शहरं
Join us  
Trending Stories
1
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
2
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
3
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
4
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
5
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
6
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
7
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
8
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
9
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
10
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
11
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
12
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
13
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
14
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
15
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
16
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
17
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल
18
रस्ते गिळलेली अतिक्रमणे होणार नियमित; महसूल विभागाचा मोठा निर्णय
19
मिठी नदीच्या सफाई कामात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीचे आठ ठिकाणी छापे 
20
सहाव्या वर्षी वडिलांना एक चाल सांगितली अन्...; कोनेरू हम्पीची खास आठवण

Amritsar Train Tragedy: मोटरमनचं 'ते' पाऊल अधिक जीवघेणं ठरलं असतं!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2018 12:33 IST

Amritsar Train Tragedy: ट्रॅकवर बरीच माणसं बसल्याचं मोटरमनला दिसलं, तेव्हा ट्रेनचा वेग ताशी 90 किलोमीटर होता.

अमृतसर येथे रावणदहनाच्या कार्यक्रमादरम्यान झालेल्या भीषण अपघाताला रेल्वे प्रशासनच जबाबदार आहे, ट्रेनच्या मोटरमनने प्रसंगावधान दाखवलं असतं तर अनेकांचे प्राण वाचू शकले असते, असा आरोप काही मंडळी जोरजोरात करताहेत. पोलिसांनी या मोटरमनला चौकशीसाठी ताब्यातही घेतलंय. परंतु, त्यानं जे केलं ते योग्यच होतं, असा दावा रेल्वे बोर्डाने केला आहे. 

ट्रॅकवर बरीच माणसं बसल्याचं मोटरमनला दिसलं, तेव्हा ट्रेनचा वेग ताशी 90 किलोमीटर होता. मोटरमनने पूर्ण कसब पणाला लावून तो ताशी 65 किलोमीटर केला. या वेगातील ट्रेन थांबण्यासाठी किमान 625 मीटर अंतर गरजेचं आहे. त्यामुळे वेग कमी करूनही दुर्घटना टाळता आली नाही, अशी माहिती रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष अश्वनी लोहानी यांनी दिली. मोटरमनने इमर्जन्सी ब्रेक का लावला नाही, असा प्रश्न बरेच जण करताहेत. परंतु, हा प्रयत्न अधिक जीवघेणा ठरला असता. ताशी 90 किमी वेगाने ट्रेन धावत असताना इमर्जन्सी ब्रेक लावला असता तर ट्रेनचे डबे ट्रॅकवरून घसरले असते आणि परिस्थिती हाताबाहेर गेली असती, याकडे लोहानी यांनी लक्ष वेधलं. 

मोटरमनने हॉर्न वाजवला असेल, तरी तो फटाके आणि ध्वनिक्षेपकांमुळे ट्रॅकवर बसलेल्या लोकांना ऐकू गेला नसावा. तसंच, लेव्हल क्रॉसिंगही घटनास्थळापासून दूर असल्यानं अधिकारीही काही करू शकत नव्हते, असं लोहानी यांनी स्पष्ट केलं. या कार्यक्रमाची पूर्वसूचना रेल्वेला देण्यात आली नव्हती. त्यामुळे या अपघातासाठी रेल्वेला जबाबदार धरणं चुकीचं असल्याचं प्रशासनानं म्हटलं आहे.   

अमृतसरजवळील जौडा रेल्वेफाटक परिसरातील चौरा बाझार येथे शुक्रवारी रात्री रावण दहनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होते. त्या कार्यक्रमासाठी हजारो जण उपस्थित होते. रावण दहन झाले  उपस्थितांपैकी अनेक जण ट्रॅकवर उभे होते. त्याचवेळी भरधाव वेगात आलेल्या ट्रेननं अनेकांचा उडवलं. अपघातानंतर घटनास्थळावर मृतदेहांचा खच पडला होता. या दुर्घटनेत आत्तापर्यंत 60 जणांचा मृत्यू झाला असून 50 हून अधिक जण जखमी आहेत. या अपघाताच्या चौकशीचे आदेश रेल्वे प्रशासनानं दिलेत.

अमृतसरमधील या भीषण दुर्घटनेबद्दल रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनीही दुःख व्यक्त केलं आहे. 

 

पाहा, कसा घडला अपघात...

टॅग्स :Amritsar Train Accidentअमृतसर ट्रेन दुर्घटनाrailwayरेल्वे