शहरं
Join us  
Trending Stories
1
"हमासकडे शेवटचे ३-४ दिवस शिल्लक, जर त्यांनी ऐकलं नाही तर..."; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट धमकी
2
ICC Womens World Cup 2025 : टीम इंडियाची विजयी सलामी! दीप्ती-अमनजोतसह राणाचा अष्टपैलू बाणा
3
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
4
शिर्डीत ५६ भिक्षेकरी पोलिसांच्या ताब्यात; महाराष्ट्रासह ७ राज्यांतील भिक्षेकऱ्यांचा समावेश
5
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
6
ग्राहक न्यायालयाच्या लाचखाेर लिपिकास एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा; ठाण्यातील प्रकरण
7
कापूस खरेदीस ‘पणन’ला परवानगी; लवकरच सीसीआयसोबत करार; आर्थिक मदतीची मागणी
8
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
9
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
10
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
11
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
12
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
13
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
14
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
15
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
16
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
17
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
18
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
19
भरधाव कारचा भीषण अपघातात! अनेक वेळा उलटल्यानं चुराडा, तरुणीही दूर फेकली गेली; बघा VIDEO
20
Omega Seiki: जगातील पहिली ड्रायव्हरलेस रिक्षा भारतात लॉन्च, एका चार्जवर १२० किमी धावणार!

अनर्थ टळला! टेकऑफ घेण्याआधीच विमानात तांत्रिक बिघाड; पायलटच्या सतर्कतेमुळे १७७ प्रवासी सुरक्षित

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2025 14:44 IST

सुरक्षेला प्राधान्य देत पायलटने तात्काळ हे विमान रनवेवरून पुन्हा पार्किंगच्या परिसरात आणले आणि सर्व प्रवाशांना सुरक्षितपणे विमानातून खाली उतरवण्यात आले

चंदीगड - अहमदाबाद विमान दुर्घटनेनंतर अनेकांच्या मनात विमान प्रवासाबद्दल धडकी भरली आहे. अलीकडेच चंदीगडच्या शहीद भगत सिंग आंतरराष्ट्रीय विमानतळावर मोठी दुर्घटना टळली. याठिकाणी लखनौला जाणाऱ्या इंडिगोच्या विमानात टेकऑफ होण्याआधीच तांत्रिक बिघाड लक्षात आला. पायलटच्या सतर्कतेमुळे विमान उड्डाण वेळीच रोखले आणि विमानातील १७७ प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले. बोर्डिंगनंतर विमानाचे उड्डाण रद्द केल्याने प्रवाशांमध्ये मोठी नाराजी पसरल्याचे दिसून आले. 

जवळपास १ तास विमान उड्डाण खोळंबले तरीही प्रवाशांना योग्य ती माहिती दिली नाही. ही फ्लाईट सकाळी 7.10 मिनिटांनी रवाना होणार होती. सर्व प्रवासी बोर्डिंग करून विमानात बसले होते. विमान हळूहळू पार्किंग एरियातून रनवेच्या दिशेने जात होते तेव्हा पायलटला विमानातील तांत्रिक बिघाड लक्षात आला. सुरक्षेला प्राधान्य देत पायलटने तात्काळ हे विमान रनवेवरून पुन्हा पार्किंगच्या परिसरात आणले आणि सर्व प्रवाशांना सुरक्षितपणे विमानातून खाली उतरवण्यात आले. त्यानंतर फ्लाईट अचानक रद्द करण्यात आली. प्रवाशांनाही १ तास कुठलीही माहिती न दिल्याने विमानतळावरच गोंधळ उडाला. 

या प्रकारामुळे लहान मुले, वृद्ध प्रवासी, महिला त्रस्त असल्याचे दिसून आले. काही प्रवासी जमिनीवर बसूनच पुढच्या सूचनेची वाट पाहत होते. एका प्रवाशाने सोशल मीडियावर त्याची व्यथा मांडत पंतप्रधान कार्यालयाकडे मदतीची मागणी केली. बोर्डिंग झाल्यानंतर विमानाचे उड्डाण रद्द होणे हे केवळ गैरसोयीचेच नाही तर मानसिक ताण देखील वाढवते. बोर्डिंगनंतर उड्डाण रद्द केले परंतु कुठल्याही वरिष्ठ अधिकाऱ्याने समोर येऊन वस्तूस्थितीची माहिती दिली नाही. १ तासाहून अधिक वेळ झाला तरीही कुणी काही सांगण्यास तयार नाही असं प्रवाशाने सांगितले. 

दरम्यान, फ्लाईट रद्द झाल्यानंतर इंडिगोने प्रवाशांना अन्य विमान सेवेचा पर्याय दिला. ज्या प्रवाशांना पुन्हा प्रवास करायचा नाही त्यांना पूर्ण रिफंड देण्याचाही पर्याय दिला. काही प्रवाशांना दिल्लीतून लखनौला जाणारी कनेक्टिंग फ्लाईटची सुविधा दिली. काही प्रवाशांच्या राहण्याची व्यवस्था करण्यात आली. दुसरीकडे लखनौ येथील चौधरी शरण सिंह एअरपोर्टहून दिल्लीला येणाऱ्या जाणाऱ्या २५ फ्लाईट एअर इंडियाने रद्द केल्या. २१ जून ते १५ जुलैपर्यंत या फ्लाईट रद्द आहेत. 

टॅग्स :IndigoइंडिगोAir Indiaएअर इंडियाPlane Crashविमान दुर्घटना