शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

बंगालमध्ये भाजपाची रथयात्रा रोखल्याने अमित शाह यांचा तीळपापड, ममता बॅनर्जींवर केली टीका 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2018 16:27 IST

पश्चिम बंगालमध्ये रथयात्रा काढण्यास राज्य सरकारने नकार दिल्याने भाजपा आणि तृणमूल काँग्रेस पक्ष आमनेसामने आले आहेत.

ठळक मुद्देपश्चिम बंगालमध्ये रथयात्रा काढण्यास राज्य सरकारने नकार दिल्याने भाजपा आणि तृणमूल काँग्रेस पक्ष आमनेसामने आले आहेत. भाजपाची रथयात्रा रोखल्याने तीळपापड झालेल्या भाजपा अध्यक्षांनी ममता बॅनर्जी यांच्यावर थेट हल्ला केला असून, ममता बॅनर्जी यांच्या सरकारने लोकशाहीची हत्या केल्याचा आरोप शाह यांनी केला आहे. भाजपाच्या रथयात्रेमुळे राज्यात सांप्रदायिक तणाव निर्माण होऊ शकतो, असे कारण देत पश्चिम बंगाल सरकारने भाजपाच्या रथयात्रेला परवानगी नाकारली होती.

नवी दिल्ली - पश्चिम बंगालमध्ये रथयात्रा काढण्यास राज्य सरकारने नकार दिल्याने भाजपा आणि तृणमूल काँग्रेस पक्ष आमनेसामने आले आहेत. दरम्यान, भाजपाची रथयात्रा रोखल्याने तीळपापड झालेल्या भाजपा अध्यक्षांनी ममता बॅनर्जी यांच्यावर थेट हल्ला केला असून, ममता बॅनर्जी यांच्या सरकारने लोकशाहीची हत्या केल्याचा आरोप शाह यांनी केला आहे.  बंगालमधील पंचायत निवडणुकीनंतर ममता बॅनर्जींची झोप उडाली असल्याचा टोलाही त्यांनी लगावला. दरम्यान, ममता बॅनर्जी यांच्या सरकारने रथयात्रेला परवानगी नाकारल्याने भाजपाने कोलकाता उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.  आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना अमित शाह म्हणाले की, ''बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील सरकार सर्वसामान्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहे. पंचायत निवडणुकीत भाजपाला मिळालेल्या यशामुळे ममता बॅनर्जी बावचळल्या आहेत.'' भाजपाच्या रथयात्रेमुळे राज्यात सांप्रदायिक तणाव निर्माण होऊ शकतो, असे कारण देत पश्चिम बंगाल सरकारने भाजपाच्या रथयात्रेला परवानगी नाकारली होती.

रथयात्रेसाठी आठ वेळा परवानगी मागूनही पश्चिम बंगाल सरकारने परवानगी नाकारली. तसेच पंचायत निवडणुकीदरम्यान, भाजपाच्या 20 कार्यकर्त्यांची हत्या झाली. या सर्व हत्यांमध्ये टीएमसीच्या कार्यकर्त्यांवर आरोप झाले. मात्र त्यांचा योग्य तपास झाला नाही, असा आरोपही शाह यांनी केला. 

 

टॅग्स :Amit Shahअमित शाहwest bengalपश्चिम बंगालBJPभाजपाMamata Banerjeeममता बॅनर्जी