शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
4
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
5
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
6
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
7
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
8
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
9
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
10
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
11
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
12
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
13
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
14
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
15
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
16
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
17
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
18
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
19
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
20
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...

चिमुकल्यांच्या सायकलमध्ये अडकली विजेची तार; एकाचा गेला जीव तर दुसऱ्याची मृत्यूशी झुंज सुरु

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2024 20:34 IST

आँध्र प्रदेशात विजेचा धक्का बसल्याने एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला तर दुसरा गंभीर जखमी झाला आहे.

Andhra Pradesh Children Electrocuted :आंध्र प्रदेशातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. विजेचा धक्का बसल्याने एका शाळकरी मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला. दोन चिमुकली मुले सायकल चालवत असताना विजेच्या तारेच्या संपर्कात आल्याने हा सगळा धक्कादायक प्रकार घडला. मुलांच्या मृत्यूच्या घटनेने कुटुंबियांना धक्का बसला असून परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झालं आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरु केला आहे.

आंध्र प्रदेशातील कडप्पा जिल्ह्यात एका शाळकरी मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला. दोन्ही शाळकरी मुले सायकलवरून जात असताना त्यामध्ये विजेची तार अडकली. काही वेळातच त्यांच्या सायकलला आग लागली आणि दोघेही खाली पडले. या दोघांपैकी एकाने बराच वेळ तार गुंडाळून ठेवल्याने त्याचा वेदनादायक मृत्यू झाला. दुसरा मुलगाही सायकलच्या जवळ होता. त्याची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

ही धक्कादायक घटना कुड्डापाह जिल्ह्यातील बेलामोंडी भागात घडली. घटनेच्या ठिकाणापासून जवळच आंतरराष्ट्रीय कल्याण मंडपम देखील आहे. तनवीर आणि ॲडम अशी या विद्यार्थ्यांची नावे आहेत. दोन्ही मुले सायकलवरुन पडताच लोक मदतीसाठी धावत आले. लोकांनी कशीतरी विजेची तार काढून दोन्ही मुलांना रुग्णालयात दाखल केले. मिळालेल्या माहितीनुसार, विजेचा धक्का बसलेल्या मुलांपैकी एक दहावीत शिकत होता तर दुसरा आठवीचा विद्यार्थी होता. विजेचा धक्का इतका जबरदस्त होता क्षणात सायकलने पेट घेतला.

दरम्यान, या घटनेनंतर रस्त्यावर उघड्या विजेच्या तारा कशा पडल्या आहेत, असा सवाल लोक विचारत आहेत. या प्रकरणामुळे सर्वांनाच धक्का बसला आहे. भारतात माणसाच्या जीवनाचे मूल्य खूपच कमी झाल्याचे लोक सोशल मीडियावर म्हणत आहेत. दुसरीकडे, दिल्लीतही असाच एक प्रकार उघडकीस आला होता. मुसळधार पावसात विजेचा धक्का लागून एका तरुणाचा मृत्यू झाला होता. दिल्लीत राहून तो नागरी सेवांची तयारी करत होता. 

टॅग्स :Andhra Pradeshआंध्र प्रदेशSocial Viralसोशल व्हायरलelectricityवीज