शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
2
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
3
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
4
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
5
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
6
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
7
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
8
गर्भवती होताच कोरियन सरकारने दिला भरभरून पैसा; मूळ भारतीय महिलेने हिशोबच सांगितला
9
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
10
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
11
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
12
Pitru Paksha 2025: घरात पितरांचे फोटो आहेत, पण दिशा चुकीची असेल तर कसा जाईल वास्तुदोष?
13
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
14
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
15
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
16
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?
17
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
18
जबरदस्त कॅमेरा आणि दमदार बॅटरी, किंमत १० हजारांहून कमी; नव्या 5G फोनची सर्वत्र चर्चा!
19
“PM मोदींच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ७५ ST बसस्थानकावर मोफत वाचनालय सुरू करणार”: सरनाईक
20
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...

...अन् त्यांनी 'या' कारणामुळे मृतदेहाला मिठामध्ये झाकून ठेवलं; पण सत्य काही वेगळं होतं 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2019 17:02 IST

सांवेर येथील सार्वजनिक आरोग्य केंद्रात हा धक्कादायक प्रकार घडला आहे.

इंदोर - सोशल मीडियात फिरणाऱ्या व्हायरल मॅसेजचा परिणाम लोकांच्या मनावर कितपत होतं याचं अजब प्रकरण मध्य प्रदेशातील इंदोरमध्ये घडलं आहे. तलावात बुडून मृत्यू झालेल्या दोन भावांचे मृतदेह एका सरकारी आरोग्य केंद्रात रात्रभर मिठात दाबून ठेवण्यात आलं होतं. असं केल्याने ते मृत झालेले दोघं पुन्हा जीवित होतात असा संदेश व्हॉट्सअपवर व्हायरल झाल्याने मृतकाच्या कुटुंबीयांकडून हा अंधविश्वासाचा खेळ रात्रभर खेळला गेला. 

मध्य प्रदेशातीलआरोग्य मंत्री तुलसीराम सिलावट यांच्या मतदारसंघातील सांवेर येथील सार्वजनिक आरोग्य केंद्रात हा धक्कादायक प्रकार घडला आहे. रविवारी गावाजवळील तलावात पोहण्यासाठी गेलेले सख्खे भाऊ कमलेश(20) आणि हरीश(18) यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला होता. त्यांना पाण्यातून बाहेर काढून सांवेर येथील सार्वजनिक आरोग्य केंद्रात आणलं गेलं. डॉक्टरांच्या तपासणीनंतर त्यांना मृत घोषित करण्यात आलं. 

अधिकाऱ्यांनी सांगितले की, मृत युवकांच्या नातेवाईकांनी सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या मॅसेजचा हवाला देत दोन्ही मृतदेह दोन क्विंटल जाड्या मिठामध्ये रात्रभर सार्वजनिक आरोग्य केंद्रात ठेवलं. या मॅसेजमध्ये अशी अफवा पसरविण्यात आली होती की, कोणत्याही व्यक्तीचा बुडून मृत्यू झाला असेल तर त्याच्या शरीराला जाड्या मिठाने झाकून ठेवा. असं केल्यास तो मृत झालेला व्यक्ती पुन्हा जिवंत होईल. मात्र चंद्रावती पोलिसांनी सांगितल्यानुसार सोमवारी या युवकांचे मृतदेह पोस्टमॉर्टम करुन अंत्यसंस्कारासाठी नातेवाईकांकडे सुपूर्द केले. त्यांचे अंत्यसंस्कार झाले आहेत. 

दरम्यान सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या दोन्ही मृतदेहांचे फोटोनंतर सार्वजनिक आरोग्य विभागावर प्रश्न उभे राहत आहेत. या घटनेवर आरोग्य अधिकारी प्रविण जडिया यांनी सांगितले की, या घटनेची माहिती मला मिळाली आहे. ग्रामीण भागातील गावकऱ्यांच्या दबावामुळे डॉक्टरांना ही अंधश्रद्धेची घटना रोखता आली नाही. मात्र या घटनेची सखोल चौकशी करुन कारवाई करु असं त्यांनी सांगितले आहे.  मात्र समाजात घडणाऱ्या अशा घटनांमुळे अंधविश्वासाला खतपाणी दिलं जात आहे. सोशल मीडियातील व्हायरल मॅसेजवर लोकांनी कितपत विश्वास ठेवावा याची जनजागरुकता लोकांमध्ये होणं गरजेचे आहे.   

टॅग्स :Deathमृत्यूMadhya Pradeshमध्य प्रदेशHealthआरोग्य