शहरं
Join us  
Trending Stories
1
Ganesh Kale Shot Dead: गणेशची हत्या करून फरार झालेले चार आरोपी सापडले; दोघांना अटक, नावे आली समोर
2
Ganesh Kale: मानेत, छातीत व पोटात घुसल्या गोळ्या, पळण्याआधीच चौघांनी गणेशला संपवले; आरोपींची नावे काय?
3
Satara: फलटणमध्ये आणखी एका तरुणीने संपवले आयुष्य, आंचलच्या मृत्युसाठी आईवडिलच ठरले कारण
4
Pune Crime: नाशिकच्या तरुणीवर हिंजवडीत कोयत्याने हल्ला! प्रेमप्रकरणातून तरुणाने केला जीव घेण्याचा प्रयत्न
5
Phaltan Doctor Death: डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणाचा IPS तेजस्विनी सातपुते करणार तपास, एसआयटी स्थापन
6
Ganesh Kale Pune: आधी चार गोळ्या झाडल्या, नंतर डोक्यात कोयत्याने वार; काळेच्या हत्येचा पोलिसांनी सांगितला थरार
7
अमेरिका 'या' देशावर स्ट्राईक करण्याच्या तयारीत, ट्रम्प यांनी दिला आदेश?; रिपोर्टमधून खुलासा
8
चीनसोबत मिळून रशियानं दिला भारताला दगा?; ताजिकिस्तानात रचलं षडयंत्र, वाचा इनसाईड स्टोरी
9
परदेशातील भारताचा एकमेव सैन्य तळ हटवावा लागला, २ वर्षांनी मोठा खुलासा; किती मोठा झटका?
10
Pune Crime: पुण्यात पुन्हा गँगवार! कोंढव्यात गणेश काळेची गोळ्या घालून हत्या, कोयत्यानेही केले वार
11
आजचा मोर्चा संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण करून देणारा; शरद पवारांनी जागवल्या आठवणी
12
IND vs SA: वनडेत द. आफ्रिकेच्या पोरींचा भारतासमोर नाही चालत जोर; पण वर्ल्डकपमध्ये समोर येतात तेव्हा...
13
"बदतमीजों का...!"; राहुल गांधींसंदर्भात आचार्य प्रमोद कृष्णम यांचं वादग्रस्त विधान, RSS संदर्भातही बोलले
14
"मल्लिकार्जून खरगेंनी इतिहासातून धडा घ्यावा", आरएसएसचे दत्तात्रय होसबळे काँग्रेसच्या अध्यक्षांवर भडकले
15
चीनचा एक निर्णय अन् जागतिक बाजारात सोन्याच्या दराचं गणित बदलणार; भारतावर काय परिणाम होणार?
16
निवडणूक आयोगाकडे माझ्या नावाने अर्ज गेला, मोबाईल नंबर...; उद्धव ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट
17
‘आपण काय मेसेज करत आहात? हे व्हॉट्सअ‍ॅपला ठाऊक...’, इलॉन मस्‍क यांचा गंभीर आरोप, केली मोठी घोषणा
18
"दिल्लीचे नामांतर 'इंद्रप्रस्थ' करा"; केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना भाजप खासदाराचे पत्र, पांडवांचा उल्लेख
19
११ कोटींची लॉटरी जिंकली, पण माणूस कुठे गेला? कोट्याधीश विजेत्याला शोधण्यासाठी कंपनीच घेतेय कष्ट
20
Tulasi Vivah Mangalashtak: तुलसी विवाहात 'ही' मंगलाष्टके आवर्जून म्हणा; मिळेल कन्यादानाचे पुण्य!

अडवाणी, गडकरींची परंपरा कायम ठेवून अमित शहांनी राजीनामा द्यावा - पृथ्वीराज चव्हाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2017 21:15 IST

भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी लालकृष्ण अडवाणी, बंगारू लक्ष्मण आणि नितीन गडकरींची परंपरा कायम ठेवून पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे.

मुंबई - भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी लालकृष्ण अडवाणी, बंगारू लक्ष्मण आणि नितीन गडकरींची परंपरा कायम ठेवून पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी काँग्रेस नेते व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे.

चव्हाण यांनी सोमवारी दुपारी पत्रकारांशी संवाद साधताना ही मागणी केली. संघाच्या इशाऱ्यावरून का होईना परंतु, आरोप झाल्यानंतर भारतीय जनता पक्षाच्या अध्यक्षांनी राजीनामे दिल्याची आजवरची परंपरा आहे. यापूर्वी लालकृष्ण अडवाणी यांनी जैन डायरी प्रकरणात नाव आल्यामुळे, बंगारू लक्ष्मण यांनी तहलका प्रकरणात आरोप झाल्यामुळे तर नितीन गडकरी यांनी पूर्ती उद्योग समूहासंदर्भातील आरोपांमुळे राष्ट्रीय अध्यक्ष पदाचे राजीनामे दिले होते. त्यानुसार अमित शहा यांनी सुद्धा त्यांच्या मुलाबाबत निर्माण झालेल्या शंकांचे निरसन होईपर्यंत पदावरून बाजुला झाले पाहिजे, असे चव्हाण म्हणाले.

