शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

UP Election 2022 : शेतकऱ्यांसाठी मोफत वीज अन् दरवर्षी 2 सिलिंडर मिळणार फ्री, भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2022 13:07 IST

UP Election 2022 : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी भाजपचा निवडणूक जाहीरनामा (BJP Election Menifesto) प्रसिद्ध केला. या जाहीरनाम्यात भाजपने उत्तर प्रदेशातील जनतेला अनेक मोठी आश्वासने दिली आहेत.

लखनऊ : उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी (UP Assembly Election 2022) भाजपने आज (मंगळवार) संकल्प पत्र (Samkalp Patra) म्हणजेच पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध केला. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी भाजपचा निवडणूक जाहीरनामा (BJP Election Menifesto) प्रसिद्ध केला. या जाहीरनाम्यात भाजपने उत्तर प्रदेशातील जनतेला अनेक मोठी आश्वासने दिली आहेत.

भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध करताना गृहमंत्री अमित शाह म्हणाले की, शेतकऱ्यांना शेतीच्या क्षेत्रात सिंचनासाठी मोफत वीज दिली जाईल. त्यामुळे शेतकऱ्यांवरील कर्जाचा बोजा कमी होणार आहे. पुढील पाच वर्षांत प्रत्येक कुटुंबातील किमान एका सदस्याला रोजगार किंवा स्वयंरोजगाराची संधी देईल. स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी प्रत्येक जिल्ह्यात कोचिंगची व्यवस्था केली जाईल.

युवकांच्या प्रशिक्षणासाठी प्रत्येक ब्लॉकमध्ये आयटीआय स्थापन करण्यात येणार असल्याचे अमित शाह यांनी सांगितले. तसेच, प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या सर्व लाभार्थ्यांना दरवर्षी होळी आणि दीपावलीच्या दिवशी 2 मोफत एलपीजी सिलिंडर दिले जातील. 60 वर्षांवरील महिलांसाठी सार्वजनिक वाहतुकीत मोफत प्रवासाची व्यवस्था केली जाईल. विधवा आणि निराधार महिलांसाठी निवृत्ती वेतन दरमहा 1,500 रुपये करण्यात येणार आहे, असे अमित शाह म्हणाले. 

आज मला 5 वर्षांपूर्वीचे दृश्य आठवते. हीच जागा होती, तेव्हा भाजपने जाहीरनामा जनतेसमोर ठेवला होता. तेव्हा मी पक्षाचा अध्यक्ष होतो. 2014 मध्येच जनतेने सांगितले होते की 2017 मध्ये यूपीमध्ये भाजपचे सरकार बनणार आहे. 2014 मध्ये भाजपने 80 पैकी 73 जागा जिंकल्या आणि 2017 मध्ये विधानसभेच्या 300 पेक्षा जास्त जागा लोकांनी जिंकल्या, असे अमित शाह यांनी सांगितले. 

तसेच, अमित शाह म्हणाले की, गेल्या पाच वर्षांत उत्तर प्रदेशचा विकास प्रत्येक क्षेत्रात झाला. गुन्हेगारांना आज राजकारणात स्थान नाही. मुख्यमंत्री  योगी आदित्यनाथ यांनी गुन्हेगारीमुक्त करण्याचे काम केले आहे. त्यांनी प्रशासनाचे राजनीतीकरणही थांबवले. 2017 च्या जाहीरनाम्यात 212 संकल्प होते, त्यापैकी 92 टक्के संकल्प पूर्ण झाले आहेत. यावेळी पुन्हा भाजप मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखाली उत्तर प्रदेशात बहुमताचे सरकार स्थापन करणार आहे, असे अमित शाह म्हणाले. 

शेतकऱ्यांच्या खात्यावर दरवर्षी 6 हजार रुपये पाठवण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले आहे. दुसरीकडे, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सरकार स्थापन झाल्यानंतर दोन महिन्यांत लहान आणि मध्यम शेतकऱ्यांचे 86 लाख कोटी रुपयांचे कर्ज माफ करण्याचे काम केले, असे अमित शाह म्हणाले. याचबरोबर, पाच वर्षांपूर्वी उत्तर प्रदेश हे दंगायुक्त राज्य म्हटले जात होते. बहिणी-मुली सुरक्षित नव्हत्या. भाजप सरकारच्या पाच वर्षानंतर राज्यातून गुन्हेगारांचे स्थलांतर झाले आहे. लुटमारीच्या घटनांमध्ये 57 टक्के आणि बलात्काराच्या घटनांमध्ये 42 टक्के घट झाली आहे, असे अमित शाह यांनी सांगितले. 

पहिल्या टप्प्यातील प्रचार आज संपणार उत्तर प्रदेशमधील विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील प्रचार आज सांयकाळी संपणार आहे. पहिल्या टप्प्यात राज्यातील 11 जिल्ह्यांतील शामली, मेरठ, मुझफ्फरनगर, बागपत, हापूर, गौतम बुद्ध नगर, गाझियाबाद, बुलंदशहर, मथुरा, आग्रा आणि अलीगढमधील 58 जागांसाठी 10 फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. उत्तर प्रदेशमध्ये 10, 14, 20, 23, 27  फेब्रुवारीसह 3 आणि 7 मार्च रोजी सात टप्प्यांत मतदान होणार आहे. तर 10 मार्च रोजी मतमोजणी होणार आहे.

टॅग्स :Uttar Pradesh Assembly Election 2022उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक २०२२Amit Shahअमित शाहBJPभाजपा