शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
3
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
4
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
5
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
6
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
7
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
8
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
9
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
10
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
11
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
12
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
13
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
14
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
15
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
16
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
17
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
18
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
19
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
20
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
Daily Top 2Weekly Top 5

हाहाकार! आंध्र प्रदेशात पावसाचे थैमान; कंबरभर पाण्यातून निघाली अंत्ययात्रा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2024 10:52 IST

चित्तूर जिल्ह्यात जोरदार पाऊस असतानाच एका कुटुंबातील व्यक्तीचं निधन झालं. त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यासाठी लोकांना कंबरभर पाण्यातून जावं लागलं. 

आंध्र प्रदेशमध्ये पावसामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी पाणी साचलं आहे. जनजीवन विस्कळीत झालं असून लोकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. चित्तूर जिल्ह्यात जोरदार पाऊस असतानाच एका कुटुंबातील व्यक्तीचं निधन झालं. त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यासाठी लोकांना कंबरभर पाण्यातून जावं लागल्याची घटना समोर आली आहे.

पाण्यातून जात असलेल्या या लोकांचा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. चित्तूरच्या कस्तुरी नायडू कांड्रिगा येथे राहणारे शंकर (५३) यांचा मंगळवारी मृत्यू झाला. याच दरम्यान राज्यात अतिवृष्टीचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला होता. अशा परिस्थितीत अंत्यसंस्कार करण्यासाठी कुटुंबाला कंबरभर पाण्यातून स्मशानभूमी गाठावी लागली.

अतिवृष्टीनंतर भविष्यात अशा समस्या टाळण्यासाठी ग्रामस्थांनी पूल बांधण्याची मागणी केली आहे. भारतीय हवामान विभाग (IMD) ने दिलेल्या माहितीनुसार, दक्षिण-पश्चिम आणि लगतच्या दक्षिण-पूर्व बंगालच्या उपसागरावर दाबाचे क्षेत्र स्पष्टपणे तयार होत आहे. IMD ने मंगळवारी आंध्र प्रदेश आणि यनममध्ये मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे.

आंध्र प्रदेश राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने सांगितलं की, गुरुवारी पश्चिम गोदावरी, एलुरु, कृष्णा आणि एनटीआर जिल्ह्यांच्या काही भागात मुसळधार पाऊस ते अतिवृष्टीची शक्यता आहे. IMD ने गुंटूर, बापटला, पलानाडू, प्रकाशम, नेल्लोर, नंदयाला, अन्नमय्या, चित्तूर, तिरुपती आणि कुरनूल जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज वर्तवला आहे.

टॅग्स :Andhra Pradeshआंध्र प्रदेशRainपाऊस