‘द वायर’ या वेबसाइटने भाजपाध्यक्षांचे चिरंजीव जय शहा यांची कंपनी टेंपल एन्टरप्रायजेसच्या व्यवहाराबाबत काही माहिती समोर आणली आहे. यावरून त्यांच्या कारभाराबाबत ‘क्रॉनी कॅपिटॅलिझम’ची शंका निर्माण होते. पंतप्रधानांनी ‘क्रॉनी कॅपिटॅलिझम’विरूद्ध जाहीर भूमिका घेतली आहे. त्यामुळे ‘द वायर’च्यामाहितीची वस्तुस्थिती समोर आणण्यासाठी पंतप्रधानांनी मौन सोडून या प्रकरणाची प्रवर्तन संचलनालय किंवा केंद्रीय अन्वेषण विभाग किंवा आयकर विभागाकडून चौकशीचे आदेश द्यावेत, अशीही मागणी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली. अमित शहा लोकप्रतिनिधी असल्याने हे प्रकरण केंद्रीय अन्वेषण विभाग आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडूनही तपासायला हवे, असेही ते म्हणाले.

जय शहा यांच्या बचावार्थ पियुष गोयल यांनी पुढाकार घेतल्यासंदर्भातही चव्हाण यांनी तीव्र आक्षेप नोंदवला. ते म्हणाले की, जय शहा यांचा सरकारशी थेट संबंध नाही. त्यामुळे सरकारच्या मंत्र्यांनी त्यांच्या वतीने खुलासा करणे किंवा ते मानहानीचा दावा ठोकणार असल्याची माहिती देणे, हेच मुळात आश्चर्यकारक आहे. पियुष गोयल नवीन व नवीकरणीय उर्जा मंत्रालयाचे मंत्री असताना त्यांच्या अखत्यारीतील भारतीय नवीकरणीय उर्जा विकास संस्था नामक सार्वजनिक कंपनीतून जय शहा यांच्या कंपनीला पवन उर्जा प्रकल्पासाठी १०.३५ कोटी रूपयांचे कर्ज दिले आहे. जय शहा यांची कंपनी समभाग विक्रीच्या व्यवसायात असून, त्यांचा पवन उर्जा प्रकल्पाच्या उभारणीचा कोणताही अनुभव नव्हता. तरीही जय शहा यांच्या कंपनीला कर्ज मिळाल्यासंदर्भात पियुष गोयल यांनीच उत्तर देण्याची गरज आहे.

या पार्श्वभूमीवर जय शहा यांच्या बचावासाठी पियुष गोयल समोर आल्याने या प्रकरणातील गूढ वाढले आहे. खरे तर या प्रकरणात केंद्रीय मंत्र्यांनी नव्हे तर जय शहा किंवा त्यांच्या वकिलांनी स्पष्टीकरण द्यायला हवे. भाजपला खुलासाच करायचा असेल तर तो पंतप्रधानांनी करावा. कारण या प्रकरणाचा संबंध थेट भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांच्या मुलाशी जुळलेला आहे, असेही पृथ्वीराज चव्हाण पुढे म्हणाले.

केंद्रात सत्तापालट झाल्यानंतर जय शहा यांच्या कंपनीच्या व्यवहारात अचानक १६ हजार पटींनी वाढ झाली. परंतु, त्यानंतर ऑक्टोबर २०१६ मध्ये लगेच ही कंपनी अचानक बंद करण्यात आली. हवाला व्यवहारात गुंतलेल्या कंपन्यांची कार्यपद्धती साधारणतः अशीच असते. ८ नोव्हेंबर २०१६ ला नोटाबंदीचा निर्णय होण्याच्या काही दिवस अगोदर ही कंपनी बंद करणे, याला निव्वळ एक योगायोगच मानायचा का? नोटाबंदीमध्ये २ लाख बनावट (शेल) कंपन्यांचा पर्दाफाश झाल्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली आहे. पण नोटाबंदीतून बनावट (शेल) कंपन्यांचा पर्दाफाश होण्याचा आणि नोटाबंदीपूर्वीच जय शहा यांनी कंपनी बंद करण्याचा संबंध आहे की नाही, हे स्पष्ट होण्याची गरज माजी मुख्यमंत्र्यांनी विषद केली.

टॅग्स :Amit Shahअमित शाहPrithviraj Chavanपृथ्वीराज चव्हाणBJPभाजपाIndian National Congressइंडियन नॅशनल काँग्रेस