शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : बुमराह-वरुण चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
5
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
6
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
7
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
8
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
9
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
10
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
11
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
12
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
13
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
14
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
15
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
16
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
17
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
18
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
19
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
20
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

आता शत्रूची वाट लागणार! जंगलात लपलेल्या दहशतवाद्यांना कोब्रा कमांडो शोधून काढणार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2023 16:47 IST

जम्मू काश्मीरमध्ये पहिल्यांदाच कोब्रा कमांडोची तुकडी पाठवण्यात आली आहे

Anantnag Encounter, CoBRA commando Unit Deployed: दक्षिण काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यातील कोकरनागमध्ये गेल्या आठवड्यात सुरू झालेली चकमक आज सहाव्या दिवशीही सुरूच आहे. सुरक्षा दलांकडून मोठ्या प्रमाणावर शोधमोहीम राबविण्यात येत आहे. आज गोळीबार होताना दिसत नसला, तरी सुरक्षा दलाच्या या मोठ्या शोध मोहिमेत एक हजाराहून अधिक सुरक्षा कर्मचारी गुंतले आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काल चकमकीच्या ठिकाणाजवळ एक जळालेला मृतदेह सापडला होता, ज्याचा पोशाख अतिरेक्याचा होता. जंगलात लष्करी कारवायांमध्ये एक्स्पर्ट मानल्या जाणारे कोब्रा कमांडोही दहशतवाद्यांच्या शोधात तैनात करण्यात आले आहेत.

चकमकीत TRF अतिरेकी उझैर अहमदच्या कुटुंबीयांचे डीएनए नमुने घेतले जाण्याची शक्यता आहे, जेणेकरून मृतदेह कोणाचा आहे हे स्पष्ट होईल. अधिकृत सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, काश्मीर खोऱ्यात सध्या 81 सक्रिय अतिरेकी आहेत, ज्यात पाकिस्तानी वंशाचे 48 विदेशी दहशतवादी आणि 33 स्थानिक दहशतवादी आहेत.

कुठे, किती परदेशी दहशतवादी?

दक्षिण काश्मीरमध्ये एकूण 56 सक्रिय अतिरेकी आहेत, त्यापैकी 28 पाकिस्तानी वंशाचे आहेत. दक्षिण काश्मीरमध्ये अनंतनाग, पुलवामा, शोपियान आणि कुलगाम या जिल्ह्यांचा समावेश आहे. हा परिसर दहशतवाद्यांचा गड मानला जातो. उत्तर काश्मीरमध्ये 16 अतिरेकी सक्रिय असून त्यापैकी 13 विदेशी आहेत. उत्तर काश्मीरमध्ये बारामुल्ला, कुपवाडा, बांदीपोरा यांचा समावेश आहे. श्रीनगर, गंदरबल आणि बडगाम जिल्ह्यांचा समावेश असलेल्या मध्य काश्मीरमध्ये एकूण 9 अतिरेकी सक्रिय आहेत, त्यापैकी 7 विदेशी अतिरेकी असल्याचे सांगितले जाते.

पाकिस्तानी हस्तक खूश नाहीत- मनोज सिन्हा

लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा म्हणाले की, सैनिकांच्या सांडलेल्या रक्ताच्या प्रत्येक थेंबाचा हिशोब घेतला जाईल. जम्मू-काश्मीरचे लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा यांनी गेल्या काही वर्षांत काश्मीरमध्ये झालेल्या सर्वात मोठ्या हल्ल्याबद्दल बोलताना प्रत्येक शहीद जवानाच्या रक्ताच्या प्रत्येक थेंबाचा हिशोब घेतला जाईल, असे स्पष्ट शब्दांत सांगितले आहे. मनोज सिन्हा म्हणाले की, पाकिस्तानात बसलेले दहशतवादी हे जम्मू-काश्मीरमधील घडामोडींवर खूश नाहीत. आता त्यांच्या सूचनेनुसार त्यांनी आमच्या शूर सैन्यावर आणि जम्मू-काश्मीरच्या अधिकाऱ्यांवर हल्ला केला आहे. देशाची एकता आणि अखंडतेचे रक्षण करण्यासाठी आपल्या सैनिकांनी सर्वोच्च बलिदान दिले आहे. त्यामुळे आता शत्रूंची खैर नाही, कारण कोब्रा कमांडोज जंगलात लपलेले दहशतवादी शोधतील.

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरTerrorismदहशतवादterroristदहशतवादीIndian Armyभारतीय जवान