शहरं
Join us  
Trending Stories
1
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
2
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
3
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
4
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
5
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
6
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
7
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
8
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
9
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
10
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
11
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
12
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
13
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
14
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
15
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
16
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
17
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
18
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य
19
IND vs PAK: टॉस अन् मॅचच्या निकालाचा संबंध काय..? जाणून घ्या 'या' मैदानावरचं खास कनेक्शन
20
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट

स्वाइन फ्लूच्या अफवेमुळे संपूर्ण गावावर बहिष्कार, दूध-पाण्याचा पुरवठा बंद 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2018 14:57 IST

आंध्र प्रदेशातील कृष्णा जिल्ह्यातील एका गावात स्वाइन फ्लूमुळे दोन जणांचा मृत्यू झाल्याची प्रचंड अफवा पसरली आहे. या अफवेमुळे सध्या येथील गावकऱ्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.

ठळक मुद्देअफवेमुळे संपूर्ण गावावर बहिष्कारगावाच्या दूध-पाणी पुरवठ्यावर परिणामगावात मुलांच्या शाळेची बस येत नाही

आंध्र प्रदेश - आंध्र प्रदेशातील कृष्णा जिल्ह्यातील एका गावात स्वाइन फ्लूमुळे दोन जणांचा मृत्यू झाल्याची प्रचंड अफवा पसरली आहे. या अफवेमुळे सध्या येथील गावकऱ्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. कारण, स्वाइन फ्लू आजार पसरल्याच्या अफवेमुळे या गावावरच बहिष्कार टाकण्यात आला आहे.  दरम्यान, संबंधितांचा मृत्यू स्वाइन फ्लूमुळे झाला नसल्याचं वैद्यकीय तपासणी अहवालात स्पष्ट झाले आहे. पण तरीही शेजारील गावातील ग्रामस्थ डॉक्टरांचेही म्हणणं ऐकण्यास तयार नाहीत. 

डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, हृदयविकाराच्या झटक्यामुळे संबंधितांचा मृत्यू झाला होता. वैद्यकीय तपासणीत आम्हाला स्वाइन फ्लूची लक्षण आढळली नाहीत. पसरलेल्या अफवांमुळे गावकऱ्यांमध्ये गैरसमज निर्माण झाला आहे. लोकांचा गैरसमज दूर करण्यासाठी प्रयत्न करत असल्याचंही डॉक्टरांनी सांगितले.

नेमकी काय आहे घटना?

आठवड्या भरापूर्वी कृष्णा जिल्ह्यातील एका गावात 45 वर्षीय नामचार्या आणि 32 वर्षीय मरियम्मा यांचा मृत्यू झाला होता. या दोघांचाही मृत्यू स्वाइन फ्लूमुळे झाल्याचे वृत्त पसरले. यामुळे या गावावर शेजारील गावांनी बहिष्कार टाकला. या गावातील स्थानिकांनी आरोप केला आहे की, जबरदस्तीनं आम्हाला प्रवासी बसमधून खाली उतरवलं जाते, लहान मुलांना घेण्यासाठी शाळेची बस येत नाही, दूध विक्री होत नाहीय, एवढंच नाही तर गावाच्या पाणीपुरवठ्यातही अडथळे निर्माण केले जात आहेत.  

दरम्यान, जिल्हाधिकाऱ्यांनी येथील परिस्थितीची माहिती जाणून घेतली. गावातील तपासणी आणि शेजारील गावकऱ्यांच्या शंका दूर करण्यासाठी डॉक्टरांचं एक पथक येथे रवाना करण्यात आले आहे. शिवाय, गावावर अद्यापही अन्याय सुरू असल्यास त्याविरोधात कारवाई करण्यात येणार, असं आश्वासन जिल्हा मुख्यालयाकडून देण्यात आले आहे. 

टॅग्स :Swine Flueस्वाईन फ्लूAndhra Pradeshआंध्र प्रदेश