शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
2
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
3
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
4
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
5
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
6
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
7
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
8
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
9
Shalarth ID Scam : 'ते' ६३२ शिक्षक, मुख्याध्यापक तुरुंगात जाणार? शिक्षण क्षेत्रातील सर्वात माेठा घोटाळ्याची झाडाझडती सुरु
10
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
11
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
12
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
13
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
14
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?
15
'तो जिच्यासोबत आहे तिला मी चांगलं ओळखतो', आरजे महावशबद्दल अरबाज अन् धनश्रीचं संभाषण
16
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
17
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
18
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
19
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
20
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा

'मी ओरडल्यासारखं करतो, तुम्ही...'; अमित शाहांची नाराजी फक्त रणनीतीचा भाग

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2020 12:07 IST

भाजपच्या नेत्यांनी केलेल्या बेजबाबदार वक्तव्यांबद्दल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी व्यक्त केलेली नाराजी ही काही पक्षाचे हृदयपरिवर्तन झाल्याचे संकेत नाहीत, तर केवळ डावपेच म्हणून घेतलेली भूमिका आहे.

ठळक मुद्देअमित शहा यांनी व्यक्त केलेली नाराजी ही काही पक्षाचे हृदयपरिवर्तन झाल्याचे संकेत नाहीत, तर केवळ डावपेच म्हणून घेतलेली भूमिका आहे.बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी दिल्ली विधानसभा निवडणुकीत दोन जागांवर भाजपशी युती केलीअमित शहा यांना हे ठावूक आहे की, जनता दलासोबत (संयुक्त) भाजपाला राहायचे असेल तर हिंदुत्वाचा कार्यक्रम काही कामास येणार नाही.

हरीश गुप्ता नवी दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणुकीत मानहानीकारक पराभव झाल्यानंतर प्रचारात भाजपच्या नेत्यांनी केलेल्या बेजबाबदार वक्तव्यांबद्दल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी व्यक्त केलेली नाराजी ही काही पक्षाचे हृदयपरिवर्तन झाल्याचे संकेत नाहीत, तर केवळ डावपेच म्हणून घेतलेली भूमिका आहे. बिहारमध्ये लगेच जी तातडीची गरज आहे.बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी दिल्ली विधानसभा निवडणुकीत दोन जागांवर भाजपशी युती केली व त्यांनी अमित शहा यांच्यासोबत प्रचारही केला. तरी भाजपच्या नेत्यांनी कडव्या हिंदुत्वाचा केलेला प्रचार हा त्यांना रुचलेला नाही. नितीश कुमार यांना ‘सुशासन बाबू’ असे बिहारमध्ये समजले जाते. कुमार यांची कामगिरी आणि अल्पसंख्य काही प्रमाणात का असेना आपल्या बाजूला त्यांनी ठेवल्यामुळे लालू प्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलाला त्यांच्यात पराभूत करण्याची क्षमता आहे. अमित शहा यांना हे ठावूक आहे की, जनता दलासोबत (संयुक्त) भाजपाला राहायचे असेल तर हिंदुत्वाचा कार्यक्रम काही कामास येणार नाही. दुसरे म्हणजे लोक जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष चिराग पासवान यांनी बिहारमध्ये द्वेषाच्या कोणत्याही भाषणांना मुभा नाही, असा स्पष्ट इशारा आधीच दिला आहे. या पार्श्वभूमीवर अमित शहा यांनी शांततेचा राग आळवला. परंतु शहा यांनी घेतलेली भूमिका ही तात्पुरती असून, बिहारमधील निवडणूक संपल्यानंतर एप्रिल २०२१ मध्ये पश्चिम बंगाल, आसाम, केरळ, तमिळनाडू आणि पुड्डुचेरीत होणाऱ्या निवडणुकीत भाजप आपल्या जुन्या कार्यक्रमासह सक्रिय होईल.>भाजपच्या भूमिकेमागचे राजकारण काय?येत्या सहा महिन्यांत बिहारमध्ये विधानसभेच्या निवडणुका घेतल्या जाणार आहेत. तेथे भाजप जनता दलाचा (संयुक्त) कनिष्ठ भागीदार.या सगळ्यात कडी म्हणजे भाजपने स्वत:चा द्वेष पसरवणारा कार्यक्रम बिहारमध्ये सुरूच ठेवला तर लोक जनशक्ती पक्षाचे नेते राम विलास पासवान यांनीही आम्ही भाजपसोबत असणार नाही, असे म्हटले. त्यामुळे विद्यमान खासदार आणि मोदी सरकारमधील मंत्र्यांनी ‘गोली मारो आणि भारत-पाकिस्तान मॅच’ आदी केलेल्या वक्तव्यांचा अमित शहा यांनी निषेध करून वातावरण शांत करण्याचा प्रयत्न केला.पराभवानंतर तीन दिवसांनी जाहीरपणे अमित शहा यांनी त्या वक्तव्यांचा निषेध केला त्याचे कारण म्हणजे बिहारमधील मित्रपक्षांनी वाजवलेली धोक्याची घंटा, असे भाजपमधील अंतर्गत सूत्रांनी सांगितले. बिहारमध्ये आपण जनता दलाचे (संयुक्त) कनिष्ठ सहकारी असून जनता दल किंवा लोक जनशक्ती पक्ष या विषयावर काही तडजोड करणार नाही याची भाजपला जाणीव आहे.

टॅग्स :Amit Shahअमित शहा