शहरं
Join us  
Trending Stories
1
अपोलो टायर्स प्रत्येक मॅचमागे ४.५ कोटी रुपये मोजणार; टीम इंडियाला नवा स्पॉन्सर मिळाला
2
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर; ३१ जानेवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
3
IND vs PAK: पाकिस्तान जय शाहला घाबरला; आधी 'बड्या बाता' केल्या, आता गपचूप बसला, काय घडलं?
4
स्विगीने खास पुणेकरांसाठी लाँच केले 'Toing' ॲप; केवळ ५० रुपयांत मिळणार भरपेट जेवण, काय आहे वैशिष्ट्ये?
5
३ वर्षात १ लाखाचे झाले १५ लाखांपेक्षा अधिक, ६ महिन्यांत १८०% नं वधारला स्टॉक
6
"हे विजयाचं परिमाण असू शकत नाही, भारताने...!"; भारत-पाकिस्तान सामन्यासंदर्भात काय म्हणाले ओवेसी?
7
एकीकडे 'घरवाली' दुसरीकडे 'बाहेरवाली'; दोघींसोबत आनंदाने जगत होता तरुण अन् एक दिवस असं काही झालं... 
8
पितृपक्ष इंदिरा एकादशी २०२५: १० राशींवर श्रीहरी प्रसन्न, शिव-गौरी-लक्ष्मी कृपा; शुभ-लाभ-पैसा!
9
'क्रिस्टल ब्लॅक पर्ल' रंगात होंडा अमेझ भारतात लॉन्च; नव्या लूकमध्ये दिसते आणखी धासू!
10
बीचवर फिरायला गेलेल्या तरुणीवर बॉयफ्रेंडसमोरच सामूहिक बलात्कार; पोलिसांनी आरोपी कसे शोधले?
11
महाराष्ट्रात ७९ ठिकाणी शेतकरी भवन उभारणार; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ८ महत्त्वाचे निर्णय
12
आयटी इंजिनिअरने १० टक्के पगारवाढ मागितली, नोकरी गमावली; मग त्याला काढणाऱ्याचीही गेली...
13
भारत आणि चीनचं टेन्शन वाढवणार युरोपियन युनियन! अमेरिकेच्या समोर झुकलं का EU?
14
'ओझेम्पिक टीथ' म्हणजे काय? वजन कमी करण्याच्या औषधाचा होतोय 'असा' दुष्परिणाम
15
Nupur Bora: नुपूर बोरा आहे तरी कोण? सहा वर्षात अनेक गैरव्यवहार, घरातही सापडलं मोठं घबाड!
16
निष्पाप लेकरावर दयाही आली नाही! ७ वर्षांच्या मुलीला तिसऱ्या मजल्यावरून फेकलं, सावत्र आईचा गुन्हा 'असा' झाला उघड
17
6G क्षेत्रात भारताची मोठी झेप, IIT हैदराबादने विकसित केले प्रोटोटाइप; 2030 पर्यंत लॉन्च होणार
18
दही, दूध, लोणी घागर भरूनी...! सर्व स्वस्त झाले, या मोठ्या डेअरीने GST कपातीपूर्वीच घोषणा केली
19
बंगल्याचा हव्यास, गोविंद बरगेंचा छळ; पूजा गायकवाडचा तुरुंगातील मुक्काम वाढला
20
ITR भरण्यासाठी उरले शेवटचे काही तास! आयकर विभागाकडून करदात्यांसाठी ६ टिप्स

अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2025 16:21 IST

पहलगाम येथील हल्ल्यानंतर केंद्र सरकारने पाकिस्तानची कोंडी करण्याचे धोरण स्वीकारले आहे. केंद्र सरकारकडून महत्त्वाचे निर्णय घेण्यात आल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची  बैठक घेतली. 

काश्मीरमध्ये पहलगामधील बैसरन खोऱ्यात झालेल्या दहशतवादी हल्ल्याने जगभरात पडसाद उमटले. २६ पर्यटकांची दहशतवाद्यांनी हत्या केल्यानंतर केंद्र सरकारने दहशतवाद्यांविरोधात आणि पाकिस्तान विरोधात कठोर भूमिका घेतली आहे. पाकिस्तानचे पाणी रोखण्यात आले आहेत. इतरही निर्णय घेण्यात आले असून, आता भारतातील पाकिस्तानी नागरिकांबद्दल निर्णय घेण्यात आला आहे. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी काश्मीरमधून परतताच शुक्रवारी राष्ट्रपतींची भेट घेतली. त्यानंतर सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेऊन संवाद साधला. 

पहलगाम हल्ल्याबद्दल माहिती देतानाच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना आपापल्या राज्यातील पाकिस्तानी नागरिकांना शोधण्याचे निर्देश दिले. भारतात असलेल्या पाकिस्तानी नागरिकांना शोधून त्यांना तातडीने परत पाठवा, असे शाह यांनी सांगितले. पाकिस्तानी नागरिकांचे व्हिसाही रद्द करण्यात आले आहेत. 

२२ एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर केंद्रीय गृह मंत्रालयाने पाकिस्तानशी संबंधित सर्व व्हिसा रद्द करण्याचे आदेश दिले. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत अनेक मोठे निर्णय घेण्यात आले. यात सिंधू जल करार स्थगित करण्याचाही निर्णय घेण्यात आला. भारत-पाकिस्तान यांच्यात १९६० मध्ये सिंधू जल करार लागू करण्यात आला होता. 

सिंधू नदीलाच पाकिस्तानची जीवनवाहिनी म्हटले जाते. २१ कोटींपेक्षा जास्त लोकसंख्येला पाणी पुरवण्याचे काम सिंधू नदी आणि तिच्या चार उपनद्यांच्या माध्यमातून होते. 

टॅग्स :Pahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाAmit Shahअमित शाहChief Ministerमुख्यमंत्रीHome Ministryगृह मंत्रालय