शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजना ज्यांनी राबविली, ते म्हणाले 'आम्ही कर्जात आहोत'; MSP वेळी हात वर केले, केंद्राला पत्र
2
शनी ग्रहाच्या चंद्राने केमिस्ट्रीला देखील फेल केले; तेल आणि पाणी...
3
"सांगा, ही मतचोरी आहे की व्होट जिहाद?"; भाजपाचा विरोधी पक्षांना खोचक सवाल, दिली आकडेवारी
4
ट्रम्प यांच्या धमक्यांचा परिणाम; रशियाकडून भारताला होणारा तेल पुरवठा झाला कमी, नव्या पुरवठादाराचा शोध घ्यावा लागणार?
5
हर'मन' जीत लिया! Will to Win मुळे जगज्जेतेपदाचं स्वप्न साकार, आता थांबायचं नाय...
6
५० लाखांचं पॅकेज असूनही दुःखी; कितीही कमावले तरी 'ते पुरेसे' का वाटत नाही? चार्टर्ड अकाउंटंटची पोस्ट Viral!
7
Tejashwi Yadav : "प्रत्येक महिलेला ३० हजार, शेतकऱ्यांना बोनस, मोफत वीज..."; तेजस्वी यादव यांच्या मोठ्या घोषणा
8
Tripuri Purnima 2025: त्रिपुरी पौर्णिमा हीच 'मनोरथ पौर्णिमा'; ५ नोव्हेंबरला 'या' वस्तूंचे दान ठरेल वरदान!
9
'तुझ्यासाठी बायकोला संपवलं'; दुसऱ्या लग्नासाठी डॉक्टरने केली पत्नीची हत्या; मेसेजमुळे 'डबल गेम'चा पर्दाफाश
10
...म्हणून त्या डंपरचालकाने ५० जणांना चिरडलं, धक्कादायक कारण समोर आलं
11
ऐतिहासिक अंदाज: निफ्टी ५४,००० अंकांचा टप्पा गाठणार; काय म्हणाले एक्सपर्ट?
12
आई-वडिलांशिवाय लेकाची पहिली फ्लाईट, जिनिलिया देशमुखने शेअर केला व्हिडीओ; म्हणाली...
13
काळाचा घाला! बाराबंकीमध्ये भीषण अपघात; ६ जणांचा मृत्यू, ८ जखमी, कारचा चक्काचूर
14
Reliance Anil Ambani: अनिल अंबानींची ७,५०० कोटींची संपत्ती जप्त; नवी मुंबईतील १३२ एकर जागा, पाली हिलमधील घरासह ४० संपत्त्यांवर टाच
15
पगार नाही तर विमानही नाही! इंजिनिअर्सच्या संपाने पाकिस्तान आंतरराष्ट्रीय एअरलाईन्स ठप्प, प्रवाशांचे हाल
16
Tripuri Purnima 2025: दिवाळीनंतर येणारी त्रिपुरी पौर्णिमा का महत्त्वाची? कशी करावी शिवउपासना?
17
CA Final Result: सीए फायनल परीक्षेत मुकुंद अगिवाल देशात प्रथम; फाऊंडेशन परीक्षेत मुंबईचा नील राजेश शाह तिसरा
18
मलायकासोबत दिसणारा 'तो' कोण? अभिनेत्रीहून १७ वर्ष लहान; प्रचंड श्रीमंत आहे हा 'मिस्ट्री मॅन'!
19
हातावर मेंदी लावून आल्या म्हणून मुलींना चक्क वर्गात बसू देण्यास शाळेचा नकार; मुंबईतील घटना
20
कडक! सलमान खानचं गजब ट्रान्सफॉर्मेशन, ६० वर्षांचा होणार भाईजान; बॉडी दाखवत म्हणाला...

