शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
3
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
4
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
5
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
6
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
7
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
8
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
9
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
10
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
11
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
12
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
13
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
14
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
15
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
16
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
17
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
18
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
19
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
20
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे

नक्षलग्रस्त राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची अमित शहांनी २६ रोजी बोलावली बैठक

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2019 05:05 IST

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या केंद्र सरकारच्या कोणत्याच कार्यक्रमात सहभागी होत नाहीत, त्यामुळे त्यांच्या होकाराची विशेष वाट पाहिली जात आहे.

- संतोष ठाकूरनवी दिल्ली : देशात नक्षलवादाचा प्रश्न, सध्याचे त्याचे स्वरूप आणि त्याबाबत भविष्यातील धोरणाचा विचार करण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी २६ आॅगस्ट रोजी नक्षलवादग्रस्त सगळ्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक बोलावली आहे. या बैठकीला उपस्थित राहू असा होकार अजून कोणाकडूनही आलेला नाही. परंतु केंद्रीय गृहमंत्रालयाला पश्चिम बंगाल आणि छत्तीसगडच्या मुख्यमंत्र्यांकडून होकाराची विशेष प्रतीक्षा आहे. याचे कारण म्हणजे या दोन्ही राज्यांत काँग्रेसचे सरकार असून ते भाजपवर असा आरोप करीत आहे की, आमच्याकडील नक्षलवादाच्या प्रश्नांबद्दल केंद्र सरकार उदासीन आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या केंद्र सरकारच्या कोणत्याच कार्यक्रमात सहभागी होत नाहीत, त्यामुळे त्यांच्या होकाराची विशेष वाट पाहिली जात आहे.केंद्रीय गृहमंत्रालयाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, केंद्र सरकार आणि पश्चिम बंगालचे सरकार यांच्यात राजकीय संघर्ष असून, केंद्र सरकारच्या अनेक योजना राज्यात बंद आहेत किंवा त्यांच्यावर विशेष काम केले जात नाही. त्यामुळे बॅनर्जी या बैठकीला येतात की नाही हे बघणे महत्त्वाचे. बैठकीचा मुख्य उद्देश हा नक्षलवादाचे सध्याचे स्वरूप समजून घेऊन त्यानुसार त्याला हाताळण्याचे धोरण बनवण्यासाठी राज्यांची सहमती घेणे आणि नक्षलवाद्यांना आधीपेक्षा कमी जागेत मर्यादित करणे. विशेषत: झारखंड, छत्तीसगड व इतर काही राज्यांत त्यांचा प्रभाव कमी करण्यासाठी नव्याने प्रयत्न करणे, धोरण आखण्यावर चर्चा केली जाईल. नक्षलवादी सतत कमी होत आहेत, पण दुसरीकडे काही शहरांत त्यांचा प्रभाव वाढताना दिसतो आहे. हा प्रभाव फार नसला तरीही त्यावर आताच उपाय योजणे गरजेचे आहे. शहरातील नक्षलवाद्यांच्या प्रभावावरही चर्चा केली जाईल.

टॅग्स :Amit Shahअमित शहा