शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

मोहन भागवतांच्या मणिपूरवरील वक्तव्यानंतर अमित शाह अॅक्टिव्ह, बोलावली उच्चस्तरीय बैठक...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2024 19:33 IST

मणिपूर हिंसाचाराबाबत गृहमंत्री अमित शाह यांनी एक उच्चस्तरीय बैठक बोलावली, ज्यामध्ये लष्कर प्रमुख आणि आयबी प्रमुखांसह अनेक उच्चपदस्थ अधिकारी सहभागी झाले होते.

Amit Shah High Level Meeting : भारताच्या पूर्वेकडील मणिपूर (Manipur) राज्यात गेल्या वर्षभरापासून हिंसाचार होत आहे. या हिंसाचारावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांनी काही दिवसांपूर्वीच मोठे वक्तव्य केले होते. त्यानंतर आता केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) अॅक्टिव्ह झाले असून, मणिपूरमधील सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी त्यांनी सोमवारी (17 जून) उच्चस्तरीय बैठक बोलावली. 

मिळालेल्या माहितीनुसार, या बैठकीला केंद्रीय गृहसचिव अजय भल्ला, इंटेलिजन्स ब्युरोचे प्रमुख तपन डेका, लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे, लष्करप्रमुख (नियुक्त) लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी, जीओसी थ्री कोअर एचएस साही, मणिपूरचे सुरक्षा सल्लागार कुलदीप सिंग, मणिपूरचे मुख्य सचिव विनीत जोशी, मणिपूरचे डीजीपी राजीव राजीव सिंग आणि आसाम रायफल्सचे डीजी प्रदीप चंद्रन नायर बैठकीत सामील झाले. तसेच, मणिपूरच्या राज्यपाल अनुसुईया उईके यांनी रविवारी(दि.16) शाह यांची भेट घेऊन राज्यातील सद्य परिस्थितीवर चर्चा केली होती. 

यामुळे हिंसाचाराला सुरुवात3 मे 2023 रोजी मणिपूरमधील बहुसंख्य मेईतेई समुदायाने अनुसूचित जमातीचा दर्जा मिळवण्याची मागणी केली होती. या मागणीच्या निषेधार्थ राज्याच्या डोंगराळ जिल्ह्यांमध्ये राहणाऱ्या कुकी आदिवासी समाजाने एकता मोर्चा काढला. यादरम्यान हिंसाचार उसळला आणि तेव्हापासून हा हिंसाचार शमलेला नाही. आतापर्यंत या हिंसाचारात कुकी आणि मेईतेई समाजातील 220 हून अधिक लोक आणि सुरक्षा दलांचे जवान बळी गेले आहेत.

ताजी घटनाया महिन्याच्या सुरुवातीला एका व्यक्तीच्या हत्येनंतर कोटलेनमध्ये अज्ञात हल्लेखोरांनी मेईतेई आणि कुकी, या दोन्ही समुदायातील अनेक घरे जाळली होती. मणिपूरच्या जिरीबाम भागात झालेल्या या ताज्या हिंसाचारानंतर मणिपूरच्या जिरीबाम भागातील सुमारे 600 लोक आता आसामच्या कछार जिल्ह्यात आश्रय घेत आहेत. कछार जिल्हा पोलिसांनी सीमावर्ती भागात बंदोबस्त वाढवला आहे.

मोहन भागवत काय म्हणाले होते?10 जून रोजी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ प्रमुख मोहन भागवत यांनी वर्षभरानंतरही मणिपूरमध्ये शांतता प्रस्थापित न झाल्याबद्दल चिंता व्यक्त केली होती. नागपुरात स्वयंसेवकांना संबोधित करताना भागवत म्हणाले, “मणिपूर गेल्या वर्षभरापासून शांततेची वाट पाहत आहे. दहा वर्षांपूर्वी मणिपूरमध्ये शांतता होती. तिथे बंदुक संस्कृती संपली असे वाटत होते, पण अचानक राज्यात हिंसाचार वाढला. मणिपूरमधील परिस्थितीचा प्राधान्याने विचार करावा लागेल. निवडणुकीतून वर उठून देशासमोरील समस्यांवर लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे.''

टॅग्स :Amit Shahअमित शाहManipur Violenceमणिपूर हिंसाचारIndian Armyभारतीय जवानCentral Governmentकेंद्र सरकार