शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
2
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
3
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
4
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
5
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
6
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
7
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
8
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
9
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
10
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
11
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
12
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
13
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
14
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
15
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
16
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
17
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
18
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
19
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
20
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!

मोहन भागवतांच्या मणिपूरवरील वक्तव्यानंतर अमित शाह अॅक्टिव्ह, बोलावली उच्चस्तरीय बैठक...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2024 19:33 IST

मणिपूर हिंसाचाराबाबत गृहमंत्री अमित शाह यांनी एक उच्चस्तरीय बैठक बोलावली, ज्यामध्ये लष्कर प्रमुख आणि आयबी प्रमुखांसह अनेक उच्चपदस्थ अधिकारी सहभागी झाले होते.

Amit Shah High Level Meeting : भारताच्या पूर्वेकडील मणिपूर (Manipur) राज्यात गेल्या वर्षभरापासून हिंसाचार होत आहे. या हिंसाचारावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांनी काही दिवसांपूर्वीच मोठे वक्तव्य केले होते. त्यानंतर आता केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) अॅक्टिव्ह झाले असून, मणिपूरमधील सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी त्यांनी सोमवारी (17 जून) उच्चस्तरीय बैठक बोलावली. 

मिळालेल्या माहितीनुसार, या बैठकीला केंद्रीय गृहसचिव अजय भल्ला, इंटेलिजन्स ब्युरोचे प्रमुख तपन डेका, लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे, लष्करप्रमुख (नियुक्त) लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी, जीओसी थ्री कोअर एचएस साही, मणिपूरचे सुरक्षा सल्लागार कुलदीप सिंग, मणिपूरचे मुख्य सचिव विनीत जोशी, मणिपूरचे डीजीपी राजीव राजीव सिंग आणि आसाम रायफल्सचे डीजी प्रदीप चंद्रन नायर बैठकीत सामील झाले. तसेच, मणिपूरच्या राज्यपाल अनुसुईया उईके यांनी रविवारी(दि.16) शाह यांची भेट घेऊन राज्यातील सद्य परिस्थितीवर चर्चा केली होती. 

यामुळे हिंसाचाराला सुरुवात3 मे 2023 रोजी मणिपूरमधील बहुसंख्य मेईतेई समुदायाने अनुसूचित जमातीचा दर्जा मिळवण्याची मागणी केली होती. या मागणीच्या निषेधार्थ राज्याच्या डोंगराळ जिल्ह्यांमध्ये राहणाऱ्या कुकी आदिवासी समाजाने एकता मोर्चा काढला. यादरम्यान हिंसाचार उसळला आणि तेव्हापासून हा हिंसाचार शमलेला नाही. आतापर्यंत या हिंसाचारात कुकी आणि मेईतेई समाजातील 220 हून अधिक लोक आणि सुरक्षा दलांचे जवान बळी गेले आहेत.

ताजी घटनाया महिन्याच्या सुरुवातीला एका व्यक्तीच्या हत्येनंतर कोटलेनमध्ये अज्ञात हल्लेखोरांनी मेईतेई आणि कुकी, या दोन्ही समुदायातील अनेक घरे जाळली होती. मणिपूरच्या जिरीबाम भागात झालेल्या या ताज्या हिंसाचारानंतर मणिपूरच्या जिरीबाम भागातील सुमारे 600 लोक आता आसामच्या कछार जिल्ह्यात आश्रय घेत आहेत. कछार जिल्हा पोलिसांनी सीमावर्ती भागात बंदोबस्त वाढवला आहे.

मोहन भागवत काय म्हणाले होते?10 जून रोजी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ प्रमुख मोहन भागवत यांनी वर्षभरानंतरही मणिपूरमध्ये शांतता प्रस्थापित न झाल्याबद्दल चिंता व्यक्त केली होती. नागपुरात स्वयंसेवकांना संबोधित करताना भागवत म्हणाले, “मणिपूर गेल्या वर्षभरापासून शांततेची वाट पाहत आहे. दहा वर्षांपूर्वी मणिपूरमध्ये शांतता होती. तिथे बंदुक संस्कृती संपली असे वाटत होते, पण अचानक राज्यात हिंसाचार वाढला. मणिपूरमधील परिस्थितीचा प्राधान्याने विचार करावा लागेल. निवडणुकीतून वर उठून देशासमोरील समस्यांवर लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे.''

टॅग्स :Amit Shahअमित शाहManipur Violenceमणिपूर हिंसाचारIndian Armyभारतीय जवानCentral Governmentकेंद्र सरकार