शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! पत्नीसोबत भांडण झालं म्हणून मुलांना फेकलं दरीत 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2019 16:17 IST

पत्नीसोबत भांडण झालं म्हणून संतापलेल्या पतीने आपल्या दोन्ही मुलांना 300 फूट खोल दरीत फेकले आहे.

ठळक मुद्दे पत्नीसोबत भांडण झालं म्हणून संतापलेल्या पतीने आपल्या दोन्ही मुलांना 300 फूट खोल दरीत फेकले आहे. तामिळनाडूतील कोल्ली हिल्स येथे ही घटना घडली आहे. पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली असून अधिक तपास करत आहेत. 

नमक्कल - पती-पत्नीमध्ये भांडण झाल्याच्या अनेक घटना या सातत्याने समोर येत असतात. अशीच एक धक्कादायक घटना तामिळनाडूमध्ये घडली आहे. पत्नीसोबत भांडण झालं म्हणून पतीने आपल्या दोन्ही मुलांना 300 फूट खोल दरीत फेकल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तामिळनाडूतील कोल्ली हिल्स येथे ही घटना घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली असून अधिक तपास करत आहेत. 

मिळालेल्या माहितीनुसार, पत्नीसोबत भांडण झालं म्हणून संतापलेल्या पतीने आपल्या दोन्ही मुलांना 300 फूट खोल दरीत फेकले आहे. काही महिन्यांपूर्वी या पती-पत्नीत वाद झाला होता. वादानंतर नाराज झालेली पत्नी घर सोडून आपल्या वडिलांकडे राहायला गेली होती. पत्नी घरी परत येत नसल्याने नाराज झालेल्या पतीने रागाच्या भरात आपल्या दोन्ही मुलांना दरीत फेकून दिलं आहे. या प्रकरणी कोल्ली हिल्समधील वंजावधी नाडू पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानंतर पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 8 नोव्हेंबर रोजी ही घटना घडली आहे. मात्र आरोपीची पत्नी बुधवारी याबाबत तक्रार दाखल केल्यानंतर याबाबत माहिती मिळाली. सिरंजीवी (28) आणि त्याची पत्‍नी बक्कियम (24) हे दोघं तामिळनाडूत राहतात. गिरिदास (8) आणि कविदर्शिनी (5) ही दोन मुलं काही दिवसांपासून गायब असल्याची तक्रार पत्नीने पोलिसांत दाखल केली होती. पोलिसांनी या प्रकरणाचा अधिक तपास केला असता पतीने मुलांना खोल दरीत फेकल्याचं कबूल केलं. पत्नी भांडत असल्याने रागाच्या भरात आपल्या दोन्ही मुलांना खोल दरीत फेकल्याची माहिती सिरंजीवी याने पोलिसांना दिली. या प्रकरणी पोलिसांनी पतीला अटक केली आहे. 

पती-पत्नीमध्ये काही कौटुंबिक कारणांवरून वाद झाल्याच्या घटना या समोर येत असतात. पण त्यातील काही भांडणं ही काही वेळेस विकोपाला ही जातात. अशीच एक विचित्र घटना ही उत्तर प्रदेशच्या गोरखपूर जिल्हात घडली आहे. पत्नीला खाण्यासाठी अंडं न देणं एका पतीला चांगलंच महागात पडलं आहे. पती घरामध्ये खाण्यासाठी अंडी देत नाही म्हणून पत्नी घर सोडून प्रियकरासोबत पळाल्याची घटना समोर आली होती. उत्तर प्रदेशच्या गोरखपूरमध्ये ही घटना घडली होती. काही दिवसांपूर्वी पत्नीसाठी गिफ्ट न आणणं एका पतीला चांगलंच महागात पडलं होतं. करवा चौथला पत्नीने सोन्याची नथ आणायला सांगितली होती. मात्र फक्त साडी घेऊन पती पोहचल्याने तिचा पारा चांगलाच चढला. गिफ्ट न आणल्याने रागाच्या भरात पतीला पळवून पळवून मारल्याची घटना समोर आली होती. 

 

टॅग्स :TamilnaduतामिळनाडूCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस