शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
2
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
3
"राहुल गांधींचे सर्व आरोप खोटे आणि निराधार" निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर!
4
पत्रकाराचा फोन, बूथ मंत्र अन् ८० टक्के टार्गेट...; निवडणुकीसाठी अमित शाहांनी आखला 'प्लॅन'
5
पुढचे २४ तास फ्रान्स सगळंच बंद! रस्त्यांवर उतरणार तब्बल ८ लाख लोक; काय आहे कारण?
6
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
7
१० रुपयांची बाटली... तीन भावांनी मिळून केली कमाल, आता त्यांच्या प्रोडक्टची गल्ली-गल्लीत आहे चर्चा
8
संरक्षण करारानुसार पाकिस्तानला युद्धात साथ देण्याचा शब्द देणाऱ्या सौदी अरेबियाची ताकद किती?
9
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
10
‘राहुल गांधींचा ‘वोटचोरी’बाबतचा कांगावा म्हणजे…’, ते पत्र दाखवत भाजपाचा पलटवार 
11
सोन्यातील तेजी शेअर बाजारासाठी धोक्याची घंटा? काय आहे 'निक्सन शॉक' घटना? ब्रोकरेज फर्मने सांगितलं सत्य
12
निवडणूक आयोगाने 'आधारहीन' म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, 'त्या' मतदारसंघात काय घडलं होतं तेही सांगितले
13
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
14
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
15
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
16
भलामोठा डिस्प्ले, उत्कृष्ट कॅमेरा, दमदार बॅटरी; 'हे' ६ फोन ६००० पेक्षा कमी किंमतीत उपलब्ध
17
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
18
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
19
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
20
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी

Amritsar Train Tragedy: मोटरमनचं 'ते' पाऊल अधिक जीवघेणं ठरलं असतं!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2018 12:33 IST

Amritsar Train Tragedy: ट्रॅकवर बरीच माणसं बसल्याचं मोटरमनला दिसलं, तेव्हा ट्रेनचा वेग ताशी 90 किलोमीटर होता.

अमृतसर येथे रावणदहनाच्या कार्यक्रमादरम्यान झालेल्या भीषण अपघाताला रेल्वे प्रशासनच जबाबदार आहे, ट्रेनच्या मोटरमनने प्रसंगावधान दाखवलं असतं तर अनेकांचे प्राण वाचू शकले असते, असा आरोप काही मंडळी जोरजोरात करताहेत. पोलिसांनी या मोटरमनला चौकशीसाठी ताब्यातही घेतलंय. परंतु, त्यानं जे केलं ते योग्यच होतं, असा दावा रेल्वे बोर्डाने केला आहे. 

ट्रॅकवर बरीच माणसं बसल्याचं मोटरमनला दिसलं, तेव्हा ट्रेनचा वेग ताशी 90 किलोमीटर होता. मोटरमनने पूर्ण कसब पणाला लावून तो ताशी 65 किलोमीटर केला. या वेगातील ट्रेन थांबण्यासाठी किमान 625 मीटर अंतर गरजेचं आहे. त्यामुळे वेग कमी करूनही दुर्घटना टाळता आली नाही, अशी माहिती रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष अश्वनी लोहानी यांनी दिली. मोटरमनने इमर्जन्सी ब्रेक का लावला नाही, असा प्रश्न बरेच जण करताहेत. परंतु, हा प्रयत्न अधिक जीवघेणा ठरला असता. ताशी 90 किमी वेगाने ट्रेन धावत असताना इमर्जन्सी ब्रेक लावला असता तर ट्रेनचे डबे ट्रॅकवरून घसरले असते आणि परिस्थिती हाताबाहेर गेली असती, याकडे लोहानी यांनी लक्ष वेधलं. 

मोटरमनने हॉर्न वाजवला असेल, तरी तो फटाके आणि ध्वनिक्षेपकांमुळे ट्रॅकवर बसलेल्या लोकांना ऐकू गेला नसावा. तसंच, लेव्हल क्रॉसिंगही घटनास्थळापासून दूर असल्यानं अधिकारीही काही करू शकत नव्हते, असं लोहानी यांनी स्पष्ट केलं. या कार्यक्रमाची पूर्वसूचना रेल्वेला देण्यात आली नव्हती. त्यामुळे या अपघातासाठी रेल्वेला जबाबदार धरणं चुकीचं असल्याचं प्रशासनानं म्हटलं आहे.   

अमृतसरजवळील जौडा रेल्वेफाटक परिसरातील चौरा बाझार येथे शुक्रवारी रात्री रावण दहनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होते. त्या कार्यक्रमासाठी हजारो जण उपस्थित होते. रावण दहन झाले  उपस्थितांपैकी अनेक जण ट्रॅकवर उभे होते. त्याचवेळी भरधाव वेगात आलेल्या ट्रेननं अनेकांचा उडवलं. अपघातानंतर घटनास्थळावर मृतदेहांचा खच पडला होता. या दुर्घटनेत आत्तापर्यंत 60 जणांचा मृत्यू झाला असून 50 हून अधिक जण जखमी आहेत. या अपघाताच्या चौकशीचे आदेश रेल्वे प्रशासनानं दिलेत.

अमृतसरमधील या भीषण दुर्घटनेबद्दल रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनीही दुःख व्यक्त केलं आहे. 

 

पाहा, कसा घडला अपघात...

टॅग्स :Amritsar Train Accidentअमृतसर ट्रेन दुर्घटनाrailwayरेल्वे