शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
2
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
3
Ahmedabad Plane Crash: कोणती अशी २ कारणे, ज्यामुळं टेकऑफ घेताच प्लेन क्रश होऊ शकतं?; तज्ज्ञांनी सांगितले
4
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
5
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
6
Ahmedabad Plane Crash : "माझी वहिनी लंडनला जात होती, १ तासातच मला..."; अपघातानंतर कुटुंबीयांची रुग्णालयात धाव
7
डॉक्टरांच्या वसतिगृहावर कोसळलं एअर इंडियाचं विमान, इमारतीवर अडकलेला दिसला प्लेनचा मागचा भाग
8
MAYDAY कॉल म्हणजे काय?, तो तीन वेळाच का देतात? अहमदाबादहून 'टेक ऑफ'नंतर पायलटने दिलेल्या 'त्या' कॉलबद्दल...
9
भारतातील सर्वात आव्हानात्मक विमानतळ, लँडिंग-टेक ऑफ करताना पायलटचाही हात कापतो
10
Ahmedabad Plane Crash: अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सची यादी आली समोर; दोन मराठी नावे, खासदार तटकरेंच्या नातेवाईकांचा समावेश
11
अहमदाबाद विमान अपघात : मृतांच्या कुटुंबियांना किती पैसे मिळतील? जाणून घ्या कायदा काय सांगतो!
12
Plane Crash Incident: पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
13
Air India Plane Crash: विमानातून प्रवास करणारे कोण? भारतीय आणि परदेशी नागरिक किती होते?
14
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
15
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?
16
Ahmedabad Plane Crash: विमान दुर्घटनेमुळे सलमान खानने घेतला मोठा निर्णय, म्हणाला-
17
Ahmedabad Plane Crash: ११ वर्षे जुने बोईंग विमान, ७००० किमी प्रवास करणार होते; अपघातग्रस्त विमानाबद्दल सर्व काही जाणून घ्या
18
सेन्सेक्स-निफ्टी आपटले! टाटा ग्रुपला सर्वात मोठा धक्का; 'या' कारणांमुळे बाजार गडगडला
19
पुढे की मागे...? कुठे असतो विमानाचा इंधन टँक? क्रॅश झाल्यास या ठिकाणी बसलेल्या लोकांना पोहोचू शकतो सर्वाधिक धोका
20
आईचे दागिने विकून पत्नीला शिकवलं, सरकारी नोकरी मिळताच तिनं कांड केलं! पतीची पोलिसांत धाव

ईशान्य भारताचा दौरा करण्याची अमित शाहांमध्ये हिंमत नाही; सोनिया गांधींचं आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2019 17:40 IST

Citizen Amendment Act : काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी ईशान्य भारतात होत असलेल्या हिंसाचारावरून मोदी सरकार आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांवर जोरदार हल्लाबोल केला.

नवी दिल्लीः काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी ईशान्य भारतात होत असलेल्या हिंसाचारावरून मोदी सरकार आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांवर जोरदार हल्लाबोल केला. ईशान्य भारताचा दौरा करण्याची अमित शाहांमध्ये हिंमत नाही, असं म्हणत सोनिया गांधींना थेट आव्हान दिलं आहे. नागरिकत्व सुधारणा विधेयकावरून देशभरात हिंसाचार सुरू आहे. ईशान्य भारतातल्या राज्यांमध्ये नागरिकत्व कायद्यावरून अनेक ठिकाणी हिंसाचार उफाळून आला आहे. आसाम आणि त्रिपुराच्या अनेक भागात कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. तसेच मोठ्या प्रमाणात सुरक्षा जवानांना तैनात करण्यात आलं आहे. अमित शाह हे ईशान्य भारताच्या दौऱ्यावर जाणार होते. परंतु तिथली परिस्थिती चिघळलेली असल्यामुळे त्यांनी ईशान्य भारताचा दौरा रद्द केला होता. 

सरकारनं शांती आणि सौहार्द कायम ठेवलं पाहिजे. कायद्याचं शासन चालायला हवं. संविधानाची रक्षा करायला हवी. परंतु भाजपा सरकार देश आणि देशावासीयांवरच हल्ले करत आहे. मोदी सरकार हिंसा आणि विभाजनाची जननी आहे. मोदी सरकारनं देशाला द्वेषाच्या अंधकारात ढकलून दिलं आहे. तसेच तरुणांचं भवितव्य तापलेल्या भट्टीमध्ये सोडण्यात आलं आहे, असंही सोनिया गांधींनी म्हटलं आहे. नव्या नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात आसामसह ईशान्य भारतातील इतर राज्यांत पेटलेल्या आंदोलनाची धग आणखी वाढली आहे. गुवाहाटीमध्ये संचारबंदीला न जुमानता लोक रस्त्यावर उतरून निदर्शने करत असून बाजारपेठा, दुकाने सर्व बंद आहेत. वाहतूक व जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. संसदेच्या दोन्ही सभागृहांनी संमत केलेल्या या दुरुस्ती विधेयकाला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी मान्यता दिली आहे. त्यामुळे कायद्यात रूपांतर झालेल्या कायद्याविरोधात आंदोलनाने सर्वात रौद्र रूप आसाममध्ये धारण केले आहे. तिथे निदर्शनांमुळे सर्व रस्ते बंद असल्याने काही रेल्वे स्थानके व विमानतळावर अनेक प्रवासी अडकून पडले आहेत. या कायद्यामुळे पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांगलादेशातून आलेल्या अल्पसंख्याकांना भारताचं नागरिकत्व बहाल केलं जाणार आहे. 

ईशान्य भारतानंतर या आंदोलनाचं लोण दिल्लीपर्यंत पोहोचलं आहे. दिल्लीतल्या जामिया मिलिया विद्यापीठातही हिंसाचार झाला आहे. विद्यार्थ्यांच्या व शिक्षकांच्या संघटनांनी या हिंसाचाराशी विद्यार्थ्यांचा काही संबंध नसल्याचं सांगितलं. कॅम्पसबाहेरचे हे आंदोलन व हिंसाचार स्थानिक लोकांनी केले असून, विद्यापीठाला बदनाम करण्यासाठी त्याचे खापर आमच्यावर फोडले जात असल्याचा आरोप विद्यार्थी संघटनेने केला. या आंदोलन व हिंसाचारामुळे दिल्ली मेट्रोची जामिया, सुखदेव विहार, जसोला, शाहीन बाग व आश्रम रोडसह तेरा स्थानके काल संध्याकाळनंतर बंद करण्यात आली होती व गाड्यांचे तेथील थांबेही रद्द करण्यात आले होती. अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी झाली होती.या आंदोलनापायी विद्यापीठाने सर्व परीक्षा रद्द करून 5 जानेवारीपर्यंत सुट्टी जाहीर केली. या आंदोलनाचा रविवारी सहावा दिवस होता. शेकडो विद्यार्थी, तरुण, विविध राजकीय पक्षांचे नेते, संघटनांचे प्रतिनिधी रविवारी जामियाजवळ जमले होते. सायंकाळी चार वाजता हजारोंच्या संख्येने आंदोलक जमले. त्यांच्यासमोर एका राजकीय नेत्याचे भाषण झाले. जमावाचा त्यामुळेच भडका उडाला व बसेसची जाळपोळ सुरू झाली.

टॅग्स :citizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयकSonia Gandhiसोनिया गांधीAmit Shahअमित शहा