शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

चमोली दुर्घटनेत १९७ जण बेपत्ता, बचावकार्य युद्धपातळीवर; अमित शहांची संसदेत माहिती

By देवेश फडके | Updated: February 9, 2021 14:59 IST

केंद्र आणि राज्य सरकारकडून बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे, अशी माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेत दिली.

ठळक मुद्देचमोली दुर्घटनेसंदर्भात अमित शहा यांचे संसदेत निवेदनकेंद्र सरकारकडून सर्वतोपरी मदत देण्याचे आश्वासनचमोली दुर्घटनेत १९७ जण बेपत्ता, तर २६ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती

नवी दिल्ली : उत्तराखंडमधील चमोली जिल्ह्यात हिमकडा कोसळून झालेल्या दुर्घटनेनंतर आलेल्या महापूरामुळे मोठे नुकसान झाले आहे. या दुर्घटनेमुळे जीवितहानी आणि वित्तहानीही मोठ्या प्रमाणात झाली आहे. केंद्र आणि राज्य सरकारकडून बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे, अशी माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेत दिली. (amit shah statement in rajya sabha on chamoli glacier uttarakhand tragedy)

हिमकडा कोसळून आलेल्या महापूरामुळे १३.२ मेगाव्हॅटचा जलविद्युत प्रकल्प वाहून गेला. तसेच तपोवन येथील ५२० मेगाव्हॅट प्रकल्पाचेही नुकसान झाले आहे. आताच्या घडीला या क्षेत्रातील सखल भागांना कोणताही धोका नाही, असे उत्तराखंड सरकारकडून सांगण्यात आले आहे, असेही अमित शहा म्हणाले. 

परिस्थितीवर २४ तास देखरेख

चमोली येथून ५ हजार ६०० मीटर उंचीवर असलेला हिमकडा कोसळला. १४ वर्ग कि.मी. क्षेत्राएवढा याचा अवाका होता. या हिमस्खलनामुळे महापूर आला, असेही अमित शहा यांनी सांगितले. केंद्र सरकारकडून २४ तास या घटनेनंतर देखरेख ठेवण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी दररोज स्थितीवर देखरेख ठेवून आहेत. गृह मंत्रालयातील नियंत्रण कक्षाकडूनही नियमित अंतराने माहिती घेतली जात आहे, अशी माहिती अमित शहा यांनी दिली.

कधीही पाकिस्तानात गेलो नाही, हे माझं भाग्य: गुलाम नबी आझाद

केंद्र सरकारकडून सर्वतोपरी मदत

केंद्र सरकारकडून उत्तराखंड सरकारला सर्वतोपरी मदत केली जात आहे. मदत आणि बचावकार्यात राज्य सरकारशी समन्वय ठेवून शक्य ती सर्व मदत आणि आवश्यक त्या उपाययोजना केल्या जातील, असे आश्वासन अमित शहा यांनी यावेळी दिले. हिमकडा कोसळून झालेल्या दुर्घटनेत आतापर्यंत २६ जणांचा मृत्यू झाला आहे. तर, १९७ जण बेपत्ता आहेत. यामध्ये बांधकाम सुरू असलेल्या प्रकल्पातून १३९ जण, ऋषी गंगा प्रकल्पातील ४६ जण आणि १२ ग्रामस्थांचा समावेश आहे, असे ते म्हणाले.

टॅग्स :Rajya Sabhaराज्यसभाAmit Shahअमित शहाuttarakhand glacier burstउत्तराखंड हिमकडा