शहरं
Join us  
Trending Stories
1
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
2
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
3
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
4
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
5
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
6
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
7
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
8
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
9
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
10
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
11
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
12
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
13
Nagpur Rains : अंदाज खरा ठरला ! मुसळधार पावसाने नागपूरकरांना झाेडपले; अजून किती दिवस असाच बरसणार?
14
Shalarth ID Scam : 'ते' ६३२ शिक्षक, मुख्याध्यापक तुरुंगात जाणार? शिक्षण क्षेत्रातील सर्वात माेठा घोटाळ्याची झाडाझडती सुरु
15
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
16
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
17
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
18
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
19
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
20
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?

आता शत्रूची वाट लागणार! जंगलात लपलेल्या दहशतवाद्यांना कोब्रा कमांडो शोधून काढणार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2023 16:47 IST

जम्मू काश्मीरमध्ये पहिल्यांदाच कोब्रा कमांडोची तुकडी पाठवण्यात आली आहे

Anantnag Encounter, CoBRA commando Unit Deployed: दक्षिण काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यातील कोकरनागमध्ये गेल्या आठवड्यात सुरू झालेली चकमक आज सहाव्या दिवशीही सुरूच आहे. सुरक्षा दलांकडून मोठ्या प्रमाणावर शोधमोहीम राबविण्यात येत आहे. आज गोळीबार होताना दिसत नसला, तरी सुरक्षा दलाच्या या मोठ्या शोध मोहिमेत एक हजाराहून अधिक सुरक्षा कर्मचारी गुंतले आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काल चकमकीच्या ठिकाणाजवळ एक जळालेला मृतदेह सापडला होता, ज्याचा पोशाख अतिरेक्याचा होता. जंगलात लष्करी कारवायांमध्ये एक्स्पर्ट मानल्या जाणारे कोब्रा कमांडोही दहशतवाद्यांच्या शोधात तैनात करण्यात आले आहेत.

चकमकीत TRF अतिरेकी उझैर अहमदच्या कुटुंबीयांचे डीएनए नमुने घेतले जाण्याची शक्यता आहे, जेणेकरून मृतदेह कोणाचा आहे हे स्पष्ट होईल. अधिकृत सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, काश्मीर खोऱ्यात सध्या 81 सक्रिय अतिरेकी आहेत, ज्यात पाकिस्तानी वंशाचे 48 विदेशी दहशतवादी आणि 33 स्थानिक दहशतवादी आहेत.

कुठे, किती परदेशी दहशतवादी?

दक्षिण काश्मीरमध्ये एकूण 56 सक्रिय अतिरेकी आहेत, त्यापैकी 28 पाकिस्तानी वंशाचे आहेत. दक्षिण काश्मीरमध्ये अनंतनाग, पुलवामा, शोपियान आणि कुलगाम या जिल्ह्यांचा समावेश आहे. हा परिसर दहशतवाद्यांचा गड मानला जातो. उत्तर काश्मीरमध्ये 16 अतिरेकी सक्रिय असून त्यापैकी 13 विदेशी आहेत. उत्तर काश्मीरमध्ये बारामुल्ला, कुपवाडा, बांदीपोरा यांचा समावेश आहे. श्रीनगर, गंदरबल आणि बडगाम जिल्ह्यांचा समावेश असलेल्या मध्य काश्मीरमध्ये एकूण 9 अतिरेकी सक्रिय आहेत, त्यापैकी 7 विदेशी अतिरेकी असल्याचे सांगितले जाते.

पाकिस्तानी हस्तक खूश नाहीत- मनोज सिन्हा

लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा म्हणाले की, सैनिकांच्या सांडलेल्या रक्ताच्या प्रत्येक थेंबाचा हिशोब घेतला जाईल. जम्मू-काश्मीरचे लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा यांनी गेल्या काही वर्षांत काश्मीरमध्ये झालेल्या सर्वात मोठ्या हल्ल्याबद्दल बोलताना प्रत्येक शहीद जवानाच्या रक्ताच्या प्रत्येक थेंबाचा हिशोब घेतला जाईल, असे स्पष्ट शब्दांत सांगितले आहे. मनोज सिन्हा म्हणाले की, पाकिस्तानात बसलेले दहशतवादी हे जम्मू-काश्मीरमधील घडामोडींवर खूश नाहीत. आता त्यांच्या सूचनेनुसार त्यांनी आमच्या शूर सैन्यावर आणि जम्मू-काश्मीरच्या अधिकाऱ्यांवर हल्ला केला आहे. देशाची एकता आणि अखंडतेचे रक्षण करण्यासाठी आपल्या सैनिकांनी सर्वोच्च बलिदान दिले आहे. त्यामुळे आता शत्रूंची खैर नाही, कारण कोब्रा कमांडोज जंगलात लपलेले दहशतवादी शोधतील.

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरTerrorismदहशतवादterroristदहशतवादीIndian Armyभारतीय जवान