शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

हृदयद्रावक! "मी तुझ्या पतीला देवाकड पाठवलं", भारतीय जवानाची हत्या करून आरोपीचा पत्नीला मेसेज

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2023 21:53 IST

हरयाणातील अंबाला येथे भारतीय जवानाची हत्या झाल्याची धक्कादायक घटना घडली.

कानपूर : हरयाणातील अंबाला येथे भारतीय जवानाची हत्या झाल्याची धक्कादायक घटना घडली. पवन या जवानाच्या हत्येनंतर जवानाचे पार्थिव उत्तर प्रदेशातील कानपूर येथे त्याच्या मूळ गावी आणण्यात आले. कानपूर जिल्ह्यातील कैलाई या मूळ गावी शनिवारी पार्थिव दाखल झाले. जवानाच्या अंतिम दर्शनासाठी संपूर्ण गाव जमले होते. आपल्या एकुलत्या एक मुलाच्या मृत्यूने वडिलांनी एकच टाहो फोडला. पतीच्या पार्थिवासोबत सासरच्या घरी पोहचलेली पत्नी रागिणी कुटुंबीयांना भेटताच बेशुद्ध पडली. माझ्या पतीच्या मारेकऱ्यांना फाशी द्या, असे ती सातत्याने म्हणत होती. 

दरम्यान, कुमाऊ रेजिमेंटचे जवान कानपूर कॅन्ट येथून जवानाला अखेरची सलामी देण्यासाठी दाखल झाले. अंत्यसंस्कार करण्याऐवजी समाधी बांधण्यासाठी जमिनीची मागणी ग्रामस्थांनी केली. प्रशासनाने ज्या ठिकाणी अंत्यसंस्कार करण्याची तयारी केली होती, त्या ठिकाणी अंत्यसंस्कार करण्यास ग्रामस्थांनी नकार दिला आहे. मग अधिकाऱ्यांच्या मध्यस्थीनंतर विषय मार्गी लागला. 

एका मेसेजने खळबळ उत्तर प्रदेशातील कानपूर येथील रहिवासी असलेले जवान पवन यांचा मृतदेह अंबाला येथे रेल्वे रुळावर आढळून आला. त्यांची हत्या झाली असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. यामागचे कारण म्हणजे त्यांच्या पत्नीला व्हॉट्सपवर आलेला मेसेज. "मी तुझ्या पतीला देवाकडे पाठवले आहे, पाकिस्तान जिंदाबाद", अशा आशयाचा मेसेज जवानाच्या पत्नीला अज्ञाताने केला. 

भारतीय जवानाची हत्याखरं तर अंबाला येथे सैन्याच्या ४० एडी एसआर युनिटमध्ये ३ वर्षांपासून तैनात असलेले जवान पवन त्याची पत्नी आणि दोन मुलींसोबत राहत होते. कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी संध्याकाळी पवन शंकर मंदिरात जात असल्याचे सांगून घरातून निघाले. यानंतर ते परतलेच नाहीत. रात्री उशिरापर्यंत पत्नीने त्यांच्याशी फोनवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र फोन बंद असल्याचे आढळले. अखेर पवन यांच्या मोबाईलवरूनच व्हॉट्सपवर मेसेज आल्याने एकच खळबळ माजली. पोलिसांनी याप्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशHaryanaहरयाणाIndian Armyभारतीय जवानDeathमृत्यू