शहरं
Join us  
Trending Stories
1
IND W vs PAK W "म्हारी छोरियां छोरो से कम है के.." हरमनप्रीत ब्रिगेडनंही पाकची जिरवली!
2
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
3
मुंबईतील राजकीय नेत्याच्या मुलाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, शौचालयात गाठले आणि...
4
IND vs AUS : बढती मिळताच अय्यरनं टीम इंडियाला जिंकून दिली ट्रॉफी; घरच्या मैदानात कांगारुंची शिकार
5
गाझातील सत्ता सोडण्यास नकार दिल्यास हमासची धुळधाण उडवू, डोनाल्ट ट्रम्प यांची ताकिद 
6
नेपाळमध्ये हाहाकार... मुसळधार पावसाचा कहर! आतापर्यंत 51 जणांचा मृत्यू; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दुःख, म्हणाले - भारत...!
7
Muneeba Ali Controversial Run Out : हुज्जत घालून पाक क्रिकेटच्या इज्जतीचा फालुदा; असं काय घडलं?
8
हिमालयात दार्जिलिंगपासून माऊंट एव्हरेस्टपर्यंत विध्वंस, ६० हून अधिक मृत्यू, कारण काय?
9
IND vs AUS : ३०० पारच्या लढाईत अभिषेक-तिलकनं तलवार केली म्यान; वादळी शतकासह प्रभसिमरन सिंगची हवा
10
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
11
प्रवाशांनी भरलेली विरार ते पालघर रो-रो बोट जेट्टीवर अडकली; हायड्रॉलिक पाईप तुटल्याने मनस्ताप
12
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
13
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
14
Irani Cup 2025: नागपूरच्या मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
15
ऑटो कंपनीची 'कमाल', गुंतवणूकदारांना केलं मालामाल...! 1 वर्षात पैसा डबल; सोमवारी दिसणार चमत्कार?
16
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
17
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
18
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
19
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
20
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार

‘डिजिटल इंडिया’च्या दशकपूर्तीची ऊर्जस्वल कहाणी; डिजिटल इंडिया आता केवळ एक सरकारी कार्यक्रम राहिलेला नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2025 11:12 IST

ही लोकचळवळ आता बनली आहे आत्मनिर्भर भारताच्या निर्मितीचे केंद्र

नरेंद्र मोदी, पंतप्रधान

दहा वर्षांपूर्वी आम्ही एका नव्या क्षेत्रात आत्मविश्वासाने वाटचाल सुरू केली. भारतीय लोक तंत्रज्ञानाचा वापर करतील की नाही, अशी शंका घेतली जाण्याच्या त्या काळात तंत्रज्ञानाचा उपयोग करण्याच्या भारतीयांच्या क्षमतेवर विश्वास ठेवला. तंत्रज्ञानाचा उपयोग गरिबी आणि श्रीमंतीमधला फरक आणखी वाढवेल हा विचार खोटा ठरवून तंत्रज्ञानाच्या मदतीनेच आम्ही ही तफावत कमी केली. हेतू चांगला असतो, तेव्हा नवीन उपक्रम वंचितांचे सक्षमीकरण करता हाच विश्वास ‘डिजिटल इंडिया’चा पाया ठरला. सर्वांसाठी सोप्या, सर्वसमावेशक डिजिटल तंत्रज्ञानाच्या पायाभूत सुविधा निर्माण करणे आणि सर्वांना संधी उपलब्ध करून देणे, यासाठी ‘डिजिटल इंडिया अभियान’ सुरू करण्यात आले.

पहलगाम हल्ल्याबाबत क्वाडच्या बैठकीत झाला मोठा निर्णय, भारताचा अमेरिकेतून पाकिस्तानला धक्का 

२०१४ मध्ये इंटरनेटचा वापर मर्यादित होता, डिजिटल साक्षरता कमी होती आणि ऑनलाइन सरकारी सेवाही मर्यादित होत्या. भारतासारखा विशाल, वैविध्यपूर्ण देश डिजिटल साक्षर बनेल की नाही, अशी बऱ्याच लोकांना शंका होती. आज या प्रश्नाचे उत्तर १४० कोटी भारतीयांनीच दिले आहे. प्रशासन ते शिक्षण, आर्थिक देवघेवीच्या व्यवहारांपासून उत्पादन क्षेत्रापर्यंत प्रत्येक ठिकाणी ‘डिजिटल इंडिया’ आहे.

