शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
2
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
3
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
4
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
5
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
6
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
7
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
8
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
9
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
10
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
11
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
12
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
13
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
14
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
15
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
16
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
17
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
18
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
19
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
20
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती

...अन् त्यांनी 'या' कारणामुळे मृतदेहाला मिठामध्ये झाकून ठेवलं; पण सत्य काही वेगळं होतं 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2019 17:02 IST

सांवेर येथील सार्वजनिक आरोग्य केंद्रात हा धक्कादायक प्रकार घडला आहे.

इंदोर - सोशल मीडियात फिरणाऱ्या व्हायरल मॅसेजचा परिणाम लोकांच्या मनावर कितपत होतं याचं अजब प्रकरण मध्य प्रदेशातील इंदोरमध्ये घडलं आहे. तलावात बुडून मृत्यू झालेल्या दोन भावांचे मृतदेह एका सरकारी आरोग्य केंद्रात रात्रभर मिठात दाबून ठेवण्यात आलं होतं. असं केल्याने ते मृत झालेले दोघं पुन्हा जीवित होतात असा संदेश व्हॉट्सअपवर व्हायरल झाल्याने मृतकाच्या कुटुंबीयांकडून हा अंधविश्वासाचा खेळ रात्रभर खेळला गेला. 

मध्य प्रदेशातीलआरोग्य मंत्री तुलसीराम सिलावट यांच्या मतदारसंघातील सांवेर येथील सार्वजनिक आरोग्य केंद्रात हा धक्कादायक प्रकार घडला आहे. रविवारी गावाजवळील तलावात पोहण्यासाठी गेलेले सख्खे भाऊ कमलेश(20) आणि हरीश(18) यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला होता. त्यांना पाण्यातून बाहेर काढून सांवेर येथील सार्वजनिक आरोग्य केंद्रात आणलं गेलं. डॉक्टरांच्या तपासणीनंतर त्यांना मृत घोषित करण्यात आलं. 

अधिकाऱ्यांनी सांगितले की, मृत युवकांच्या नातेवाईकांनी सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या मॅसेजचा हवाला देत दोन्ही मृतदेह दोन क्विंटल जाड्या मिठामध्ये रात्रभर सार्वजनिक आरोग्य केंद्रात ठेवलं. या मॅसेजमध्ये अशी अफवा पसरविण्यात आली होती की, कोणत्याही व्यक्तीचा बुडून मृत्यू झाला असेल तर त्याच्या शरीराला जाड्या मिठाने झाकून ठेवा. असं केल्यास तो मृत झालेला व्यक्ती पुन्हा जिवंत होईल. मात्र चंद्रावती पोलिसांनी सांगितल्यानुसार सोमवारी या युवकांचे मृतदेह पोस्टमॉर्टम करुन अंत्यसंस्कारासाठी नातेवाईकांकडे सुपूर्द केले. त्यांचे अंत्यसंस्कार झाले आहेत. 

दरम्यान सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या दोन्ही मृतदेहांचे फोटोनंतर सार्वजनिक आरोग्य विभागावर प्रश्न उभे राहत आहेत. या घटनेवर आरोग्य अधिकारी प्रविण जडिया यांनी सांगितले की, या घटनेची माहिती मला मिळाली आहे. ग्रामीण भागातील गावकऱ्यांच्या दबावामुळे डॉक्टरांना ही अंधश्रद्धेची घटना रोखता आली नाही. मात्र या घटनेची सखोल चौकशी करुन कारवाई करु असं त्यांनी सांगितले आहे.  मात्र समाजात घडणाऱ्या अशा घटनांमुळे अंधविश्वासाला खतपाणी दिलं जात आहे. सोशल मीडियातील व्हायरल मॅसेजवर लोकांनी कितपत विश्वास ठेवावा याची जनजागरुकता लोकांमध्ये होणं गरजेचे आहे.   

टॅग्स :Deathमृत्यूMadhya Pradeshमध्य प्रदेशHealthआरोग्य