शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेची आणखी २० देशांना 'नो एंट्री'; राष्ट्रीय सुरक्षेसाठी डोनाल्ड ट्रम्पच्या सरकारने घेतला निर्णय
2
आजचे राशीभविष्य, १८ डिसेंबर २०२५: या राशींना धनप्राप्ती होईल, आज यांचे विवाह जुळतील
3
कोकाटेंना भोवला सदनिका घोटाळा; आमदारकी गेली, खाते काढून घेतले!
4
किडनी विक्रीमागे सावकारी की आंतरराष्ट्रीय तस्करी?; शेतकऱ्याला कंबोडियाला पाठविणारा डॉ. क्रिष्णा पोलिसांच्या रडारवर
5
डॉ. आंबेडकर यांचा पुतळा युनेस्कोच्या मुख्यालयात हे देशासाठी गौरवास्पद! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे उद्‌गार 
6
भारतीय चवीचा जागतिक गौरव! जगभरातील सर्वोत्तम गोड पदार्थांत कुल्फी, फिरनीचा समावेश
7
आता टोल नाक्यांवर एआय, जाता येणार ८०च्या स्पीडने; थांबण्याची अन् ट्रॅफिकची कटकट संपणार, २०२६ मध्ये अंमलबजावणी
8
अणुऊर्जा क्षेत्र आता खासगी क्षेत्रासाठी खुले होणार; शांती विधेयक लोकसभेत बहुमताने मंजूर!
9
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
10
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
11
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
12
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
13
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
14
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
15
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
16
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
17
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
18
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
19
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
20
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
Daily Top 2Weekly Top 5

Amit Shah in Manipur: मणिपूर हिंसाचार: शांतता समिती स्थापन, CBI चौकशी, बंडखोरांना इशारा; केंद्राच्या 9 मोठ्या घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2023 14:47 IST

गृहमंत्री अमित शहा यांनी सलग तीन दिवस राज्यातील विविध हिंसाचारग्रस्त भागांचा दौरा केल्यानंतर मोठ्या घोषणा केल्या आहेत.

Amit Shah in Manipur: मणिपूरमधील जातीय हिंसाचाराच्या चौकशीसाठी उच्च न्यायालयाच्या निवृत्त मुख्य न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली न्यायिक आयोगाची स्थापना केली जाईल, अशी घोषणा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी गुरुवारी केली. सलग तीन दिवस राज्यातील विविध हिंसाचारग्रस्त भागांचा दौरा केल्यानंतर अमित शहांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. याशिवाय, मणिपूरच्या राज्यपालांच्या अध्यक्षतेखाली शांतता समिती स्थापन करण्याची आणि हिंसाचारात मृत्युमुखी पडलेल्यांना भरपाई देण्याची घोषणाही त्यांनी यावेळी केली.

केंद्रीय गृहमंत्री शह म्हणाले की, मणिपूर उच्च न्यायालयाने घाईघाईने घेतलेल्या निर्णयामुळे दोन गटांमध्ये हिंसाचार झाला. केंद्रीय गृहमंत्र्यांनी जनतेला अफवांकडे लक्ष न देण्याचे आणि राज्यात शांतता राखण्याचे आवाहन केले. बंडखोर गटांनी कोणत्याही प्रकारे सस्पेंशन ऑफ ऑपरेशन्स (SOO) कराराचे उल्लंघन केल्यास कठोर कारवाईचा इशाराही त्यांनी यावेळी दिला. 

मणिपूरसाठी केंद्र सरकारकडून 9 मोठ्या घोषणा:

* हिंसाचाराच्या काळात नोंदवलेल्या सर्व गुन्ह्यांपैकी एकूण 6 प्रकरणांचा तपास केंद्रीय अन्वेषण ब्युरो (CBI) करणार आहे. 

* हिंसाचाराची कारणे काय आहेत आणि त्याला जबाबदार कोण? या सर्वांच्या चौकशीसाठी उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली आयोगाची स्थापना करण्यात येणार आहे.

* मणिपूरमधील सुरक्षेवर काम करणाऱ्या विविध एजन्सींमधील उत्तम समन्वयासाठी केंद्रीय राखीव पोलिसांचे निवृत्त महासंचालक कुलदीप सिंग यांच्या अध्यक्षतेखाली 'इंटर-एजन्सी युनिफाइड कमांड' स्थापन करण्यात येईल.

* भारत-म्यानमार सीमेचे सर्वेक्षण केले जाईल. भारत-म्यानमार सीमा प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी कुंपण घालण्याचे काम पूर्ण केले जाईल. मणिपूर रेल्वे मार्गाने भारताच्या इतर भागांशी जोडले जाईल. मणिपूरमध्ये बांधण्यात येत असलेला प्लॅटफॉर्म आठवडाभरात पूर्ण होईल.

* मणिपूरमध्ये कार्यरत सशस्त्र दलांना इशारा देण्यात आलाय की, शांतता कराराचे उल्लंघन झाल्यास भारत सरकारकडून कठोर कारवाई केली जाईल. लोकांना अवैध शस्त्रे जमा करण्याचे आवाहनही करण्यात आले.

* राज्यात जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठ्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या अधिकाऱ्यांची विशेष टीम तैनात करण्यात आली आहे.

* भारत सरकार मणिपूरच्या राज्यपालांच्या अध्यक्षतेखाली एक शांतता समिती देखील स्थापन करेल आणि त्यामध्ये समाजातील सर्व घटक आणि राजकीय पक्षांचे प्रतिनिधी असतील.

* केंद्रीय गृहमंत्र्यांनी जाहीर केले की हिंसाचारात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना भारत सरकारकडून प्रत्येकी 5 लाख रुपये आणि राज्य सरकारकडून प्रत्येकी 5 लाख रुपये दिले जातील.

* मणिपूरमध्ये सुरू असलेल्या संकटावर चर्चा हाच उपाय आहे. शेजारील देशातून येणाऱ्या लोकांचे 'बायोमेट्रिक्स' गोळा केले जात आहेत.

मणिपूरमध्ये 'आदिवासी एकता मार्च'नंतर जातीय हिंसाचार उसळला होता. अनुसूचित जाती (एसटी) दर्जाच्या मागणीसाठी मेईतेई समाजाने 3 मे रोजी आंदोलन केल्यानंतर 'आदिवासी एकता मार्च' आयोजित करण्यात आला होता. मणिपूरमध्ये जवळपास महिनाभर वांशिक हिंसाचार झाला आणि या काळात राज्यात चकमकींमध्ये वाढ झाली. काही आठवड्यांच्या शांततेनंतर, गेल्या रविवारी सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये गोळीबार झाला. अधिकार्‍यांनी सांगितले की, संघर्षात मृतांची संख्या 80 झाली आहे.

टॅग्स :Amit Shahअमित शाहManipur Violenceमणिपूर हिंसाचारCentral Governmentकेंद्र सरकारCentral Bureau of Investigationकेंद्रीय गुन्हे अन्वेषण