शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
3
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
4
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
5
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
6
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
7
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
9
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
10
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
11
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
12
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
13
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
14
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
15
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
16
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
17
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
18
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
19
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
20
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!

हाहाकार! आंध्र प्रदेशात पावसाचे थैमान; कंबरभर पाण्यातून निघाली अंत्ययात्रा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2024 10:52 IST

चित्तूर जिल्ह्यात जोरदार पाऊस असतानाच एका कुटुंबातील व्यक्तीचं निधन झालं. त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यासाठी लोकांना कंबरभर पाण्यातून जावं लागलं. 

आंध्र प्रदेशमध्ये पावसामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी पाणी साचलं आहे. जनजीवन विस्कळीत झालं असून लोकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. चित्तूर जिल्ह्यात जोरदार पाऊस असतानाच एका कुटुंबातील व्यक्तीचं निधन झालं. त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यासाठी लोकांना कंबरभर पाण्यातून जावं लागल्याची घटना समोर आली आहे.

पाण्यातून जात असलेल्या या लोकांचा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. चित्तूरच्या कस्तुरी नायडू कांड्रिगा येथे राहणारे शंकर (५३) यांचा मंगळवारी मृत्यू झाला. याच दरम्यान राज्यात अतिवृष्टीचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला होता. अशा परिस्थितीत अंत्यसंस्कार करण्यासाठी कुटुंबाला कंबरभर पाण्यातून स्मशानभूमी गाठावी लागली.

अतिवृष्टीनंतर भविष्यात अशा समस्या टाळण्यासाठी ग्रामस्थांनी पूल बांधण्याची मागणी केली आहे. भारतीय हवामान विभाग (IMD) ने दिलेल्या माहितीनुसार, दक्षिण-पश्चिम आणि लगतच्या दक्षिण-पूर्व बंगालच्या उपसागरावर दाबाचे क्षेत्र स्पष्टपणे तयार होत आहे. IMD ने मंगळवारी आंध्र प्रदेश आणि यनममध्ये मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे.

आंध्र प्रदेश राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने सांगितलं की, गुरुवारी पश्चिम गोदावरी, एलुरु, कृष्णा आणि एनटीआर जिल्ह्यांच्या काही भागात मुसळधार पाऊस ते अतिवृष्टीची शक्यता आहे. IMD ने गुंटूर, बापटला, पलानाडू, प्रकाशम, नेल्लोर, नंदयाला, अन्नमय्या, चित्तूर, तिरुपती आणि कुरनूल जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज वर्तवला आहे.

टॅग्स :Andhra Pradeshआंध्र प्रदेशRainपाऊस