शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

अमृतपाल सिंग करणार सरेंडर? दमदमा साहिबमध्ये आज 'विशेष सभा', गुप्तचर यंत्रणा अलर्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2023 09:40 IST

या सभेबाबत गुप्तचर यंत्रणांसोबतच पंजाब पोलिसांचे इंटेलिजन्स विंग अलर्ट मोडवर आहे.

चंडीगड : फरारी खलिस्तान समर्थक आणि 'वारीस पंजाब दे' संघटनेचा प्रमुख अमृतपाल सिंग याच्या आत्मसमर्पणाची चर्चा जोरात सुरू आहे. अकाल तख्तचे जत्थेदार हरप्रीत सिंह यांनी आज तलवंडी साबो येथील दमदमा साहिब येथे 'विशेष सभा' आयोजित केली आहे. या सभेत धर्माचा प्रचार आणि राष्ट्रीय हक्कांचे संरक्षण, विचारांचे स्वातंत्र्य, आव्हाने आणि शीख माध्यमांचे योगदान यावरही चर्चा होणार आहे. तसेच, या सभेत पंथ, पंजाब आणि पंजाबियतला समर्पित देश-विदेशातील जत्थेदार, लानेदार, निहंग विचारवंत आणि शीख विचारवंत सहभागी होणार आहेत.

या सभेबाबत गुप्तचर यंत्रणांसोबतच पंजाब पोलिसांचे इंटेलिजन्स विंग अलर्ट मोडवर आहे. सुत्रांच्या म्हणण्यानुसार, अमृतपाल सिंग आत्मसमर्पण करण्यासाठी किंवा या विशेष सभेसाठी उपस्थित राहू शकतो, यासाठी पोलिसांच्या सीआयडी शाखेचे अधिकारी साध्या गणवेशात सतर्क आहेत. दमदमा साहिबच्या 'विशेष सभेत' अमृतपाल सिंग आत्मसमर्पण करेल, अशी पोलिसांना शक्यता वाटते. यासंदर्भात पंजाब पोलिसांच्या इंटेलिजन्स विंग आणि इतर ऑपरेशन टीम्समध्ये बैठक झाली आहे.

दरम्यान, पंजाब डीजीपीच्या कार्यालयाने राज्यातील पोलिस कार्यालयांच्या प्रमुखांना पाठवलेल्या तातडीच्या संदेशात 14 एप्रिल 2023 पर्यंत सर्व राजपत्रित, अराजपत्रित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द करण्यास सांगण्यात आले आहे. यासोबतच 14 एप्रिलपर्यंत कोणत्याही प्रकारची नवीन सुट्टी मंजूर करू नये, असे पोलीस कार्यालय प्रमुखांना सांगण्यात आले आहे. विशेष म्हणजे, खलिस्तानी फरार अमृतपाल सिंग याने जत्थेदारांकडे व्हिडिओ संदेशाद्वारे 'सरबत खालसा' बोलावण्याची मागणी केली होती. मात्र तसे न करता आता अकाल तख्तने 'बैसाखी समागम' जाहीर केला आहे. त्यामुळे कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आणि कोणत्याही अनुचित परिस्थितीला तोंड देण्यासाठी तळवंडी साबो येथे तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. 

18 मार्चच्या पोलिस कारवाईनंतर अमृतपाल सिंग फरार आहे. पोलीस अधिकाऱ्यांना त्याने कोणत्याही डेरा किंवा धार्मिक स्थळी आश्रय घ्यावा असे वाटत नाही, कारण या ठिकाणी कारवाई केल्यास त्याचे अप्रिय परिणाम होऊ शकतात. मात्र, अधिकाऱ्यांनी सांगितले की, अकाल तख्तचे जत्थेदार अमृतपाल सिंग याला दमदमा साहिब येथे आश्रय घेण्यासाठी 'विशेष मेळाव्या'चा वापर करू देणार नाहीत, अशी आशा पोलिसांना आहे. 

टॅग्स :PunjabपंजाबPoliceपोलिस