TamilnaduतामिळनाडूCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस