शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
थायलंड-कंबोडिया सीमेवरील विष्णूची मूर्ती बुलडोझरने पाडली, भारताने घेतला तीव्र आक्षेप  
4
बांगलादेशमध्ये हिंसाचार सुरूच, पेट्रोल बॉम्ब हल्ल्यानंतर आता मध्यरात्री ढाका विद्यापीठात मोडतोड
5
नाताळाच्या पूर्वसंध्येला बांगलादेशची राजधानी हादरली, पेट्रोल बॉम्बच्या स्फोटात एकाचा मृत्यू
6
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
7
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
8
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
9
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
10
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
11
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

अमित शहा यांचा केंद्रस्थानी प्रभाव; सरकार, पक्षकार्यासह संसदेतही त्यांची अधिकारवाणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2019 06:19 IST

अमित शहा हे पक्ष कार्यासोबत सरकार आणि आता संसदेचे कामकाज सुरळीत चालविण्यात महत्त्वाची भूमिका पार पाडत आहेत.

हरिश गुप्ता 

नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे सरकारमध्ये क्रमानुसार तिसरे नेते असले तरी त्यांचा केंद्रस्थानी वाढता प्रभाव आहे. सरकार आणि पक्षसंघटनेसोबत संसदीय कामकाज मार्गी लावण्यातही त्यांनी आपली छाप पाडली आहे. वरिष्ठ नेते अरुण जेटली यांची अनुपस्थिती सर्वांना जाणवत असली तरी तत्पर निर्णय, व्यावहारिक समंजसपणा आणि स्पष्ट भूमिकेने अमित शहा हे प्रभावी ठरले आहेत. सरकारमध्ये पंतप्रधानांनंतर अधिकारवाणीने बोलणारे एकमेव केंद्रीय मंत्री नेते म्हणून त्यांनी आपली ओळख निर्माण केली आहे.

अमित शहा हे पक्ष कार्यासोबत सरकार आणि आता संसदेचे कामकाज सुरळीत चालविण्यात महत्त्वाची भूमिका पार पाडत आहेत. राज्यसभेत विरोधी पक्षांनी घातलेल्या गोंधळानंतर दुसऱ्या दिवशी विरोधी पक्षांच्या नेत्यांची बैठक घेऊन दिवसभरासाठी राज्यसभेचे कामकाज तहकूब होऊ नये, यासाठी विरोधकांशी सामंजस्याने संवाद साधून त्यांचे मन वळविण्यासाठी पुढाकार घेतात. त्यांच्या या पुढाकाराने ठरविण्यात आलेल्या रणनीतीमुळे तीन तहकुबीननंतर राज्यसभेचे कामकाज सुरळीत होईल. वृत्तांकनासाठी नियमितपणे येणाºया काही पत्रकारांनी नॉर्थ ब्लॉकमध्ये आम्हाला प्रवेशबंदी घालणार का? असा थेट सवाल केला असता अमित शहा म्हणाले की, ‘मी उदार मनाचा आहे. असले निर्बंध घालणार नाही,’ अशी जाहीर स्पष्टोक्ती कोणताही मंत्री देणार नाही; परंतु अमित शहा यांनी मोघम न बोलता असला प्रकार आपणास मान्य नसल्याचा स्पष्ट संदेश दिला.

संसदेच्या दोन्ही सभागृहांत विविध विधेयके सादर करण्यासाठी, तसेच त्यावरील चर्चेला उत्तर देण्यासाठी त्यांनी आपल्या कनिष्ठ सहकारी मंत्र्यांना प्रोत्साहन दिले. अशावेळी सभागृहात हजर राहून त्यांनी गरज पडल्यास चर्चेत हस्तक्षेपही केला. त्यांची ही पद्धत पाहून अन्य वरिष्ठ मंत्र्यांनी त्यांचा हा कित्ता गिरवणे सुरू केले.

संसदेत प्रश्नोत्तराच्या तासात त्यांनी आपल्या कनिष्ठ मंत्र्यांना उत्तरे देण्याची संधी दिली. गृहराज्यमंत्री नित्यानंद राय किंवा जी. कृष्णा रेड्डी यांनाही खासदारीकच्या पहिल्याच कारकीर्दीत आपल्यावर एवढी महत्त्वाची कामगिरी सोपविली जाईल, अशी कल्पनाच केली नसावी.जम्मू-काश्मीरमधील राष्ट्रपती राजवटीला मुदतवाढ देण्याचा एकमेव प्रस्ताव त्यांनी संसदेत सादर केला. काश्मीर, एनआरसीचा मुद्दा सोडवून पश्चिम बंगाल जिंकण्याचा त्यांचा मानस आहे. सरकारच्या पहिल्या ५० दिवसांत गृहमंत्री म्हणून त्यांनी ठसा उमटविला. आक्रमक आणि स्पष्ट भूमिका घेणारे अमित शहा यांचे व्यक्तिमत्त्व असले तरी पत्रकारांनी संकेत पाळल्यास ते संसदेच्या मध्यवर्ती सभागृहात गप्पागोष्टी आणि विनोदातही रमतात.

टॅग्स :Amit Shahअमित शहाBJPभाजपाlok sabhaलोकसभा