शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
2
पंतप्रधान मोदींनी ओमानमध्ये कानातले घातले? व्हायरल व्हिडिओमागचे सत्य आले समोर; जाणून घ्या नेमका प्रकार काय!
3
भारताच्या 'शांती' कायद्यामुळे पाकिस्तान टेन्शनमध्ये! म्हणाला, 'आम्ही जवळून नजर ठेवणार, कारण...'
4
बांगलादेश विसरा, चीन अन् पाकिस्तान एकत्र येऊनही भारताच्या 'चिकन नेक'ला धक्का लावू शकत नाहीत
5
एअरटेलच्या नेतृत्वात मोठे फेरबदल; शाश्वत शर्मा असणार नवीन सीईओ, का घेतला अचानक निर्णय?
6
Video - संतापजनक! दह्याच्या प्लेटमध्ये मेलेला उंदीर; प्रसिद्ध ढाब्यावरील किळसवाणा प्रकार
7
काश्मीरमधील जलविद्युत प्रकल्पातील २९ कर्मचाऱ्यांचे दहशतवाद्यांशी संबंध, धक्कादायक माहिती समोर  
8
Video - "आई, माझ्यावर दया करा"; बायकोला घरी पाठवण्यासाठी सासूच्या पाया पडला जावई
9
मुंबईत शिंदेसेनेला ८४ जागा सोडण्यासही भाजपाचा स्पष्ट नकार; दोन्ही पक्षाकडून स्वबळाची तयारी?
10
ओलाचा शेअर रॉकेट बनला, झटक्यात 10% नं भाव वाढला; मालकानं घेतला मोठा निर्णय
11
बँका सेवांवरील शुल्क वाढवणार, अनेक सुविधा बंद करण्याच्या तयारीत; ग्राहकांसाठी निराशाजनक बातमी
12
२०२६ संपूर्ण वर्ष लाभ, ४ राशींचा भाग्योदय; ४ ग्रह गोचराने इच्छापूर्ती, मनात आणाल ते मिळेल!
13
"मला पॅनिक अटॅक यायचे", आईवडिलांच्या घटस्फोटावर पहिल्यांदाच बोलली गिरिजा ओक, म्हणाली- "त्यांच्या नात्यात..."
14
नवीन वर्ष २०२६: सुख-समृद्धीसाठी ९ प्रभावशाली उपाय, जे बदलून टाकतील तुमचे संपूर्ण आयुष्य!
15
१९७१ नंतरचं सर्वात मोठं संकट, बांगलादेशमधील अस्थिरतेमुळं भारतासमोर ५ मोठी आव्हाने
16
Osman Hadi : कोण आहे हा उस्मान हादी? ज्याच्या मृत्यूने पुन्हा पेटला बांगलादेश; डोक्याला लागली होती गोळी
17
'म्हाडाची जमीन हडपल्याप्रकरणी मंगेश कुडाळकरांवर गुन्हा दाखल करा'; विशेष न्यायालयाचे भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाला निर्देश
18
घराणेशाहीचा वाद! "BMC Election is not a Family Business" भाजपा सचिवाचं अमित साटम यांना पत्र
19
भारतीय जर्सी घालून पाकिस्तानी खेळाडू भारताकडून खेळला; आता पाक फेडरेशन कारवाई करणार
20
किंगफिशर एअरलाइन्सच्या माजी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ईडीने ३१२ कोटी रुपये केले परत
Daily Top 2Weekly Top 5

'मी ओरडल्यासारखं करतो, तुम्ही...'; अमित शाहांची नाराजी फक्त रणनीतीचा भाग

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2020 12:07 IST

भाजपच्या नेत्यांनी केलेल्या बेजबाबदार वक्तव्यांबद्दल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी व्यक्त केलेली नाराजी ही काही पक्षाचे हृदयपरिवर्तन झाल्याचे संकेत नाहीत, तर केवळ डावपेच म्हणून घेतलेली भूमिका आहे.

