शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

Amit Shah in Manipur: मणिपूर हिंसाचार: शांतता समिती स्थापन, CBI चौकशी, बंडखोरांना इशारा; केंद्राच्या 9 मोठ्या घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2023 14:47 IST

गृहमंत्री अमित शहा यांनी सलग तीन दिवस राज्यातील विविध हिंसाचारग्रस्त भागांचा दौरा केल्यानंतर मोठ्या घोषणा केल्या आहेत.

Amit Shah in Manipur: मणिपूरमधील जातीय हिंसाचाराच्या चौकशीसाठी उच्च न्यायालयाच्या निवृत्त मुख्य न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली न्यायिक आयोगाची स्थापना केली जाईल, अशी घोषणा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी गुरुवारी केली. सलग तीन दिवस राज्यातील विविध हिंसाचारग्रस्त भागांचा दौरा केल्यानंतर अमित शहांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. याशिवाय, मणिपूरच्या राज्यपालांच्या अध्यक्षतेखाली शांतता समिती स्थापन करण्याची आणि हिंसाचारात मृत्युमुखी पडलेल्यांना भरपाई देण्याची घोषणाही त्यांनी यावेळी केली.

केंद्रीय गृहमंत्री शह म्हणाले की, मणिपूर उच्च न्यायालयाने घाईघाईने घेतलेल्या निर्णयामुळे दोन गटांमध्ये हिंसाचार झाला. केंद्रीय गृहमंत्र्यांनी जनतेला अफवांकडे लक्ष न देण्याचे आणि राज्यात शांतता राखण्याचे आवाहन केले. बंडखोर गटांनी कोणत्याही प्रकारे सस्पेंशन ऑफ ऑपरेशन्स (SOO) कराराचे उल्लंघन केल्यास कठोर कारवाईचा इशाराही त्यांनी यावेळी दिला. 

मणिपूरसाठी केंद्र सरकारकडून 9 मोठ्या घोषणा:

* हिंसाचाराच्या काळात नोंदवलेल्या सर्व गुन्ह्यांपैकी एकूण 6 प्रकरणांचा तपास केंद्रीय अन्वेषण ब्युरो (CBI) करणार आहे. 

* हिंसाचाराची कारणे काय आहेत आणि त्याला जबाबदार कोण? या सर्वांच्या चौकशीसाठी उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली आयोगाची स्थापना करण्यात येणार आहे.

* मणिपूरमधील सुरक्षेवर काम करणाऱ्या विविध एजन्सींमधील उत्तम समन्वयासाठी केंद्रीय राखीव पोलिसांचे निवृत्त महासंचालक कुलदीप सिंग यांच्या अध्यक्षतेखाली 'इंटर-एजन्सी युनिफाइड कमांड' स्थापन करण्यात येईल.

* भारत-म्यानमार सीमेचे सर्वेक्षण केले जाईल. भारत-म्यानमार सीमा प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी कुंपण घालण्याचे काम पूर्ण केले जाईल. मणिपूर रेल्वे मार्गाने भारताच्या इतर भागांशी जोडले जाईल. मणिपूरमध्ये बांधण्यात येत असलेला प्लॅटफॉर्म आठवडाभरात पूर्ण होईल.

* मणिपूरमध्ये कार्यरत सशस्त्र दलांना इशारा देण्यात आलाय की, शांतता कराराचे उल्लंघन झाल्यास भारत सरकारकडून कठोर कारवाई केली जाईल. लोकांना अवैध शस्त्रे जमा करण्याचे आवाहनही करण्यात आले.

* राज्यात जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठ्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या अधिकाऱ्यांची विशेष टीम तैनात करण्यात आली आहे.

* भारत सरकार मणिपूरच्या राज्यपालांच्या अध्यक्षतेखाली एक शांतता समिती देखील स्थापन करेल आणि त्यामध्ये समाजातील सर्व घटक आणि राजकीय पक्षांचे प्रतिनिधी असतील.

* केंद्रीय गृहमंत्र्यांनी जाहीर केले की हिंसाचारात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना भारत सरकारकडून प्रत्येकी 5 लाख रुपये आणि राज्य सरकारकडून प्रत्येकी 5 लाख रुपये दिले जातील.

* मणिपूरमध्ये सुरू असलेल्या संकटावर चर्चा हाच उपाय आहे. शेजारील देशातून येणाऱ्या लोकांचे 'बायोमेट्रिक्स' गोळा केले जात आहेत.

मणिपूरमध्ये 'आदिवासी एकता मार्च'नंतर जातीय हिंसाचार उसळला होता. अनुसूचित जाती (एसटी) दर्जाच्या मागणीसाठी मेईतेई समाजाने 3 मे रोजी आंदोलन केल्यानंतर 'आदिवासी एकता मार्च' आयोजित करण्यात आला होता. मणिपूरमध्ये जवळपास महिनाभर वांशिक हिंसाचार झाला आणि या काळात राज्यात चकमकींमध्ये वाढ झाली. काही आठवड्यांच्या शांततेनंतर, गेल्या रविवारी सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये गोळीबार झाला. अधिकार्‍यांनी सांगितले की, संघर्षात मृतांची संख्या 80 झाली आहे.

टॅग्स :Amit Shahअमित शाहManipur Violenceमणिपूर हिंसाचारCentral Governmentकेंद्र सरकारCentral Bureau of Investigationकेंद्रीय गुन्हे अन्वेषण