शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

हाहाकार! आंध्र प्रदेशात पावसाचे थैमान; कंबरभर पाण्यातून निघाली अंत्ययात्रा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2024 10:52 IST

चित्तूर जिल्ह्यात जोरदार पाऊस असतानाच एका कुटुंबातील व्यक्तीचं निधन झालं. त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यासाठी लोकांना कंबरभर पाण्यातून जावं लागलं. 

आंध्र प्रदेशमध्ये पावसामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी पाणी साचलं आहे. जनजीवन विस्कळीत झालं असून लोकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. चित्तूर जिल्ह्यात जोरदार पाऊस असतानाच एका कुटुंबातील व्यक्तीचं निधन झालं. त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यासाठी लोकांना कंबरभर पाण्यातून जावं लागल्याची घटना समोर आली आहे.

पाण्यातून जात असलेल्या या लोकांचा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. चित्तूरच्या कस्तुरी नायडू कांड्रिगा येथे राहणारे शंकर (५३) यांचा मंगळवारी मृत्यू झाला. याच दरम्यान राज्यात अतिवृष्टीचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला होता. अशा परिस्थितीत अंत्यसंस्कार करण्यासाठी कुटुंबाला कंबरभर पाण्यातून स्मशानभूमी गाठावी लागली.

अतिवृष्टीनंतर भविष्यात अशा समस्या टाळण्यासाठी ग्रामस्थांनी पूल बांधण्याची मागणी केली आहे. भारतीय हवामान विभाग (IMD) ने दिलेल्या माहितीनुसार, दक्षिण-पश्चिम आणि लगतच्या दक्षिण-पूर्व बंगालच्या उपसागरावर दाबाचे क्षेत्र स्पष्टपणे तयार होत आहे. IMD ने मंगळवारी आंध्र प्रदेश आणि यनममध्ये मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे.

आंध्र प्रदेश राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने सांगितलं की, गुरुवारी पश्चिम गोदावरी, एलुरु, कृष्णा आणि एनटीआर जिल्ह्यांच्या काही भागात मुसळधार पाऊस ते अतिवृष्टीची शक्यता आहे. IMD ने गुंटूर, बापटला, पलानाडू, प्रकाशम, नेल्लोर, नंदयाला, अन्नमय्या, चित्तूर, तिरुपती आणि कुरनूल जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज वर्तवला आहे.

टॅग्स :Andhra Pradeshआंध्र प्रदेशRainपाऊस