ठळक मुद्देअमित शहा यांनी व्यक्त केलेली नाराजी ही काही पक्षाचे हृदयपरिवर्तन झाल्याचे संकेत नाहीत, तर केवळ डावपेच म्हणून घेतलेली भूमिका आहे.बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी दिल्ली विधानसभा निवडणुकीत दोन जागांवर भाजपशी युती केलीअमित शहा यांना हे ठावूक आहे की, जनता दलासोबत (संयुक्त) भाजपाला राहायचे असेल तर हिंदुत्वाचा कार्यक्रम काही कामास येणार नाही.

हरीश गुप्ता नवी दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणुकीत मानहानीकारक पराभव झाल्यानंतर प्रचारात भाजपच्या नेत्यांनी केलेल्या बेजबाबदार वक्तव्यांबद्दल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी व्यक्त केलेली नाराजी ही काही पक्षाचे हृदयपरिवर्तन झाल्याचे संकेत नाहीत, तर केवळ डावपेच म्हणून घेतलेली भूमिका आहे. बिहारमध्ये लगेच जी तातडीची गरज आहे.बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी दिल्ली विधानसभा निवडणुकीत दोन जागांवर भाजपशी युती केली व त्यांनी अमित शहा यांच्यासोबत प्रचारही केला. तरी भाजपच्या नेत्यांनी कडव्या हिंदुत्वाचा केलेला प्रचार हा त्यांना रुचलेला नाही. नितीश कुमार यांना ‘सुशासन बाबू’ असे बिहारमध्ये समजले जाते. कुमार यांची कामगिरी आणि अल्पसंख्य काही प्रमाणात का असेना आपल्या बाजूला त्यांनी ठेवल्यामुळे लालू प्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलाला त्यांच्यात पराभूत करण्याची क्षमता आहे. अमित शहा यांना हे ठावूक आहे की, जनता दलासोबत (संयुक्त) भाजपाला राहायचे असेल तर हिंदुत्वाचा कार्यक्रम काही कामास येणार नाही. दुसरे म्हणजे लोक जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष चिराग पासवान यांनी बिहारमध्ये द्वेषाच्या कोणत्याही भाषणांना मुभा नाही, असा स्पष्ट इशारा आधीच दिला आहे. या पार्श्वभूमीवर अमित शहा यांनी शांततेचा राग आळवला. परंतु शहा यांनी घेतलेली भूमिका ही तात्पुरती असून, बिहारमधील निवडणूक संपल्यानंतर एप्रिल २०२१ मध्ये पश्चिम बंगाल, आसाम, केरळ, तमिळनाडू आणि पुड्डुचेरीत होणाऱ्या निवडणुकीत भाजप आपल्या जुन्या कार्यक्रमासह सक्रिय होईल.>भाजपच्या भूमिकेमागचे राजकारण काय?येत्या सहा महिन्यांत बिहारमध्ये विधानसभेच्या निवडणुका घेतल्या जाणार आहेत. तेथे भाजप जनता दलाचा (संयुक्त) कनिष्ठ भागीदार.या सगळ्यात कडी म्हणजे भाजपने स्वत:चा द्वेष पसरवणारा कार्यक्रम बिहारमध्ये सुरूच ठेवला तर लोक जनशक्ती पक्षाचे नेते राम विलास पासवान यांनीही आम्ही भाजपसोबत असणार नाही, असे म्हटले. त्यामुळे विद्यमान खासदार आणि मोदी सरकारमधील मंत्र्यांनी ‘गोली मारो आणि भारत-पाकिस्तान मॅच’ आदी केलेल्या वक्तव्यांचा अमित शहा यांनी निषेध करून वातावरण शांत करण्याचा प्रयत्न केला.पराभवानंतर तीन दिवसांनी जाहीरपणे अमित शहा यांनी त्या वक्तव्यांचा निषेध केला त्याचे कारण म्हणजे बिहारमधील मित्रपक्षांनी वाजवलेली धोक्याची घंटा, असे भाजपमधील अंतर्गत सूत्रांनी सांगितले. बिहारमध्ये आपण जनता दलाचे (संयुक्त) कनिष्ठ सहकारी असून जनता दल किंवा लोक जनशक्ती पक्ष या विषयावर काही तडजोड करणार नाही याची भाजपला जाणीव आहे.

टॅग्स :Amit Shahअमित शहा