शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

माहिती अधिकार कायद्यातील सुधारणा म्हणजे 'दात नसलेला वाघ'

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2019 16:17 IST

माहिती अधिकार कायद्याला कमकुवत बनविण्याचा सरकारचा डाव आहे.

ठळक मुद्देमाहिती अधिकार कायद्याला कमकुवत बनविण्याचा सरकारचा डाव आहे. देशातील 60 लाखांपेक्षा अधिक नागरिकांनी गेल्या काही वर्षात माहिती अधिकार कायद्याचा वापर केला आहे.

नवी दिल्ली - महिती अधिकार कायद्यात नवीन सुधारणा करण्यात आली आहे. सोमवारी लोकसभेत माहिती अधिकार कादया सुधारणा विधेयक मंजूर करण्यात आले. मात्र, विरोधकांनी मोदी सरकारच्या या सुधारणा विधेयकाला मोठा विरोध केला होता. या विधेयकातील नव्या धोरण आणि सुधारणांचा वापर केल्यास राष्ट्रीय मानवाधिकार कायद्याप्रमाणेच माहिती अधिका कायदाही दात नसलेल्या वाघासारखा होईल, असे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजीमंत्री शशी थरुर यांनी म्हटले आहे. 

माहिती अधिकार कायद्याला कमकुवत बनविण्याचा सरकारचा डाव आहे. माहिती अधिकार कायदा सुधारणा विधेयक 2019 च्या सभागृहातील चर्चेवेळी शशी थरुर यांनी मोदी सरकारला लक्ष्य केलं. हे माहिती अधिकार सुधारणा विधेयक नसून हा कायदाच संपुष्टात आणण्यात येत असल्याचं थरुर यांनी म्हटलं आहे. तसेच काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनीही माहिती अधिकार कायद्यातील बदलाल विरोध करताना, सरकारकडून या कायद्याची हत्या करण्यात येत असल्याचं सोनिया गांधींनी म्हटलं आहे. माहिती अधिकार कायदा विचार-विनिमय करुन बनविण्यात आला होता. पण, आता तो कायदा संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहे. 

देशातील 60 लाखांपेक्षा अधिक नागरिकांनी गेल्या काही वर्षात माहिती अधिकार कायद्याचा वापर केला आहे. तर प्रशासनाकडून हवी ती माहिती मिळवण्यात या सर्वांनाच यश आणि सहकार्य मिळाले आहे. आरटीआयच्या वापरामुळे समाजातील कमकुवत वर्गाला मोठा आधार मिळाला होता. मात्र, सध्याचे सरकार माहिती अधिकार कायद्याला महत्व देत नसून केंद्रीय माहिती आयोगाच्या दर्जावरच घाव घालण्याचा प्रयत्न करत आहे. दरम्यान, विरोधकांनी कडाडून विरोध केल्यानंतरही आरटीआय सुधारणा विधेयक 2019 लोकसभेत मंजूर झाले आहे. केंद्रीय मंत्री जितेंद्रसिंह यांनी या बदलामुळे कुठलिही पारदर्शकता धोक्यात येणार नसल्याचे म्हटले आहे.  

 

टॅग्स :Right to Information actमाहिती अधिकारcongressकाँग्रेसlok sabhaलोकसभा