शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

अमृतपाल सिंग करणार सरेंडर? दमदमा साहिबमध्ये आज 'विशेष सभा', गुप्तचर यंत्रणा अलर्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2023 09:40 IST

या सभेबाबत गुप्तचर यंत्रणांसोबतच पंजाब पोलिसांचे इंटेलिजन्स विंग अलर्ट मोडवर आहे.

चंडीगड : फरारी खलिस्तान समर्थक आणि 'वारीस पंजाब दे' संघटनेचा प्रमुख अमृतपाल सिंग याच्या आत्मसमर्पणाची चर्चा जोरात सुरू आहे. अकाल तख्तचे जत्थेदार हरप्रीत सिंह यांनी आज तलवंडी साबो येथील दमदमा साहिब येथे 'विशेष सभा' आयोजित केली आहे. या सभेत धर्माचा प्रचार आणि राष्ट्रीय हक्कांचे संरक्षण, विचारांचे स्वातंत्र्य, आव्हाने आणि शीख माध्यमांचे योगदान यावरही चर्चा होणार आहे. तसेच, या सभेत पंथ, पंजाब आणि पंजाबियतला समर्पित देश-विदेशातील जत्थेदार, लानेदार, निहंग विचारवंत आणि शीख विचारवंत सहभागी होणार आहेत.

या सभेबाबत गुप्तचर यंत्रणांसोबतच पंजाब पोलिसांचे इंटेलिजन्स विंग अलर्ट मोडवर आहे. सुत्रांच्या म्हणण्यानुसार, अमृतपाल सिंग आत्मसमर्पण करण्यासाठी किंवा या विशेष सभेसाठी उपस्थित राहू शकतो, यासाठी पोलिसांच्या सीआयडी शाखेचे अधिकारी साध्या गणवेशात सतर्क आहेत. दमदमा साहिबच्या 'विशेष सभेत' अमृतपाल सिंग आत्मसमर्पण करेल, अशी पोलिसांना शक्यता वाटते. यासंदर्भात पंजाब पोलिसांच्या इंटेलिजन्स विंग आणि इतर ऑपरेशन टीम्समध्ये बैठक झाली आहे.

दरम्यान, पंजाब डीजीपीच्या कार्यालयाने राज्यातील पोलिस कार्यालयांच्या प्रमुखांना पाठवलेल्या तातडीच्या संदेशात 14 एप्रिल 2023 पर्यंत सर्व राजपत्रित, अराजपत्रित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द करण्यास सांगण्यात आले आहे. यासोबतच 14 एप्रिलपर्यंत कोणत्याही प्रकारची नवीन सुट्टी मंजूर करू नये, असे पोलीस कार्यालय प्रमुखांना सांगण्यात आले आहे. विशेष म्हणजे, खलिस्तानी फरार अमृतपाल सिंग याने जत्थेदारांकडे व्हिडिओ संदेशाद्वारे 'सरबत खालसा' बोलावण्याची मागणी केली होती. मात्र तसे न करता आता अकाल तख्तने 'बैसाखी समागम' जाहीर केला आहे. त्यामुळे कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आणि कोणत्याही अनुचित परिस्थितीला तोंड देण्यासाठी तळवंडी साबो येथे तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. 

18 मार्चच्या पोलिस कारवाईनंतर अमृतपाल सिंग फरार आहे. पोलीस अधिकाऱ्यांना त्याने कोणत्याही डेरा किंवा धार्मिक स्थळी आश्रय घ्यावा असे वाटत नाही, कारण या ठिकाणी कारवाई केल्यास त्याचे अप्रिय परिणाम होऊ शकतात. मात्र, अधिकाऱ्यांनी सांगितले की, अकाल तख्तचे जत्थेदार अमृतपाल सिंग याला दमदमा साहिब येथे आश्रय घेण्यासाठी 'विशेष मेळाव्या'चा वापर करू देणार नाहीत, अशी आशा पोलिसांना आहे. 

टॅग्स :PunjabपंजाबPoliceपोलिस