२०१४ मध्ये सुमारे २५ कोटी इंटरनेट कनेक्शन्स होती. आज ही संख्या वाढून ९७ कोटींपेक्षा जास्त झाली आहे. देशाच्या कानाकोपऱ्यात ४२ लाख किलोमीटरपेक्षा जास्त लांब ऑप्टिकल फायबर केबलचे जाळे विस्तारलेले आहे. भारताच्या ५जी नेटवर्कची व्याप्ती जगात सर्वाधिक वेगाने वाढणाऱ्या व्याप्तींपैकी एक आहे. भारतात केवळ दोन वर्षांत ४.८१ लाख बेस स्टेशन्स स्थापन करण्यात आली आहेत. गतिमान इंटरनेट सेवा आता शहरांपासून गलवान, सियाचीन व लडाखसारख्या सीमेवरच्या सैन्य चौक्यांपर्यंत पोहोचली आहे. यूपीआयद्वारे वर्षाला १०० अब्जांपेक्षा जास्त आर्थिक व्यवहार होतात. जगभरात होणाऱ्या डिजिटल आर्थिक व्यवहारांमधले निम्मे व्यवहार भारतात होतात. थेट लाभ हस्तांतरणाद्वारे (डीबीटी) ४४ लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम थेट नागरिकांना हस्तांतरित करण्यात आल्याने मध्यस्थांची भूमिका संपुष्टात आली असून, ३.४८ लाख कोटी रुपयांची गळती रोखली गेली आहे.

भारताची डिजिटल अर्थव्यवस्था आता एमएसएमई आणि लघु उद्योजकांना सक्षम बनवत आहे. ओएनडीसी (ओपन नेटवर्क फॉर डिजिटल कॉमर्स) हे क्रांतिकारी व्यासपीठ विक्रेते आणि खरेदीदारांच्या मोठ्या बाजारपेठेशी थेट संपर्क स्थापन करून नवीन संधींची खिडकी उघडते. जीईएम (गव्हर्नमेंट ई-मार्केटप्लेस) मुळे सामान्य माणूस सरकारच्या सर्व विभागांना वस्तू आणि सेवा विकू शकतो. यामुळे सामान्य नागरिकांना मोठी बाजारपेठ उपलब्ध होतेच, शिवाय सरकारचे पैसेही वाचतात. ओएनडीसीने अलीकडेच २० कोटी व्यवहारांचा टप्पा ओलांडला आहे. बनारसी विणकरांपासून ते नागालँडमधील बांबू कारागिरांपर्यंतचे विक्रेते मध्यस्थांशिवाय देशभरातील ग्राहकांपर्यंत पोहोचत आहेत.

भारताच्या डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा (डीपीआय) - आधार, कोविन, डिजिलॉकर, फास्टॅग, पीएम-वाणी आणि वन नेशन वन सबस्क्रिप्शन - आता जागतिक स्तरावर स्वीकारल्या जात आहेत. CoWIN मुळे जगातील सर्वात मोठी लसीकरण मोहीम राबवणे शक्य झाले. या माध्यमातून २२० कोटी QR - सत्यापित प्रमाणपत्रे जारी केली गेली. आजमितीला DigiLocker चे ५४ कोटी वापरकर्ते आहेत, या सुविधेअंतर्गत ७७५ कोटींपेक्षा जास्त दस्तऐवज सुरक्षित,  निर्धोकपणे राखले जात आहेत.

डिजिटल इंडिया आता केवळ एक सरकारी कार्यक्रम राहिलेला नाही, तर ती एक लोकचळवळ बनली आहे. ही चळवळ आत्मनिर्भर भारताच्या निर्मितीचे केंद्र बनले आहे. अवघे जग नव्या डिजिटल क्रांतीसाठी भारताकडे डोळे लावून बसले आहे.

युवा वर्गात एआय कौशल्यांमध्ये मोठी प्रगती

भारताच्या स्टार्टअप परिसंस्थेचा समावेश जगातील आघाडीच्या ३ स्टार्टअप परिसंस्थांमध्ये झाला आहे. भारताच्या स्टार्टअप परिसंस्थेअंतर्गत १.८ लाखांपेक्षा जास्त स्टार्टअप अस्तित्वात आहेत. भारतातील युवा वर्गात एआय विषयक कौशल्यांमध्ये मोठी प्रगती होताना दिसत आहे. देशात १.२ अब्ज डॉलर खर्चाच्या तरतुदीसह ‘इंडिया एआय मिशन’ राबवले जात आहे.

भारताने प्रति जीपीयू तासासाठी १ डॉलरपेक्षाही कमी या जागतिक पातळीवरील सर्वात कमी मूल्याने ३४,००० जीपीयूची उपलब्धता सुनिश्चित केली आहे. यामुळे भारत सर्वात स्वस्त इंटरनेट अर्थव्यवस्थेसोबतच, सर्वात परवडणारे कम्प्युटिंग हब बनला आहे. पुढचे दशक आणखी परिवर्तनकारी असेल.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी