शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

तेलंगणा, आंध्र प्रदेश अन् केरळला भाजपाचा बालेकिल्ला करा, अमित शहांचं कार्यकर्त्यांना आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2019 11:38 IST

केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांना तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि केरळसारख्या दक्षिणी राज्यांना भाजपाचा गड बनवण्याचं आवाहन केलं आहे.

नवी दिल्लीः केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांना तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि केरळसारख्या दक्षिणी राज्यांना भाजपाचा बालेकिल्ला बनवण्याचं आवाहन केलं आहे. दक्षिणी राज्य हा भाजपाचा गड बनेल, त्या दिशेनं काम करा, असा सल्लाही त्यांनी कार्यकर्त्यांना दिला आहे. कर्नाटकमध्ये आम्ही सरकार बनवलं होतं, तरीही म्हटलं जातं भाजपा दक्षिणेत नाही. मला एवढंच म्हणायचं आहे की, तेलंगणा, आंध्र प्रदेश असो वा केरळ, या तिन्ही राज्यांना एक दिवस भाजपाचा गड बनवावा लागेल. तेलंगणात पक्षाच्या सदस्य मोहिमेदरम्यान अमित शाह बोलत होते. 

पहिल्यांदा तेलंगणाला आपला गड बनवयाचा की आंध्र प्रदेश आणि केरळला याचा निर्णय तुम्हीच घ्या, असंही ते कार्यकर्त्यांना उद्देशून म्हणाले आहेत. या तिन्ही राज्यांतील 50 टक्क्यांहून अधिकची मतं भाजपाला मिळायला हवीत, असा शहाजोग सल्लाही अमित शहांनी कार्यकर्त्यांना दिला.  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाराणसी येथे भाजपाच्या सदस्य जोडणी अभियानाला काही दिवसांपूर्वीच सुरुवात केली. 2019च्या लोकसभा निवडणुकीमध्ये देशातल्या 17 राज्यांतून भाजपाच्या पारड्यात 50 टक्क्यांहून अधिकची मतं पडली होती.या राज्यांमध्ये गेल्या पाच वर्षांमध्ये भाजपामध्ये मोठ्या प्रमाणात सदस्य नोंदणी मोहीम राबवली होती. दक्षिण भारतात कर्नाटक सोडल्यास भाजपाला तेलंगणामध्ये फक्त 19 टक्के मतं मिळाली आहेत. पुढच्या निवडणुकीत भाजपाला या राज्यांतून 50 टक्क्यांहून अधिक मतं मिळालीच पाहिजेत, असा निर्धारही त्यांनी कार्यकर्त्यांना बोलून दाखवला आहे. 

टॅग्स :Amit Shahअमित शहा