आता शत्रूची वाट लागणार! जंगलात लपलेल्या दहशतवाद्यांना कोब्रा कमांडो शोधून काढणार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2023 16:47 IST

जम्मू काश्मीरमध्ये पहिल्यांदाच कोब्रा कमांडोची तुकडी पाठवण्यात आली आहे

Anantnag Encounter, CoBRA commando Unit Deployed: दक्षिण काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यातील कोकरनागमध्ये गेल्या आठवड्यात सुरू झालेली चकमक आज सहाव्या दिवशीही सुरूच आहे. सुरक्षा दलांकडून मोठ्या प्रमाणावर शोधमोहीम राबविण्यात येत आहे. आज गोळीबार होताना दिसत नसला, तरी सुरक्षा दलाच्या या मोठ्या शोध मोहिमेत एक हजाराहून अधिक सुरक्षा कर्मचारी गुंतले आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काल चकमकीच्या ठिकाणाजवळ एक जळालेला मृतदेह सापडला होता, ज्याचा पोशाख अतिरेक्याचा होता. जंगलात लष्करी कारवायांमध्ये एक्स्पर्ट मानल्या जाणारे कोब्रा कमांडोही दहशतवाद्यांच्या शोधात तैनात करण्यात आले आहेत.

चकमकीत TRF अतिरेकी उझैर अहमदच्या कुटुंबीयांचे डीएनए नमुने घेतले जाण्याची शक्यता आहे, जेणेकरून मृतदेह कोणाचा आहे हे स्पष्ट होईल. अधिकृत सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, काश्मीर खोऱ्यात सध्या 81 सक्रिय अतिरेकी आहेत, ज्यात पाकिस्तानी वंशाचे 48 विदेशी दहशतवादी आणि 33 स्थानिक दहशतवादी आहेत.

कुठे, किती परदेशी दहशतवादी?

दक्षिण काश्मीरमध्ये एकूण 56 सक्रिय अतिरेकी आहेत, त्यापैकी 28 पाकिस्तानी वंशाचे आहेत. दक्षिण काश्मीरमध्ये अनंतनाग, पुलवामा, शोपियान आणि कुलगाम या जिल्ह्यांचा समावेश आहे. हा परिसर दहशतवाद्यांचा गड मानला जातो. उत्तर काश्मीरमध्ये 16 अतिरेकी सक्रिय असून त्यापैकी 13 विदेशी आहेत. उत्तर काश्मीरमध्ये बारामुल्ला, कुपवाडा, बांदीपोरा यांचा समावेश आहे. श्रीनगर, गंदरबल आणि बडगाम जिल्ह्यांचा समावेश असलेल्या मध्य काश्मीरमध्ये एकूण 9 अतिरेकी सक्रिय आहेत, त्यापैकी 7 विदेशी अतिरेकी असल्याचे सांगितले जाते.

पाकिस्तानी हस्तक खूश नाहीत- मनोज सिन्हा

लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा म्हणाले की, सैनिकांच्या सांडलेल्या रक्ताच्या प्रत्येक थेंबाचा हिशोब घेतला जाईल. जम्मू-काश्मीरचे लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा यांनी गेल्या काही वर्षांत काश्मीरमध्ये झालेल्या सर्वात मोठ्या हल्ल्याबद्दल बोलताना प्रत्येक शहीद जवानाच्या रक्ताच्या प्रत्येक थेंबाचा हिशोब घेतला जाईल, असे स्पष्ट शब्दांत सांगितले आहे. मनोज सिन्हा म्हणाले की, पाकिस्तानात बसलेले दहशतवादी हे जम्मू-काश्मीरमधील घडामोडींवर खूश नाहीत. आता त्यांच्या सूचनेनुसार त्यांनी आमच्या शूर सैन्यावर आणि जम्मू-काश्मीरच्या अधिकाऱ्यांवर हल्ला केला आहे. देशाची एकता आणि अखंडतेचे रक्षण करण्यासाठी आपल्या सैनिकांनी सर्वोच्च बलिदान दिले आहे. त्यामुळे आता शत्रूंची खैर नाही, कारण कोब्रा कमांडोज जंगलात लपलेले दहशतवादी शोधतील.

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरTerrorismदहशतवादterroristदहशतवादीIndian Armyभारतीय जवान